शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपा, शिंदेसेनेत युतीसाठी कोणतीही अडचण नाही; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची स्पष्टोक्ती
2
भररस्त्यात पाठलाग करून मंगेश काळोखेंवर केले २७ वार; आरोपींच्या निर्दयीपणाचे 'सीसीटीव्ही' फुटेज समोर
3
Solapur Municipal Election: काँग्रेसने २० उमेदवारांच्या नावाची केली घोषणा, पहिल्या यादीत कुणाची नावे?
4
खोपोलीतील घटना अत्यंत निंदनीय, निषेध करत सुनिल तटकरे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली मोठी मागणी
5
शिंदेसेनेच्या बैठकीत राडा? शहरप्रमुख नाना भानगिरे रागारागात बाहेर पडले आणि गेले निघून; व्हिडीओ आला समोर
6
बांगलादेशमध्ये एका मिस्ट्री गर्लची एंट्री, बनू शकते भविष्यातील शेख हसीना किंवा खलिदा झिया
7
Sukesh Chandrashekhar : "२१७ कोटी देण्यास तयार, पण...", महाठग सुकेश चंद्रशेखरचा मास्टरस्ट्रोक; खंडणी प्रकरणात मोठी ऑफर
8
AUS vs ENG: डोक्यात निवृत्तीचा विचार, मनात भीती… आणि त्यानेच सामना फिरवला!
9
कौतुकास्पद! आईने दागिने विकून शिकवलं, १० वेळा अपयश आलं पण लेकाने वडिलांचं स्वप्न पूर्ण केलं
10
विराट कोहलीचा VIDEO घेण्यासाठी बस ड्रायव्हरची भन्नाट 'आयडिया', सोशल मीडियावर क्लिप VIRAL
11
राजकारण पेटलं! कर्नाटकमध्ये काँग्रेस सरकारची बुलडोझर कारवाई; ४०० हून अधिक घरं पाडली
12
शाकंभरी नवरात्र २०२५: शाकंभरी मातेच्या कृपेने 'या' राशींचे उजळणार भाग्य; २०२६ ची होणार स्वप्नवत सुरुवात!
13
"भाजपाने आमच्या पाठीत खंजीर खुपसला, मतदारांचाही विश्वासघात करेल"; राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष मुळीक यांचे टीकास्त्र
14
Battle Of Galwan Teaser: मौत से क्या डरना...! 'बॅटल ऑफ गलवान'चा टीझर, 'या' दिवशी सिनेमा रिलीज होणार
15
जिवलग जीवाचा... विराट कोहली!! स्वत:चीच विकेट घेणाऱ्या गोलंदाजाला दिलं एकदम खास 'गिफ्ट'
16
सोन्या-चांदीची भरारी, विदेशींची माघार अन् भारतीयांचा एल्गार! हे वर्ष कोणासाठी ठरलं फायद्याचं
17
जिममध्ये जाणाऱ्यांनो सावधान! १९ वर्षीय विद्यार्थ्याचा प्रोटीन शेक प्यायल्याने मृत्यू; नेमकं काय घडलं?
18
प्रशासनाचा गलथान कारभार! निवडणूक एका ठिकाणी, अधिकाऱ्यांनी प्रक्रिया केली दुसरीकडे; उमेदवाराच्या विजयानंतर शासनाला आली जाग
19
बांगलादेशमध्ये उलटफेर! शेख हसीना यांना विरोध करणारा पक्ष फुटला,जमातमध्ये आश्रय घेतला
20
TATA Steel विरोधात खटला दाखल; १४८ अब्ज रुपयांच्या नुकसान भरपाईची मागणी, प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

पाणी प्रश्न टाळण्यासाठी बॅरेज बंधारे बांधण्याची मागणी

By admin | Updated: August 20, 2014 23:27 IST

दोन महिन्यापूर्वी विदर्भासह संपूर्ण महाराष्ट्रात पाणी प्रश्न भेडसावत असताना याची झळ महाराष्ट्र-तेलंगनाच्या सीमेलगत असलेल्या राजुरा, कोरपना, जिवती तालुक्याला सहन करावी लागली.

सास्ती : दोन महिन्यापूर्वी विदर्भासह संपूर्ण महाराष्ट्रात पाणी प्रश्न भेडसावत असताना याची झळ महाराष्ट्र-तेलंगनाच्या सीमेलगत असलेल्या राजुरा, कोरपना, जिवती तालुक्याला सहन करावी लागली. अनेक गावांमध्ये फेब्रुवारी-मार्च महिन्यातच पाण्याचा प्रश्न निर्माण झाल्याचे चित्र आहे. आताच निसर्गाच्या लहरीपणाचा फटका शेतकऱ्यांना बसला असून दुबार पेरणीच्या संकटाला समोर जावे लागत आहे. भविष्यात जलसंकटाची ही स्थिती भयावह होऊ शकते. जलसंकट टाळण्यासाठी वर्धा नदीवर बॅरेज बंधारे बांधण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते सुधाकर गोरे यांनी केली आहे.शेतकऱ्यांनी राजुरा विधानसभा क्षेत्राला दुष्काळग्रस्त घोषित करण्याची मागणी केली आहे. पावसाच्या लांबणीने कोरड्या दुष्काळाचे सावट पसरलेले असताना शासनाने याची कोणत्याही प्रकारची दखल घेतली नाही. राजुरा, कोरपना तालुक्यात वाढते उद्योगधंदे व प्रकल्पांकरिता पाण्याचा अधिक प्रमाणात उपसा होत असल्यामुळे भूजल पातळी झपाट्याने खाली जात आहे. भविष्यातील जलसंकट लक्षात घेऊन जिल्ह्यात वर्धा नदीवर बॅरेज बंधारा बांधण्याची गरज आहे. बॅरेज बंधारा बांधण्यासाठी अतिशय योग्य ठिकाण भोयगाव-जैतापूर-कुर्ली गावाच्या दरम्यान वन विभागाची ३५० एकर झुडपी जंगलाची जागा वर्धा नदीला लागलेली आहे. ही गावे नदी किनाऱ्यावरुन तीन ते चार किमी अंतरावर आहे. याच बरोबर नदीच्या पलीकडे असलेले चंद्रपूर तालुक्यातील पिपरी धानोरा हे गाव दोन ते तीन किमी अंतर येत असल्याने या ठिकाणी बॅरेज बंधारा बांधल्यास कोणत्याही शेतकऱ्यांना किंवा गाववासीयांना प्रकल्प बाधित व्हावे लागणार नाही. या परिसरातील शेतकऱ्यांबरोबर राजुरा, कोरपना, चंद्रपूर तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांना सिंचनाचा लाभ घेता येतील.तालुक्यातुन बारमाही वाहणाऱ्या वर्धा, पैनगंगा नदीतून जिल्ह्यातील मोठ्या शहरांना, एमआयडीसी सह अनेक प्रकल्पांना पाणीपुरवठा करण्यात येतो. या नदीवर एकही बॅरेज नसल्यामुळे बारमाही वाहणारे पाणी वाहून जाते. याचा तिळमात्र फायदा येथील शेतकऱ्यांना झालेला नाही. राजुरा कोरपना तालुक्यात सिंचनाचे प्रमाण अतिशय कमी प्रमाणात असून सिंचनाच्या सोईकरिता वर्धा नदीवर बॅरेज बंधारा बांधने गरजेचे आहे. अन्यथा सर्वांसाठी जीवनदायिनी वर्धा नदी कोरडी पडेल, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली आहे. (वार्ताहर)