शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
2
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
3
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
4
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
5
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
6
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
7
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
8
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
11
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
12
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
13
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
14
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
15
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
16
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
17
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
18
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
19
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
20
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या

बल्लारपुरातील राणी महालाच्या पायऱ्यांची दुरुस्ती करण्याची मागणी

By admin | Updated: April 12, 2015 00:49 IST

बल्लारपूर येथे वर्धा नदीच्या तीरावर गोंडकालीन ऐतिहासिक किल्ला सुमारे ७०० वर्षांपासून उभा आहे.

बल्लारपूर : बल्लारपूर येथे वर्धा नदीच्या तीरावर गोंडकालीन ऐतिहासिक किल्ला सुमारे ७०० वर्षांपासून उभा आहे. या किल्ल्याचा काही भाग काळानुरुप ढासळला असला तरी काही वास्तू अजुनही चांगल्या स्थितीत आहेत. त्यात नदीच्या अगदी काठावरील राणी महाल आहे. मजबूत बांधणीचा हा महाल देखणा आहे. या महालाच्या गच्चीवर उभे राहून नदीकडील व चौफेर दृष्य न्याहाळता येते. वर्धा नदीला आलेला पूर पाहण्यासाठी लोक महालाच्या याच गच्चीवर येतात. पुराच्या दिवसांत हा परिसर गजबजून जात असतो. इतर दिवशीही किल्ला बघणारे या राणी महालाच्या गच्चीवर जातातच. या महालाच्या गच्चीवर जाण्यासाठी दोन बाजुंनी पायऱ्या आहेत. अरुंद असलेल्या या पायऱ्यांना काही ठिकाणी तडे गेले आहेत. एक दोन ठिकाणी तर मोठे भगदाड पडले असून आतील भाग पोकळ आहे. या पायरीवरुन वर चढताना पोकळ झालेल्या भागात पाय जाणार तर नाही ना, अशी भीती निर्माण होते. पायरीचा भाग उघडा पडून असल्याने पावसाचे पाणी आत शिरुन पायरीचा भाग दिवसेंदिवस जीर्ण होत आहे. यामुळे पायरीचा भेगा पडलेला भाग दुरुस्ती करणे अतिशय आवश्यक आहे. महाल आणि त्यावरील गच्ची मजबूत आहे. जीर्ण झालेल्या त्याच्या पायऱ्यांची दुरुस्ती करावी, अशी मागणी इतिहास प्रेमींची आहे. किल्ल्यातील आतील भागातील कचरा साफ केल्यामुळे किल्ला बघणाऱ्यांची संख्या आता वाढू लागली आहे, हे विशेष ! त्यामुळे, किल्ल्यात उगविणारे गवत व इतर झाडे वेळोवेळी काढत राहणे आवश्यक आहे. काहीजण आपली नाव कोरुन महालाच्या सौंदर्यावर ओरखडे ओढत आहेत. हा प्रकार बंद करण्याची मागणी आहे. (तालुका प्रतिनिधी)