शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताला ५० टक्क्याचा शॉक; ट्रम्प यांनी दुप्पट केले टॅरिफ; काय होणार परिणाम?
2
आजचे राशीभविष्य, ०७ ऑगस्ट २०२५: चिंतामुक्त व्हाल, हाती पैसा राहील; यशाचा शुभ दिवस
3
पक्के घर देण्याचा वादा तीन वर्षांनंतरही पूर्ण हाेईना; महाराष्ट्रात ‘पीएम आवास’ ची २७ लाख घरे अद्याप अपूर्ण
4
डोनाल्ड ट्रम्पच्या प्रयत्नांनाही पुतिन बधले नाहीत! चीनसोबत युद्धाची तयारी सुरू; पुढे काय करणार?
5
पाकिस्तान-अमेरिकेत नक्की काय सुरू? आधी तेलाचा करार, मग टॅरिफही कमी केला; आता असिम मुनीर USच्या वाटेवर!
6
मतदार यादीतील ६५ लाख नावे का वगळली हे सांगा, बिहारवरून सुप्रीम कोर्टाचे  आयोगाला आदेश
7
घरे, झाडे सर्व काही गाडले, हाती काही लागेना; मानवाच्या हव्यासाने आले संकट
8
डोनाल्ड ट्रम्प भारतात राहायला येणार? रहिवासी प्रमाणपत्रासाठी केला अर्ज! प्रशासनाची कोंडी
9
उत्तराखंडमधील ढगफुटीचे थैमान; महाराष्ट्रातील ५१ पर्यटक सुरक्षित
10
सावरकर सदन: वारसास्थळ दर्जाचा लवकरच निर्णय; महापालिकेची हायकोर्टात माहिती; अभिनव भारत काँग्रेसची याचिका
11
रेपो दर जैसे थे; कर्ज हप्ता राहणार स्थिर; ‘ट्रम्प टॅरिफ’च्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेचा निर्णय
12
दिव्याखाली अंधार! हा घ्या, अमेरिकेने रशियाकडून केलेल्या आयातीचा हिशेब
13
महिंद्रा अँड महिंद्रा समूहाचे कर्मचारी होणार मालामाल, मिळणार ५०० कोटींचे शेअर्स
14
शिंदे, ठाकरे दिल्लीत, चर्चा महाराष्ट्रात! एकनाथ शिंदेंची अमित शाह यांच्याशी बंदद्वार चर्चा; पंतप्रधानांना सहकुटुंब भेटले
15
यूपीआय फ्री की फी? शुल्काचे संकेत; काय म्हणाले RBI गवर्नर संजय मल्होत्रा?
16
...तर निवृत्तीनंतरचे आयुष्य येईल धोक्यात, हे करा उपाय
17
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
18
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
19
"अंधभक्तांना विनंती, राजकीय नियुक्तीचे समर्थन करु नका; कारण..."; रोहित पवारांनी काय दिला इशारा?
20
अहिल्यानगर: चौथीत शिकणाऱ्या मुलीवर शिक्षकाकडूनच अत्याचाराचा प्रयत्न, नेत्याने प्रकरण दाबले; पण...

निकालापूर्वी वैधता प्रमाणपत्र देण्याची मागणी

By admin | Updated: May 24, 2015 01:50 IST

बारावीच्या परीक्षा आटोपून सर्वांचे लक्ष निकालाकडे लागले असताना बहुतांश आदिवासी विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र प्राप्त झाले नाही.

भद्रावती : बारावीच्या परीक्षा आटोपून सर्वांचे लक्ष निकालाकडे लागले असताना बहुतांश आदिवासी विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र प्राप्त झाले नाही. त्यामुळे तातडीने कार्यवाही करून निकालापूर्वी वैधता प्रमाणपत्र देण्याची मागणी माना आदिम जमात मंडळ मुंबईचे जिल्हा शाखा प्रमुख देविदास जांभुळे यांनी केली आहे.विद्यार्थ्यांनी उच्च शिक्षणाकरिता अकरावीमध्ये असतानाच आपल्या महाविद्यालयामार्फत किंवा वैयक्तिक प्रस्ताव समितीकडे दाखल केलेले आहे. परंतु बारावीचा निकाल तोंडावर आला असतानासुद्धा समितीने जात वैधता प्रमाणपत्र विद्यार्थ्यांना दिले नाही. यामुळे अनेक विद्यार्थी उच्च शिक्षणापासून वंचित राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे. चंद्रपूर गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी लोकांच्या सोईकरीता शासनाने गडचिरोली येथे समितीची स्थापना केली. परंतु सोय होण्याऐवजी गैरसोयच होत असल्याचे चित्र बघायला मिळत आहे.शासनाच्या योजना आदिवासींपर्यंत पोहचत नाही. प्रशासकीय दिरंगाई, अपुरा कर्मचारी-अधिकारी वर्ग, शासनाचा वचक, अनेक जाचक अटी व शर्ती, लोकप्रतिनिधीचे दुर्लक्ष, आदिवासीचे अज्ञान, आपसातील कुरघोडो, गैरआदिवासींचा भरणा असे अनेक कारण याकरिता कारणीभूत आहे. आदिवासी विभाग म्हणजे ‘मलिदा’ गोळा करण्याचे साधन. यात अनेक घोटाळे गाजलेले आहे. स्कॉलरशीप घोटाळ्यात गैरआदिवासी अधिकारी व संस्थाचालक गबर झालेले आहे. आदिवासीपर्यंत त्यांच्या हक्काच्या योजना पोहचलेल्या नाही. अर्थसंकल्पात केलेली तरतूद त्यांच्यावर खर्च केल्या जात नाही ती अन्यत्र वडविल्या जाते. अशी भयावह स्थिती आहे.आदिवासी योजनेतील अटी व शर्ती शिथील करून जास्तीत जास्त लोकांना लाभ देण्याची मागणी जांभुळे यांनी केली आहे. (तालुका प्रतिनिधी)