शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

नोकर भरतीला विभागीय सहनिबंधकांचा आक्षेप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2022 05:00 IST

चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील आर्थिक घोळामुळे बँकेचे माजी अध्यक्ष मनोहर पाऊणकर यांना कारागृहात जावे लागले होते. पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या मार्गदर्शनात या बॅकेवर कॉग्रेसचे वर्चस्व आहे. पालकमंत्र्यांचे खंदे समर्थक संतोष रावत बँकेचे अध्यक्ष आहेत. रावत यांच्या नेतृत्वात बँक आर्थिक प्रगती करीत आहे. नुकतीच सहकार खात्याने चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेला १६५ पदांच्या नोकर भरतीला मंजुरी दिली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेतील १६५ पदांच्या नोकर भरतीवर विभागीय सहनिबंधकांनी आक्षेप नोंदविला. बँकेच्या विद्यमान संचालक मंडळाचा कालावधी संपला. त्यामुळे नोकर भरतीसारख्या अतिसंवेदनशिल विषयावर पदावधी संपलेल्या विद्यमान संचालक मंडळाने निर्णय घेणे उचित होणार नाही, असे पत्रात नमुद केल्याने संचालक मंडळात खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे, जिल्हा बँकेवर काँग्रेस वर्चस्व असताना काँग्रेसचे खासदार बाळू धानोरकर यांनीही दोन दिवसांपूर्वी आक्षेप नोंदविला होता.चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील आर्थिक घोळामुळे बँकेचे माजी अध्यक्ष मनोहर पाऊणकर यांना कारागृहात जावे लागले होते. पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या मार्गदर्शनात या बॅकेवर कॉग्रेसचे वर्चस्व आहे. पालकमंत्र्यांचे खंदे समर्थक संतोष रावत बँकेचे अध्यक्ष आहेत. रावत यांच्या नेतृत्वात बँक आर्थिक प्रगती करीत आहे. नुकतीच सहकार खात्याने चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेला १६५ पदांच्या नोकर भरतीला मंजुरी दिली आहे. बँकेच्या सोमवार १४ मार्च रोजीच्या संचालक मंडळाच्या सभेत सहकार खात्याचे नोकर भरती मंजुरीचे पत्र ठेवण्यात आले. १६५ पदांच्या भरतीला मंजूरी मिळाल्याने बँकेचे संचालक मंडळ आनंदात असतानाच स्वपक्षीय खासदार धानोरकर यांनी नोकर भरती मान्यता देवून सहकार खातेच घोटाळ्यांना खतपाणी घालण्याचे काम केले आहे. तेव्हा या भरती प्रक्रियेला स्थगिती द्यावी अशी मागणी लोकसभेत केली. खासदाराच्या मागणी पाठोपाठ आता विभागीय सहनिबंधक संजय कदम यांनी बॅंकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना १४ मार्च रोजी पत्र दिले आहे. या पत्रात जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे विद्यमान संचालक मंडळाचा कालावधी संपुष्टात येवून पाच वर्षांचा कालावधी झाला आहे. त्यामुळे अत्यंत महत्त्वाच्या विषयावर पदावधी संपलेल्या विद्यमान संचालक मंडळाने निर्णय घेणे उचित नाही असे कळविले आहे. पत्राची संचालक मंडळच्या सभेच्या इतिवृत्तात नोंद घेण्यात यावी, असेही कळविले आहे.

 

टॅग्स :bankबँकjobनोकरी