शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलने अचानक एअरस्पेस बंद केली; नेमके काय घडतेय... गाझा पट्टी की आणखी काही...
2
लहान मुलांना सनरुफ उघडून देताय? महिंद्रा ३XO चा व्हिडीओ पहाल कर, थरकाप उडेल...
3
ओबीसी आणि मराठा आरक्षणावर राज्य सरकार ठाम; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची स्पष्टोक्ती
4
“मनोज जरांगे पाटील मराठा समाजाचे नुकसान करतायत, स्वतःचे महत्त्व वाढावे...”; कुणी केली टीका?
5
धुळे हळहळले! रील स्टार शुभम सिंघवी याच्या दुचाकीला अपघात, जागेवरच मृत्यू
6
अवघ्या १५०० रुपयांत बनावट आधारकार्ड, दोन हजार लोकांना 'त्यानं' बनवलं मूर्ख! पोलिसांनी कसं पकडलं?
7
नऊवारी, फेटे अन् ढोल ताशे! जर्मनीच्या ड्युसलडॉर्फमध्ये उत्साहात साजरा झाला गणेशोत्सव!
8
भंडाऱ्याची उधळण अन पुष्पवृष्टी, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीला दिमाखदार मिरवणुकीने निरोप!
9
दहशतवाद्यांना पाकिस्तानची साथ; भारताने पाडलेल्या लष्कर-ए-तैयबाच्या मुख्यालयाचे बांधकाम पुन्हा सुरू
10
ह्युंदाईचे जीएसटी कपातीचे दर आले! नियॉस ७३,८०८, ऑरा ७८...; पहा कितीने कमी झाली क्रेटा...
11
‘हा तर मणिपूरच्या लोकांचा अपमान आहे’, PM मोदींच्या दौऱ्यावर काँग्रेसची बोचरी टीका
12
एका कुशीवरुन दुसऱ्या कुशीवर... पण काही केल्या झोपच येईना; 'या' ६ टिप्स गाढ झोपेमागचं रहस्य
13
'बीडमध्ये पोलिसांना आपले आडनाव लावता येत नसेल तर...', धनंजय मुंडेंनी व्यक्त केली खंत
14
चित्रकूट पर्वतावर पुजेसाठी जमलले! ५० जणांवर अचानक वीज कोसळली; ओडिशात धक्कादायक घटना
15
संसदेच्या आवारात भाजपची दोन दिवसांची कार्यशाळा; PM मोदी शेवटच्या रांगेत बसले...
16
एका शेअरने बदललं गुंतवणूकदारांचे नशीब! १ लाखाची गुंतवणूक ५ वर्षांत झाली ३४ लाखांहून अधिक
17
Travel : परदेशात जायचंय? 'हे' देश आहेत भारतीयांसाठी व्हिसा फ्री, ४० हजारात होईल एका देशाची ट्रिप!
18
विसर्जनाचं कंत्राट गुजरातला दिलं, कोळी बांधवांचा लालबाग मंडळावर गंभीर आरोप
19
अवघे पाऊणशे वयमान! सत्तरीत जग फिरण्याचं स्वप्न; ३५ देशांची सोलो ट्रिप, कोण आहे 'ट्रॅव्हल अम्मा'?
20
पितृपक्ष २०२५: कधी आहे सर्वपित्री अमावास्या? खंडग्रास सूर्यग्रहण लागणार; पाहा, काही मान्यता

बल्लारपुरातील राणी महालाच्या पायऱ्यांची दुरुस्ती करण्याची मागणी

By admin | Updated: April 12, 2015 00:49 IST

बल्लारपूर येथे वर्धा नदीच्या तीरावर गोंडकालीन ऐतिहासिक किल्ला सुमारे ७०० वर्षांपासून उभा आहे.

बल्लारपूर : बल्लारपूर येथे वर्धा नदीच्या तीरावर गोंडकालीन ऐतिहासिक किल्ला सुमारे ७०० वर्षांपासून उभा आहे. या किल्ल्याचा काही भाग काळानुरुप ढासळला असला तरी काही वास्तू अजुनही चांगल्या स्थितीत आहेत. त्यात नदीच्या अगदी काठावरील राणी महाल आहे. मजबूत बांधणीचा हा महाल देखणा आहे. या महालाच्या गच्चीवर उभे राहून नदीकडील व चौफेर दृष्य न्याहाळता येते. वर्धा नदीला आलेला पूर पाहण्यासाठी लोक महालाच्या याच गच्चीवर येतात. पुराच्या दिवसांत हा परिसर गजबजून जात असतो. इतर दिवशीही किल्ला बघणारे या राणी महालाच्या गच्चीवर जातातच. या महालाच्या गच्चीवर जाण्यासाठी दोन बाजुंनी पायऱ्या आहेत. अरुंद असलेल्या या पायऱ्यांना काही ठिकाणी तडे गेले आहेत. एक दोन ठिकाणी तर मोठे भगदाड पडले असून आतील भाग पोकळ आहे. या पायरीवरुन वर चढताना पोकळ झालेल्या भागात पाय जाणार तर नाही ना, अशी भीती निर्माण होते. पायरीचा भाग उघडा पडून असल्याने पावसाचे पाणी आत शिरुन पायरीचा भाग दिवसेंदिवस जीर्ण होत आहे. यामुळे पायरीचा भेगा पडलेला भाग दुरुस्ती करणे अतिशय आवश्यक आहे. महाल आणि त्यावरील गच्ची मजबूत आहे. जीर्ण झालेल्या त्याच्या पायऱ्यांची दुरुस्ती करावी, अशी मागणी इतिहास प्रेमींची आहे. किल्ल्यातील आतील भागातील कचरा साफ केल्यामुळे किल्ला बघणाऱ्यांची संख्या आता वाढू लागली आहे, हे विशेष ! त्यामुळे, किल्ल्यात उगविणारे गवत व इतर झाडे वेळोवेळी काढत राहणे आवश्यक आहे. काहीजण आपली नाव कोरुन महालाच्या सौंदर्यावर ओरखडे ओढत आहेत. हा प्रकार बंद करण्याची मागणी आहे. (तालुका प्रतिनिधी)