शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने सियालकोटवर हल्ला चढवला, अन् पाकिस्तानने अमृतसरवर; रात्रभर अफवांचा बाजार उठला...
2
पाकिस्तानला घरात घुसून मारले! १०० हून अधिक दहशतवादी ठार; पहलगाम हल्ल्याचा घेतला बदला
3
Operation Sindoor Live Updates: स्फोटाचा आवाजांमुळे अमृतसरमध्ये रात्रभर ब्लॅक आऊट; पोलिस म्हणतात काहीच सापडले नाही
4
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
5
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निवडले ‘सिंदूर’ नाव; दडले आहेत कोणते पाच अर्थ? 
6
भारताच्या हल्ल्याला प्रत्युत्तरासाठी पाकची लष्कराला परवानगी
7
अर्ध्या तासात दहशतवादी भुईसपाट; ९ तळ उद्ध्वस्त; लष्करातील नारीशक्तीचे जगाला दर्शन
8
संपादकीय: याद राखा, हिशेब चुकता होईल! पाकिस्तान काय करेल आणि काय नाही...
9
पाकला धडा शिकवलाच, कायदेही मोडले नाहीत! एलओसी पार न करताच शत्रूवर मारा... 
10
सिंदूर, सोफिया अन् व्योमिका... नावात काय नाही, नावातच सारे दडलेले होते...
11
पाकिस्तान प्रतिहल्ला करेल?-शक्यता नाकारता येत नाही!
12
प्रवाशांना ‘बेस्ट’ची रिअल-टाइम सुविधा; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उपक्रमाचे उद्घाटन 
13
१८ विमानतळांवरील कामकाज तात्पुरते बंद; एकट्या इंडिगोने सुमारे १६० उड्डाणे रद्द केली
14
सीमावर्ती जिल्ह्यांमधील १४ जिल्ह्यांत सर्व शाळा बंद; ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पंजाब, राजस्थान आणि जम्मूत सूचना जारी  
15
विनाअपघात एसटी बस चालकांना बक्षीस देणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती
16
चंद्रावर उमटणार भारतीय अंतराळवीराचे पदचिन्ह
17
राज्यात गारपिटीची, तर मुंबईत मुसळधारेची शक्यता; मध्य महाराष्ट्र व मराठवाड्याला इशारा
18
रोहितने ‘तो’ निर्णय तेव्हाच घेतलेला? गंभीर आलेला, पण रोहित शर्मा अनुपस्थित होता... 
19
रोहित शर्माने घेतली कसोटीतून तडकाफडकी निवृत्ती; इंग्लंड दौऱ्यात मिळणार होता डच्चू...
20
गोष्ट मिठी नदीच्या न उपसलेल्या गाळाची..., गाळाने भरले भ्रष्ट अभियंत्याचे खिसे; चौकशीतून स्पष्ट 

मागणी एक लाखाची, मिळाल्या २९ हजार ७०० लसी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2021 04:26 IST

जिल्ह्यात कोरोना संसर्गाचा उद्रेक झाला. नागरिकांना लसीकरणाचे महत्त्व कळू लागल्याने केंद्रावर प्रचंड गर्दी करीत आहेत. त्यामुळे जिल्हा आरोग्य प्रशासनाने ...

जिल्ह्यात कोरोना संसर्गाचा उद्रेक झाला. नागरिकांना लसीकरणाचे महत्त्व कळू लागल्याने केंद्रावर प्रचंड गर्दी करीत आहेत. त्यामुळे जिल्हा आरोग्य प्रशासनाने प्राधान्य गटाची संख्या लक्षात घेऊन एक लाख १७ हजार डोसची मागणी केली. मात्र, सोमवारी जिल्ह्याला केवळ २९ हजार ७०० डोस पाठविण्यात आले. नागपूरसाठी एक लाख ३२ हजार, भंडारा जिल्हा २३ हजार ३००, गोंदिया १५ हजार ८०० व वर्धा जिल्ह्यासाठी १५ हजार डोस मंजूर करण्यात आले. चंद्रपूर जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. मृतकांची संख्याही सातत्याने वाढू लागल्याने जिल्हा प्रशासन हतबल झाले. अशा संकटाच्या काळात लसीकरण हा एक पर्याय आहे; परंतु मागणीनुसार जिल्ह्याला डोस मिळत नसल्याने पुन्हा केंद्र बंद ठेवण्याची वेळ प्रशासनावर येणार आहे.

चंद्रपूर शहरासाठी फक्त ३ हजार

चंद्रपूर शहरात रुग्णसंख्येने उच्चांक गाठला. लस घेणाऱ्या प्राधान्य गटातील लोकसंख्येचा विचार केल्यास प्रत्येक टप्प्यात सुमारे २० ते २५ हजार डोसची गरज लागू शकते. मात्र, फक्त ३ हजार डोस चंद्रपूर शहराच्या वाट्याला आले. त्यामुळे पंतप्रधान कशासाठी लस उत्सव साजरा करतात, असा प्रश्न विचारला जात आहे.