शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूरवेळी पाकिस्तानचा प्रत्येक वार ज्यानं हाणून पाडला, आता ते शस्त्र खरेदीसाठी हा मोठा देशही आतूरलेला, करणार 'बिग डील'!
2
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
3
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
4
कोल्हापुरातील वराच्या फिर्यादीवरून जळगावची वधू व मध्यस्थांविरुद्ध गुन्हा दाखल
5
प्रेयसी मुलासोबत लाॅजमधून बाहेर येताना दिसली, प्रियकराने संपवले जीवन
6
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
7
कुटुंबियांना फोन करून आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांच्या तत्परतेमुळे वाचला व्यावसायिकाचा जीव
8
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
9
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
10
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
11
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
12
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
13
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
14
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
15
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
16
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
17
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
18
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
19
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
20
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!

डांबर प्लांटला ग्रामस्थांचा विरोध

By admin | Updated: February 15, 2016 01:05 IST

सरपंचासह ग्रामपंचायत कमिटीची दिशाभूल करून उपसरपंचांनी बोरचांदली आणि लगतचा गावातील शेती तसेच ..

प्लांट झाल्यास आरोग्य धोक्यात : ना-हरकत रद्द न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारामूल : सरपंचासह ग्रामपंचायत कमिटीची दिशाभूल करून उपसरपंचांनी बोरचांदली आणि लगतचा गावातील शेती तसेच गावकऱ्यांसाठी भविष्यात धोकादायक ठरणारा डांबर प्लांट उभारण्यासाठी ना हरकत दाखला दिल्याने गावकऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. प्लांट उभारण्यात येऊ नये, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.आर्थिक प्रलोभनाला बळी पडू उपसरपंचांनी सदर डांबर प्लॉटला नाहरकत दाखला दिला. परंतु याबाबत सरपंचाला तसेच ग्रामपंचायत कमिटीला कोणतीही माहिती दिली नसल्याचे ग्राम पंचायत सदस्य महेश कटकमवार, लोकनाथ मेश्राम, वासुदेव येनुगवार, सुनील येनगंटीवार यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. बोरचांदलीचे सरपंच उषा दुर्गे ही अनुसूचित जमातीची महिला असून अल्प शिक्षित असल्याने ग्रामपंचायतीचा कारभार उपसरपंच गौरव पुपरेड्डीवार हेच चालवितात. आपला आर्थिक लाभ करुन घेण्यासाठी उपसरपंचांनी डांबर प्लांटमुळे होणाऱ्या प्रदुषणाच्या शेती आणि गावकऱ्यांचा आरोग्यावर भविष्यात होणाऱ्या दुष्परिणामांच्या विचार केला नाही. पुपरेड्डीवार यांनी अल्प शिक्षित सरपंचांना चुकीची आणि दिशाभूल करणारी माहिती देऊन ना-हरकत दाखल्यावर त्यांची सही घेऊन डांबर प्लांट मालकाकडून आर्थिक सौदेबाजी केल्याचा आरोप ग्रामपंचायत सदस्य आणि उपस्थित गावकऱ्यांनी केला.बोरचांदली गावाशेजारुन वाहणाऱ्या उमा नदीच्या तिरावर होत असलेला हा डांबर प्लांट अत्यंत धोकादायक असून यामुळे हवेचे तसेच पाण्याचे प्रदूषण होऊन ते शेती आणि गावकऱ्यांच्या आरोग्याला विपरीत परिणाम करणारे आहे. सदर डांबर प्लांटमुळे भयंकर प्रदूषण होणार असून सुमारे दहा किलोमीटरचा परीसर क्षेत्रात त्याचा परिणाम जाणवेल, अशी भीती येनुगवार यांनी पत्रकारांपुढे व्यक्त केली. डांबर प्लांट उभारण्यात येत असलेली जागा नदी किनाऱ्याला लागून असून पूरप्रवण क्षेत्रात येते. डांबर प्लांट मालक नदीतील पाण्याचा बेसुमार वापर करुन दूषित पाणी नदीमध्ये सोडण्याची शक्यता असल्याने नदीचे पाणीही दूषित होऊन त्यातील जीवजंतूंना धोका निर्माण होईल. सदर डांबर प्लांटला उपसरपंचांनी नाहरकत दाखल दिला असला तरी संपूर्ण गावकऱ्यांचा विरोध आहे. डांबर प्लांट होऊ नये यासाठी गावकऱ्यांच्या वतीने उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फतीने शासनाकडे निवेदन देण्यात आले आहे. डांबर प्लांट उभारणीचे काम ताबडतोब बंद करण्यात न आल्यास गावकऱ्यांकडून तीव्र आंदोलन करण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. पत्रकार परिषदेला दिनकर येनूगवार, अमित येनगंटीवार, मयूर कावळे, दिनेश येनूगरवार, सचिन येलट्टीवार, निले, कटकमवार, अभिषेक पोरेड्डीवार, शैलेश कटकमवार, राजीव येनूगवार, मारकवार उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)