शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

डायमंड कटींग प्रशिक्षणातून बेरोजगारीवर मात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2019 06:00 IST

विदर्भातून मोठ्या प्रमाणात सुरत व मुंबई या परिसरातील डायमंड कटींग अर्थात हिऱ्यांना पैलू पाडण्याच्या उद्योगात तरुण काम करतात. मात्र त्यासाठी त्यांना आवश्यक प्रशिक्षणाची गरज असते. हिऱ्यांना पैलू पाडण्याच्या उद्योगामध्ये कुशल मनुष्यबळाची प्रचंड मागणी आहे. किमान कौशल्य आवश्यकता असणाऱ्या या व्यवसायामध्ये हमखास २० ते ४० हजार रुपये प्रति महिना असा रोजगार मिळतो.

ठळक मुद्देसुधीर मुनगंटीवार म्हणतात, केंद्रामुळे हमखास नोकरीची संधी

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : विदर्भामध्ये चंद्रपूर, गडचिरोली या भागात रोजगार निर्मिती क्षेत्रात नवनवीन प्रयोग करणे अत्यंत गरजेचे आहे. त्यासाठी प्रमोद महाजन कौशल्य व उद्योजकता विकास अभियानांतर्गत चंद्रपूर जिल्ह्यामध्ये एक अभिनव प्रयोग करण्यात आला आहे. बल्लारपूर येथे डायमंड कटींग प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यात आले आहे. हमखास नोकरीची संधी असलेल्या या प्रशिक्षणातून बेरोजगारांना रोजगार मिळत आहे.विदर्भातून मोठ्या प्रमाणात सुरत व मुंबई या परिसरातील डायमंड कटींग अर्थात हिऱ्यांना पैलू पाडण्याच्या उद्योगात तरुण काम करतात. मात्र त्यासाठी त्यांना आवश्यक प्रशिक्षणाची गरज असते. हिऱ्यांना पैलू पाडण्याच्या उद्योगामध्ये कुशल मनुष्यबळाची प्रचंड मागणी आहे. किमान कौशल्य आवश्यकता असणाऱ्या या व्यवसायामध्ये हमखास २० ते ४० हजार रुपये प्रति महिना असा रोजगार मिळतो. त्यामुळे ११ फेब्रुवारी २०१६ रोजी बल्लारपूर येथे डायमंड कटींग प्रशिक्षण केंद्राची सुरुवात करण्यात आली. या प्रशिक्षणातून दरवर्षी एक हजार तरुणांना सुरत, मुंबई आदी शहरांमध्ये नोकरी देण्याची हमी संबंधित कंपनीने घेतली आहे. आतापर्यंत युवकांच्या दोन तुकड्या येथून प्रशिक्षण घेऊन बाहेर पडल्या आहेत. यातील अनेकांना विविध शहरात रोजगार उपलब्ध झाला आहे. त्यामुळे त्यांचे कुटुंबीय आनंदात आहे.प्रमोद महाजन कौशल्य व उद्योजकता विकास अभियानांतर्गत चंद्रपूर जिल्ह्यामध्ये बल्लारपूर येथे डायमंड कटींग प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यात आले आहे. येथील बेरोजगार युवकांच्या हाताला काम मिळावे, यासाठी आपण पुढाकार घेतला आहे. अनेकांना येथून प्रशिक्षित झाल्यानंतर रोजगार मिळाला आहे. आदिवासी विद्यार्थ्यांमध्ये मोठी क्षमता आहे. त्यांच्या पाठिशी भक्कमपणे उभे राहिले तर ते भीम पराक्रम करू शकतात. हे या जिल्ह्यातील आदिवासी तरुणांनी एव्हरेस्ट सर करून दाखवून दिले आहे.- सुधीर मुनगंटीवार,अर्थ, नियोजन व वनेमंत्री, महाराष्ट्र शासन.पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने बल्लारपूर येथे डायमंड कटींग प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यात आले आहे. या केंद्रामुळे परिसरातील बेरोजगार तरुण कामाला लागले आहेत. चांगले प्रशिक्षण घेतले की हमखास नोकरी मिळते.-चंद्रकला बोबाटे, इटोली.चंद्रपूर जिल्ह्यात उद्योग असले तरी बेरोजगारीही वाढली आहे. ती कमी करण्याच्या उद्देशाने पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सुरू केलेले डायमंड कटींग सेंटर तरुणांसाठी फायदेशीर ठरत आहे. त्यांना यातून काम मिळत आहे.-हरीश गेडाम, बामणी (दुधोली).चंद्रपूरच्या एकलव्याची एव्हरेस्टवर स्वारीउपजत कलागुणांना संधी मिळाली की आकाश ठेंगणे होते, याचे उदाहरण चंद्रपूर जिल्ह्यातील आश्रमशाळेच्या विद्यार्थ्यांनी जगापुढे मांडले आहे. चंद्रपूर व महाराष्ट्राचा झेंडा चंद्रपूरच्या पाच विद्यार्र्थ्यानी एव्हरेस्टवर पोहचवला आहे. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आदिवासी विकास विभाग व जिल्हा प्रशासन यांनी राबवलेल्या मिशन शौर्य हा अभिनव उपक्रम यशस्वी केला. ज्यांनी आयुष्यात कधी विमान बघितले नाही. या मिशनसाठी जवळपास वर्षभराची तयारी चंद्रपूर जिल्हा प्रशासनाने केली होती. २०१८ च्या मे महिन्यात मुलांनी हा भीम पराक्रम केला. चंद्रपूर जिल्ह्यातील शासकीय आश्रमशाळेतील सक्षम, काटक, सुदृढ ५० विद्यार्थ्यापैकी दहा विद्यार्थ्यांची निवड एक वर्षाच्या खडतर प्रशिक्षणानंतर करण्यात आली. दहापैकी कविदास काठमोडे, उमाकांत मडावी, परमेश आडे, मनीषा धुर्वे व विकास सोयाम या पाच विद्यार्थ्यांनी एव्हरेस्ट सर केले. आदिवासी विद्यार्थ्यांच्या क्षमता वृद्धीच्या या प्रयोगाला आता राज्यव्यापी अभियानाचे स्वरूप आले आहे. या मिशनमधून मिशन शक्तीचा उदय झाला आहे. क्रीडा, कला, उद्योग, प्रशासन क्षेत्रात आदिवासीबहुल जिल्ह्याचे प्रतिनिधीत्व उमटावे यासाठीचा हा प्रयत्न राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर नोंदवला गेला. प्रधानमंत्र्यांनी आपल्या भाषणात लाल किल्ल्यावरुन चंद्रपूरचा यासाठी गौरव केला.

टॅग्स :Unemploymentबेरोजगारी