शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

मौशी वीज उपकेंद्र मंजुरीसाठी ऊर्जामंत्र्यांकडे मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2017 23:52 IST

नागभीड तालुक्यातील १० ते १२ गावांसाठी मौशी येथे ३२ केव्ही वीज उपकेंद्र मंजूर करण्याची मागणी आ. कीर्ती भांगडिया यांनी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे केली आहे

ठळक मुद्देकीर्ती भांगडिया यांचे निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : नागभीड तालुक्यातील १० ते १२ गावांसाठी मौशी येथे ३२ केव्ही वीज उपकेंद्र मंजूर करण्याची मागणी आ. कीर्ती भांगडिया यांनी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे केली आहे. यासंदर्भात त्यांनी निवेदन दिले आहे.नागभीड तालुक्यातील मौशी हे गाव ब्रह्मपुरी वीज मंडळातंर्गत येत असून या परिसरामध्ये बहुसंख्य शेतकरी वर्ग आहे. मात्र, सध्या या परिसरात भारनियमन सुरू असल्यामुळे शेतपिकांना पाणी देणे शेतकºयांना अडचणीचे जात आहे. या परिसरात वीज समस्या नेहमीच उद्भवत असते. त्यामुळे १० ते १२ गावातील मध्यवर्ती ठिकाण असलेल्या मौशी येथे ३२ केव्ही स्वतंत्र विद्युत उपकेंद्र मंजूर झाल्यास परिसरातील वीज समस्या सुटू शकते, असे भांगडिया यांनी म्हटले आहे.भविष्यात मौशी परिसराला गोसेखुर्द प्रकल्पाचे पाणी मिळणार असल्याने मौशी येथे निर्माण होणाºया ३२ केव्ही उपकेंद्राद्वारे विजेची समस्या सुटून ग्रामीण कुटीर उद्योगांना चालना मिळू शकते. त्यामुळे मौशी येथे वीज उपकेंद्र स्थापन करण्यासाठी राज्य शासनाकडून उपाययोजना करण्याची मागणी आ. भांगडिया यांनी केली आहे.