शहरं
Join us  
Trending Stories
1
अंतराळातून भारताचे तेजस्वी दर्शन; दररोज १६ सूर्योदय, १६ सूर्यास्त पाहातो; अंतराळवीर शुभांशू यांना पंतप्रधानांचा व्हिडीओ कॉल
2
मोठी बातमी: विद्यार्थिनीचा लैंगिक छळ करणाऱ्या विजय पवार, प्रशांत खाटोकरला बीड पोलिसांनी ठोकल्या बेड्या
3
बाबासाहेबांना एकच संविधान अभिप्रेत असल्याने कलम ३७० हटवण्यावर मोहर
4
दहशतवादी साकिब नाचनचे दिल्लीत निधन, सिमी, इसिससाठी काम; ‘तिहार’मध्ये बिघडली प्रकृती
5
दोन ठाकरे एकत्र येणार की निर्णयच बदलणार?
6
त्यांनी घरून मोबाइलवर केले मतदान, आपला नंबर कधी ?
7
रीलसाठी आयफोनची चोरी; फोनमालकाचा चिरला गळा
8
‘कांटा लगा’ फेम शेफालीचा मृत्यू कशामुळे?, प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मृत्यू
9
आधी कारने उडवले, मग शस्त्राने भोसकले; अमरावतीत पोलिस अधिकाऱ्याचा खून
10
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
11
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
12
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
13
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
14
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
15
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
16
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
17
आता आणखी कोण? काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसायची चिन्हे
18
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
19
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
20
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार

शेतकऱ्यांची वाहने टोलमुक्त करण्याची मागणी

By admin | Updated: March 27, 2015 00:51 IST

लोकप्रतिनिधींच्या व शासकीय वाहनांना ज्याप्रमाणे महामार्गावरील टोलनाक्यांवर संपूर्ण सवलत दिल्या जाते,

भद्रावती : लोकप्रतिनिधींच्या व शासकीय वाहनांना ज्याप्रमाणे महामार्गावरील टोलनाक्यांवर संपूर्ण सवलत दिल्या जाते, त्याचप्रमाणे शेतकऱ्यांच्या धान्याने भरलेल्या वाहनाला टोल फ्री करण्यात यावे, अशी मागणी येथील सामाजिक कार्यकर्ते बाबा आस्वले यांनी केली आहे.महाराष्ट्र राज्य हे टोल राज्य झाले आहे. राज्याच्या विकासाअंतर्गत मोठमोठे महामार्ग बांधण्यात आले आणि या महामार्गावर दशकानुदशके चालणारे टोल नाके उभारण्यात आले. सरासरी एका व्यक्तीचे अर्धेअधिक आयुष्य वाहनाकरिता रस्त्याचा टोलटॅक्स देण्यात जाते. यात आमदार-खासदार यासह शसाकीय वाहनांना टॅक्स फ्री करण्यात आले आहे. वरून हे लोकप्रतिनिधी टोलनाक्यावर स्वत:चे ओळखपत्र दाखविण्याविरोधात आवाज उठवितात. अशा परिस्थितीत संपूर्ण समाजाचा पोशिंदा असलेला शेतकरी मात्र निसर्ग, शासकीय योजना, शेतपिकाला रास्त भाव, दुष्काळ यात सदैव पिसलेला असतो. त्याच्यासाठी कोणताच टॅक्स माफ नाही म्हणून किमान शेतकरी शेतामधून बाजारात शेतपिकाने भरलेले वाहन घेवून जाताना रस्त्यात पडणाऱ्या टोल नाक्यावर त्याच्या वाहनाला टॅक्स फ्री करण्यात यावे. यामुळे शेतकऱ्याला दिलासा मिळेल व टोलनाका, दलाल, अडते, व्यापारी, खरेदीसाठी शासकीय दिरंगाई अशा अनेक लुटीमध्ये किमान टोल नाक्यावर बसणाऱ्या भुर्दंडातून तरी त्याची सुटका होईल. त्यामुळे शेतकऱ्यांनी पिकविलेल्या धान्याने भरलेल्या वाहनांसाठी कोणत्याही प्रकारचा टोल लावण्यात येऊ नये, अशी मागणी मागणी बाबा आस्वले यांनी केलेली आहे.सोबतच वाहन खरेदी करताना आर.टी.ओ. कार्यालयाद्वारे लावण्यात येणारा टॅक्स व पेट्रोलचे दर ठरविताना रस्ते विकासाबाबत लावण्यात येणारा करण्यात येणारा जादा कर हे दोन टॅक्स देवूनच वाहन रस्त्यावर उतरते. मग पुन्हा रस्ते विकासाच्या नाववर टोक टॅक्सची वसुली कशासाठी, असा प्रश्नही बाबा आस्वले यांनी विचारला आहे. (प्रतिनिधी)