शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
3
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
4
'त्या प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
5
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
6
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
7
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
8
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
9
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
10
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
11
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
12
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
13
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
14
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
15
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
16
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
17
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
18
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
19
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
20
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
Daily Top 2Weekly Top 5

डांबर प्लांटला ग्रामस्थांचा विरोध

By admin | Updated: February 15, 2016 01:05 IST

सरपंचासह ग्रामपंचायत कमिटीची दिशाभूल करून उपसरपंचांनी बोरचांदली आणि लगतचा गावातील शेती तसेच ..

प्लांट झाल्यास आरोग्य धोक्यात : ना-हरकत रद्द न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारामूल : सरपंचासह ग्रामपंचायत कमिटीची दिशाभूल करून उपसरपंचांनी बोरचांदली आणि लगतचा गावातील शेती तसेच गावकऱ्यांसाठी भविष्यात धोकादायक ठरणारा डांबर प्लांट उभारण्यासाठी ना हरकत दाखला दिल्याने गावकऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. प्लांट उभारण्यात येऊ नये, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.आर्थिक प्रलोभनाला बळी पडू उपसरपंचांनी सदर डांबर प्लॉटला नाहरकत दाखला दिला. परंतु याबाबत सरपंचाला तसेच ग्रामपंचायत कमिटीला कोणतीही माहिती दिली नसल्याचे ग्राम पंचायत सदस्य महेश कटकमवार, लोकनाथ मेश्राम, वासुदेव येनुगवार, सुनील येनगंटीवार यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. बोरचांदलीचे सरपंच उषा दुर्गे ही अनुसूचित जमातीची महिला असून अल्प शिक्षित असल्याने ग्रामपंचायतीचा कारभार उपसरपंच गौरव पुपरेड्डीवार हेच चालवितात. आपला आर्थिक लाभ करुन घेण्यासाठी उपसरपंचांनी डांबर प्लांटमुळे होणाऱ्या प्रदुषणाच्या शेती आणि गावकऱ्यांचा आरोग्यावर भविष्यात होणाऱ्या दुष्परिणामांच्या विचार केला नाही. पुपरेड्डीवार यांनी अल्प शिक्षित सरपंचांना चुकीची आणि दिशाभूल करणारी माहिती देऊन ना-हरकत दाखल्यावर त्यांची सही घेऊन डांबर प्लांट मालकाकडून आर्थिक सौदेबाजी केल्याचा आरोप ग्रामपंचायत सदस्य आणि उपस्थित गावकऱ्यांनी केला.बोरचांदली गावाशेजारुन वाहणाऱ्या उमा नदीच्या तिरावर होत असलेला हा डांबर प्लांट अत्यंत धोकादायक असून यामुळे हवेचे तसेच पाण्याचे प्रदूषण होऊन ते शेती आणि गावकऱ्यांच्या आरोग्याला विपरीत परिणाम करणारे आहे. सदर डांबर प्लांटमुळे भयंकर प्रदूषण होणार असून सुमारे दहा किलोमीटरचा परीसर क्षेत्रात त्याचा परिणाम जाणवेल, अशी भीती येनुगवार यांनी पत्रकारांपुढे व्यक्त केली. डांबर प्लांट उभारण्यात येत असलेली जागा नदी किनाऱ्याला लागून असून पूरप्रवण क्षेत्रात येते. डांबर प्लांट मालक नदीतील पाण्याचा बेसुमार वापर करुन दूषित पाणी नदीमध्ये सोडण्याची शक्यता असल्याने नदीचे पाणीही दूषित होऊन त्यातील जीवजंतूंना धोका निर्माण होईल. सदर डांबर प्लांटला उपसरपंचांनी नाहरकत दाखल दिला असला तरी संपूर्ण गावकऱ्यांचा विरोध आहे. डांबर प्लांट होऊ नये यासाठी गावकऱ्यांच्या वतीने उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फतीने शासनाकडे निवेदन देण्यात आले आहे. डांबर प्लांट उभारणीचे काम ताबडतोब बंद करण्यात न आल्यास गावकऱ्यांकडून तीव्र आंदोलन करण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. पत्रकार परिषदेला दिनकर येनूगवार, अमित येनगंटीवार, मयूर कावळे, दिनेश येनूगरवार, सचिन येलट्टीवार, निले, कटकमवार, अभिषेक पोरेड्डीवार, शैलेश कटकमवार, राजीव येनूगवार, मारकवार उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)