शहरं
Join us  
Trending Stories
1
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
2
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
3
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
4
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
5
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
6
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
7
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!
8
सौदी-इराण नाही, 'या' देशात फक्त २.५ रुपयांना मिळते १ लिटर पेट्रोल; भारताचा कितवा नंबर..?
9
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
10
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
11
पैसे कमवण्याची मोठी संधी! पुढील आठवड्यात बाजारात येणार ५ कंपन्यांचे IPO; ग्रे मार्केटमध्ये आधीच तुफान
12
“नाशिकमध्ये आमचे ७ आमदार, पालकमंत्रीपद आम्हाला मिळायला हवे”; छगन भुजबळ स्पष्टच बोलले
13
प्रेयसीच्या लग्नाने प्रियकर संतापला; तिच्या कुटुंबाला उडवण्यासाठी होम थिएटरमध्ये ठेवला बॉम्ब
14
इस्रायली नौदलाचा येमेनवर मोठा हल्ला, क्षणार्धात इमारतीतून येऊ लागले धुराचे लोट; पाहा व्हिडीओ
15
ज्योती चांदेकर यांच्यावर पुण्यात अंत्यसंस्कार, आईला शेवटचा निरोप देताना तेजस्विनी पंडितची भावुक अवस्था
16
महामंडळ वाटपाचं ठरलं, कोणाला मिळणार संधी? अजित पवार म्हणाले...
17
भारताला वेगळा न्याय? तेल खरेदीवरुन भारतावर निर्बंध, पण ट्रम्प यांनी स्वतः रशियासोबत वाढवला व्यापार!
18
निवृत्त झालेल्या आजोबांना मिळाले ३ कोटी, आनंदात पत्नीला सोडून राहू लागले वेगळे! पण पुढे काय झालं वाचाच...
19
'खुदा'ने मला रक्षक बनवले, मला पद..; सत्तापालटाच्या चर्चेदरम्यान असीम मुनीरचे सूचक विधान
20
म्यानमार सैन्याने स्वतःच्याच देशावर केला हवाई हल्ला; २१ जणांचा मृत्यू, १५ घरांचे नुकसान

शेतकऱ्यांची वाहने टोलमुक्त करण्याची मागणी

By admin | Updated: March 27, 2015 00:51 IST

लोकप्रतिनिधींच्या व शासकीय वाहनांना ज्याप्रमाणे महामार्गावरील टोलनाक्यांवर संपूर्ण सवलत दिल्या जाते,

भद्रावती : लोकप्रतिनिधींच्या व शासकीय वाहनांना ज्याप्रमाणे महामार्गावरील टोलनाक्यांवर संपूर्ण सवलत दिल्या जाते, त्याचप्रमाणे शेतकऱ्यांच्या धान्याने भरलेल्या वाहनाला टोल फ्री करण्यात यावे, अशी मागणी येथील सामाजिक कार्यकर्ते बाबा आस्वले यांनी केली आहे.महाराष्ट्र राज्य हे टोल राज्य झाले आहे. राज्याच्या विकासाअंतर्गत मोठमोठे महामार्ग बांधण्यात आले आणि या महामार्गावर दशकानुदशके चालणारे टोल नाके उभारण्यात आले. सरासरी एका व्यक्तीचे अर्धेअधिक आयुष्य वाहनाकरिता रस्त्याचा टोलटॅक्स देण्यात जाते. यात आमदार-खासदार यासह शसाकीय वाहनांना टॅक्स फ्री करण्यात आले आहे. वरून हे लोकप्रतिनिधी टोलनाक्यावर स्वत:चे ओळखपत्र दाखविण्याविरोधात आवाज उठवितात. अशा परिस्थितीत संपूर्ण समाजाचा पोशिंदा असलेला शेतकरी मात्र निसर्ग, शासकीय योजना, शेतपिकाला रास्त भाव, दुष्काळ यात सदैव पिसलेला असतो. त्याच्यासाठी कोणताच टॅक्स माफ नाही म्हणून किमान शेतकरी शेतामधून बाजारात शेतपिकाने भरलेले वाहन घेवून जाताना रस्त्यात पडणाऱ्या टोल नाक्यावर त्याच्या वाहनाला टॅक्स फ्री करण्यात यावे. यामुळे शेतकऱ्याला दिलासा मिळेल व टोलनाका, दलाल, अडते, व्यापारी, खरेदीसाठी शासकीय दिरंगाई अशा अनेक लुटीमध्ये किमान टोल नाक्यावर बसणाऱ्या भुर्दंडातून तरी त्याची सुटका होईल. त्यामुळे शेतकऱ्यांनी पिकविलेल्या धान्याने भरलेल्या वाहनांसाठी कोणत्याही प्रकारचा टोल लावण्यात येऊ नये, अशी मागणी मागणी बाबा आस्वले यांनी केलेली आहे.सोबतच वाहन खरेदी करताना आर.टी.ओ. कार्यालयाद्वारे लावण्यात येणारा टॅक्स व पेट्रोलचे दर ठरविताना रस्ते विकासाबाबत लावण्यात येणारा करण्यात येणारा जादा कर हे दोन टॅक्स देवूनच वाहन रस्त्यावर उतरते. मग पुन्हा रस्ते विकासाच्या नाववर टोक टॅक्सची वसुली कशासाठी, असा प्रश्नही बाबा आस्वले यांनी विचारला आहे. (प्रतिनिधी)