शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळवर बोलण्यापूर्वी पक्षाची परवानगी घ्या; वादानंतर भाजपचे सर्व मंत्री, नेते अन् इतरांना निर्देश
2
धक्कादायक! तक्रार करणाऱ्याला गाडीने चिरडले, DMK नेत्याला पोलिसांनी केली अटक
3
नेपाळमध्ये भारतीय बसवर हल्ला, प्रवाशांना लुटले, पर्यटकांना विमानाने परत आणले
4
'पोलंडमध्ये रशियाची घुसखोरी चुकीची, हे सर्व लवकरच संपेल'; ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त केली, फ्रान्सने राफेल पाठवले
5
ब्राझीलच्या माजी राष्ट्रपतींना सुनावली २७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा, निवडणूक हरल्यानंतर केलेली ती कृती भोवली
6
Python Hunting: अजगर मारून त्याचं मांस शिजवलं, दोन जणांना अटक! 
7
सिक्कीममध्ये निसर्गाचा कोप! भूस्खलनात ४ जणांचा मृत्यू, ३ जण बेपत्ता, बचावकार्य सुरू
8
PPF अकाऊंट होल्डरचा अचानक मृत्यू झाल्यास कशी होईल सेटलमेंट? रक्कम मॅच्युअर होण्याची वाट पाहावी लागेल का?
9
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
10
नेपाळचा पुढचा पंतप्रधान कोण? जेन झी तरुणांची राष्ट्राध्यक्ष रामचंद्र पौडेल यांच्याशी दुसऱ्यांदा चर्चा
11
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
12
नवरा सुपरस्टार तरीही पाय जमिनीवर, गर्वाचा लवलेशही नाही; भरत जाधव यांच्याप्रमाणेच त्यांची पत्नीही आहे अगदी साधी
13
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
14
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
15
कोकणातला 'कांतारा' रंगला की फसला? कसा आहे दिलीप प्रभावळकरांचा 'दशावतार' सिनेमा? वाचा रिव्ह्यू
16
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
17
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
18
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
19
बुलेट ट्रेनच्या १५७ किमीवरील कामांसाठी महत्त्वाकांक्षी करार, मुंबई-अहमदाबाद प्रवास होणार वेगाने
20
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक भरपाई देण्याची मागणी

By admin | Updated: July 27, 2016 01:21 IST

जुलैमध्ये झालेल्या संततधार पावसाने जिल्ह्यातील नदी, नाल्या जवळील व इतर शेतकऱ्यांची शेती खरडून जाणे, बांध वाहून जाणे

आम आदमी पार्टी : जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन सिंदेवाही : जुलैमध्ये झालेल्या संततधार पावसाने जिल्ह्यातील नदी, नाल्या जवळील व इतर शेतकऱ्यांची शेती खरडून जाणे, बांध वाहून जाणे, गाळ साचणे आदी प्रकार घडल्याने फार मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तसेच भाताची पऱ्हे व इतर पिके पाण्यात बुडून राहणे, वाहून जाणे व गाळ साचल्यामुळे बहुतांशी पीक नष्ट झाले आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना दुबार पेरणीचे संकट उद्भवले आहे. या सर्व नुकसानाग्रस्त शेतकऱ्यांना शासनातर्फे आर्थिक भरपाई देण्याची मागणी आम आदमी पक्षातर्फे करण्यात आली आहे. आधीच उत्पादन खर्चावर आधारीत भाव न देणाऱ्या शेतकरी विरोधी धोरणामुळे व निसर्गाच्या लहरीपणामुळे होणाऱ्या नापिकीला कंटाळून विदर्भातील शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे प्रमाण कमी व्हावे व नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीचा मोबदला त्यांना मिळावा म्हणून शेतकरी व गावनिहाय सर्व्हेक्षण व पंचनामे करून झालेली नुकसान भरपाई तात्काळ देण्यात यावी, असे निवेदन आम आदमी पार्टी सिंदेवाहीच्या वतीने सादर करण्यात आले. यावेळी आपचे पदाधिकारी, कार्यकर्ते व शेतकरी मनोहर पवार, जैयदेव श्रीरामे, खटूजी गुरनुले, गोमाजी मस्के, वंदना गजभिये, बोरकर, मेश्राम, विनायक गजभिये, रमेश भरडकर, आनंदराव मस्के, उद्धव लोखंडे, दिलीप बोरकर आदी उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)