शहरं
Join us  
Trending Stories
1
लालूंच्या राजदची यादी आली! काँग्रेसविरोधात तीन जागांवर उमेदवार दिले, तेजस्वी यादव राघोपूरमधून लढणार...
2
"INS विक्रांतच्या नावानेच पाकिस्तानची झोप उडवली होती.."; पंतप्रधान मोदींकडून गौरवोद्गार
3
ऐन दिवाळीत सोन्या-चांदीचे दर जोरदार आपटले; एका झटक्यात चांदी ९ हजारांनी स्वस्त, सोन्याची नवी किंमत काय?
4
‘...म्हणून छत्रपती संभाजी महाराजांची त्यांच्या सासऱ्यांनी हत्या केली’, बच्चू कडूंचं धक्कादायक विधान  
5
"मी मोदींचा भक्त, भाजप म्हणजे घर"; महेश कोठारे म्हणाले, "मुंबईवर कमळ फुलणार, महापौरही इथूनच"
6
पाकिस्तानचे सूर बदलले? शाहबाज यांनी दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या; जगभरातील हिंदू असा उल्लेख केला, पण...
7
८०० वर्षांनी वैभव लक्ष्मी-महालक्ष्मी योगात लक्ष्मी पूजन: महत्त्व, महात्म्य, लक्ष्मी आरती
8
दहशत माजवणारा साद रिझवी कुठे गायब झाला? पीएम शहबाज शरीफ यांच्याही आणलेले नाकी नऊ!
9
हृदयस्पर्शी! शाळेच्या लाडक्या दास काकांची ३८ वर्षांची सेवा, वाजवली शेवटची घंटा; पाणावले डोळे
10
"भारताने इस्रायलकडून शिकायला हवे", RSS नेते भैयाजी जोशी नेमकं काय म्हणाले? धर्मांतरणावरही स्पष्टच बोलले!
11
दिवाळीनिमित्त मराठी अभिनेत्रीने पोस्ट केला लेकाचा गोड फोटो; म्हणाली, "माझ्या छोट्या स्टारची..."
12
WhatsApp युजर्सना मोठा धक्का; ChatGPT चा वापर करू देणार नाही मेटा, कारण...
13
"मोठी सती सावित्री बनून फिरतेय, रीलमध्ये फक्त पेटीकोटवर...", तान्या मित्तलची मालतीकडून पोलखोल
14
"आर्यनने त्याच्या दु:खावर सर्वांना हसवलं...", लक्ष्य लालवानीने केलं शाहरुखच्या लेकाचं कौतुक
15
"नगरविकास खाते माझ्याकडे; पैशांचा तुटवडा येणार नाही"; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ठाण्यात मोठा दावा
16
बांके बिहारी मंदिराच्या १०० वर्षांहून जुन्या 'तळघरात' अखेर काय सापडलं? साडे चार फूट सोन्याची काठी...
17
कारनामा! १६ वर्षांनी जिवंत सापडला मृत मुलगा; वडिलांनी हडपले ७२ लाख, अखेर फुटलं बिंग
18
Virender Sehwag Birthday: 'नजफगडचा नवाब' 47 वर्षांचा! वीरेंद्र सेहवागचे 4 महारेकॉर्ड्स, जे आजपर्यंत कुणीच तोडू शकलं नाही!
19
NSE Holidays 2025: उद्या शेअर बाजारात कामकाज सुरू राहणार का? स्टॉक मार्केटला कधी-कधी आहेत सुट्ट्या, पाहा यादी
20
अभिनेता अंकुर वाढवे दुसऱ्यांदा झाला बाबा; फोटो पोस्ट करत म्हणाला, "यावेळी मुलगा..."

मागणी एक लाखाची, मिळाल्या २९ हजार ७०० लसी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2021 04:26 IST

जिल्ह्यात कोरोना संसर्गाचा उद्रेक झाला. नागरिकांना लसीकरणाचे महत्त्व कळू लागल्याने केंद्रावर प्रचंड गर्दी करीत आहेत. त्यामुळे जिल्हा आरोग्य प्रशासनाने ...

जिल्ह्यात कोरोना संसर्गाचा उद्रेक झाला. नागरिकांना लसीकरणाचे महत्त्व कळू लागल्याने केंद्रावर प्रचंड गर्दी करीत आहेत. त्यामुळे जिल्हा आरोग्य प्रशासनाने प्राधान्य गटाची संख्या लक्षात घेऊन एक लाख १७ हजार डोसची मागणी केली. मात्र, सोमवारी जिल्ह्याला केवळ २९ हजार ७०० डोस पाठविण्यात आले. नागपूरसाठी एक लाख ३२ हजार, भंडारा जिल्हा २३ हजार ३००, गोंदिया १५ हजार ८०० व वर्धा जिल्ह्यासाठी १५ हजार डोस मंजूर करण्यात आले. चंद्रपूर जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. मृतकांची संख्याही सातत्याने वाढू लागल्याने जिल्हा प्रशासन हतबल झाले. अशा संकटाच्या काळात लसीकरण हा एक पर्याय आहे; परंतु मागणीनुसार जिल्ह्याला डोस मिळत नसल्याने पुन्हा केंद्र बंद ठेवण्याची वेळ प्रशासनावर येणार आहे.

चंद्रपूर शहरासाठी फक्त ३ हजार

चंद्रपूर शहरात रुग्णसंख्येने उच्चांक गाठला. लस घेणाऱ्या प्राधान्य गटातील लोकसंख्येचा विचार केल्यास प्रत्येक टप्प्यात सुमारे २० ते २५ हजार डोसची गरज लागू शकते. मात्र, फक्त ३ हजार डोस चंद्रपूर शहराच्या वाट्याला आले. त्यामुळे पंतप्रधान कशासाठी लस उत्सव साजरा करतात, असा प्रश्न विचारला जात आहे.