शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
3
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
4
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
5
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
6
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
7
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
8
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
9
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
10
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
11
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
12
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
13
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
14
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
15
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
16
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
17
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
18
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
19
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?
20
झेलेन्स्की यांना बोलावले, पुतिन यांच्याशीही पुन्हा चर्चा करणार; अलास्का बैठकीनंतर डोनाल्ड ट्रम्प यांची नवी तयारी

पाणी प्रश्न टाळण्यासाठी बॅरेज बंधारे बांधण्याची मागणी

By admin | Updated: August 20, 2014 23:27 IST

दोन महिन्यापूर्वी विदर्भासह संपूर्ण महाराष्ट्रात पाणी प्रश्न भेडसावत असताना याची झळ महाराष्ट्र-तेलंगनाच्या सीमेलगत असलेल्या राजुरा, कोरपना, जिवती तालुक्याला सहन करावी लागली.

सास्ती : दोन महिन्यापूर्वी विदर्भासह संपूर्ण महाराष्ट्रात पाणी प्रश्न भेडसावत असताना याची झळ महाराष्ट्र-तेलंगनाच्या सीमेलगत असलेल्या राजुरा, कोरपना, जिवती तालुक्याला सहन करावी लागली. अनेक गावांमध्ये फेब्रुवारी-मार्च महिन्यातच पाण्याचा प्रश्न निर्माण झाल्याचे चित्र आहे. आताच निसर्गाच्या लहरीपणाचा फटका शेतकऱ्यांना बसला असून दुबार पेरणीच्या संकटाला समोर जावे लागत आहे. भविष्यात जलसंकटाची ही स्थिती भयावह होऊ शकते. जलसंकट टाळण्यासाठी वर्धा नदीवर बॅरेज बंधारे बांधण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते सुधाकर गोरे यांनी केली आहे.शेतकऱ्यांनी राजुरा विधानसभा क्षेत्राला दुष्काळग्रस्त घोषित करण्याची मागणी केली आहे. पावसाच्या लांबणीने कोरड्या दुष्काळाचे सावट पसरलेले असताना शासनाने याची कोणत्याही प्रकारची दखल घेतली नाही. राजुरा, कोरपना तालुक्यात वाढते उद्योगधंदे व प्रकल्पांकरिता पाण्याचा अधिक प्रमाणात उपसा होत असल्यामुळे भूजल पातळी झपाट्याने खाली जात आहे. भविष्यातील जलसंकट लक्षात घेऊन जिल्ह्यात वर्धा नदीवर बॅरेज बंधारा बांधण्याची गरज आहे. बॅरेज बंधारा बांधण्यासाठी अतिशय योग्य ठिकाण भोयगाव-जैतापूर-कुर्ली गावाच्या दरम्यान वन विभागाची ३५० एकर झुडपी जंगलाची जागा वर्धा नदीला लागलेली आहे. ही गावे नदी किनाऱ्यावरुन तीन ते चार किमी अंतरावर आहे. याच बरोबर नदीच्या पलीकडे असलेले चंद्रपूर तालुक्यातील पिपरी धानोरा हे गाव दोन ते तीन किमी अंतर येत असल्याने या ठिकाणी बॅरेज बंधारा बांधल्यास कोणत्याही शेतकऱ्यांना किंवा गाववासीयांना प्रकल्प बाधित व्हावे लागणार नाही. या परिसरातील शेतकऱ्यांबरोबर राजुरा, कोरपना, चंद्रपूर तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांना सिंचनाचा लाभ घेता येतील.तालुक्यातुन बारमाही वाहणाऱ्या वर्धा, पैनगंगा नदीतून जिल्ह्यातील मोठ्या शहरांना, एमआयडीसी सह अनेक प्रकल्पांना पाणीपुरवठा करण्यात येतो. या नदीवर एकही बॅरेज नसल्यामुळे बारमाही वाहणारे पाणी वाहून जाते. याचा तिळमात्र फायदा येथील शेतकऱ्यांना झालेला नाही. राजुरा कोरपना तालुक्यात सिंचनाचे प्रमाण अतिशय कमी प्रमाणात असून सिंचनाच्या सोईकरिता वर्धा नदीवर बॅरेज बंधारा बांधने गरजेचे आहे. अन्यथा सर्वांसाठी जीवनदायिनी वर्धा नदी कोरडी पडेल, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली आहे. (वार्ताहर)