शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
3
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
4
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
5
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
6
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
7
दातांवर उपचार करताना महिलेचे कानही झाले बरे, २० वर्षांपासून येत नव्हतं ऐकू, असा घडला चमत्कार
8
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
9
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
10
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
11
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
13
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
14
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
15
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
16
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
17
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
18
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
19
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
20
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...

घोडाझरीच्या मुख्य कालव्याची दुरुस्ती करण्याची मागणी

By admin | Updated: July 27, 2016 01:16 IST

घोडाझरी तलावाअंतर्गत येत असलेल्या मुख्य कालव्याचा अनेक ठिकाणी भेगा व मध्यभागी छिद्र पडलेले असून सिंचन विभागाचे दुर्लक्ष झाले आहे.

इंग्रजकालीन वास्तू : निकृष्ट दर्जाचे बांधकाम तळोधी (बा.): घोडाझरी तलावाअंतर्गत येत असलेल्या मुख्य कालव्याचा अनेक ठिकाणी भेगा व मध्यभागी छिद्र पडलेले असून सिंचन विभागाचे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे बांधकाम निकृष्ठ दर्जाचे होत असल्याचा आरोप घोडाझरी लाभ क्षेत्रातील नागरिकांनी केला आहे. १९०५ मध्ये घोडाझरी तलावाची निर्मिती झाली असून त्याअंतर्गत जवळपास सात हजार हेक्टर शेतजमिनीला पाणी पुरविल्या जाते. मुख्य ठिकाणाहून हुमा वितरिका, तळोधी वितरिका, सावरगाव वितरिका, गिरगाव वितरिका, गडबोरी वितरिकाद्वारे पाणी वाटप केले जाते. मुख्य कालव्याच्या दोन्ही बाजूला सिमेंट काँक्रीटच्या भेगा पडलेल्या आहेत. अनेक ठिकाणी कालव्याची पार फुटलेली आहे. तर मध्यभागी अनेक ठिकाणी छिद्र पडलेले आहेत. तसेच मुख्य कालव्याचा उपसा न केल्यामुळे झाडे झुडपे मोठ्या प्रमाणात वाढली आहेत. कालव्याच्या निकृष्ठ बांधकामाकडे लक्ष घालून पाणी वाटपामुळे दुरुस्ती करण्याची मागणी लाभधारकांनी केली आहे. (वार्ताहर) दरवर्षी या तलावाच्या मुख्य कालव्याच्या दुरुस्तीकडे लक्ष देण्यात येत नसल्यामुळे अनेक ठिकाणी कालव्यांची पार फूटते व सतत आठ ते दहा दिवस पाणीपुरवठा बंद राहतो. त्यामुळे धान उत्पादक शेतकरी-शेतमजुरांना संकटाला समोर जावे लागते. तरी पाणी वाटपाच्या पूर्वीच कालव्यांची चांगल्या प्रकारे दुरुस्ती करण्यात यावी व लाभ धारकाला घोडाझरी पाण्याचा फायदा व्हावा अशी मागणी केली आहे. - खोजराम मस्कोल्हे, माजी सभापती, पंचायत समिती, नागभीड