शहरं
Join us  
Trending Stories
1
8 कोटी, १२ पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
2
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
3
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
4
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
5
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
6
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
7
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
8
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
9
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
10
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
11
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
12
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
13
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
14
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
15
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
16
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
17
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
18
 आणखी किती हिंमत हवी...! पुतीनसमोर पत्रकारानं मैत्रिणीला केलं प्रपोज अन्..
19
कांजूर डम्पिंगच्या दुर्गंधीवर तोडगा काढा; मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश; स्वच्छ हवेत श्वास घेणे काळाची गरज : महत्त्वपूर्ण निरीक्षण
20
बापरे, पश्चिम रेल्वेवर एकदाचाच ३० दिवसांचा मेगाब्लॉक! १०० लोकल रद्द झाल्याने हाल 
Daily Top 2Weekly Top 5

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक भरपाई देण्याची मागणी

By admin | Updated: July 27, 2016 01:21 IST

जुलैमध्ये झालेल्या संततधार पावसाने जिल्ह्यातील नदी, नाल्या जवळील व इतर शेतकऱ्यांची शेती खरडून जाणे, बांध वाहून जाणे

आम आदमी पार्टी : जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन सिंदेवाही : जुलैमध्ये झालेल्या संततधार पावसाने जिल्ह्यातील नदी, नाल्या जवळील व इतर शेतकऱ्यांची शेती खरडून जाणे, बांध वाहून जाणे, गाळ साचणे आदी प्रकार घडल्याने फार मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तसेच भाताची पऱ्हे व इतर पिके पाण्यात बुडून राहणे, वाहून जाणे व गाळ साचल्यामुळे बहुतांशी पीक नष्ट झाले आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना दुबार पेरणीचे संकट उद्भवले आहे. या सर्व नुकसानाग्रस्त शेतकऱ्यांना शासनातर्फे आर्थिक भरपाई देण्याची मागणी आम आदमी पक्षातर्फे करण्यात आली आहे. आधीच उत्पादन खर्चावर आधारीत भाव न देणाऱ्या शेतकरी विरोधी धोरणामुळे व निसर्गाच्या लहरीपणामुळे होणाऱ्या नापिकीला कंटाळून विदर्भातील शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे प्रमाण कमी व्हावे व नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीचा मोबदला त्यांना मिळावा म्हणून शेतकरी व गावनिहाय सर्व्हेक्षण व पंचनामे करून झालेली नुकसान भरपाई तात्काळ देण्यात यावी, असे निवेदन आम आदमी पार्टी सिंदेवाहीच्या वतीने सादर करण्यात आले. यावेळी आपचे पदाधिकारी, कार्यकर्ते व शेतकरी मनोहर पवार, जैयदेव श्रीरामे, खटूजी गुरनुले, गोमाजी मस्के, वंदना गजभिये, बोरकर, मेश्राम, विनायक गजभिये, रमेश भरडकर, आनंदराव मस्के, उद्धव लोखंडे, दिलीप बोरकर आदी उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)