शहरं
Join us  
Trending Stories
1
पैसेच नव्हते, मग दुसऱ्याच्या तुटलेल्या बॅटने खेळलो, जिंकलोही; तिलक वर्माने सांगितला आपला प्रवास
2
आज हायव्होल्टेज लढत! भारत-पाकिस्तान महिला संघ आज भिडणार, हस्तांदोलन करणार? 
3
रोहित शर्माची उचलबांगडी, ऑस्ट्रेलिया दौऱ्यात शुभमन गिलकडे नेतृत्व; विराटसह संघात ठेवले हेच...
4
‘त्या’ कफ सिरपच्या नमुन्यांत भेसळ; उत्पादन, विक्री थांबवण्याचे आदेश
5
पाकव्याप्त काश्मीरमध्ये आंदोलन, शरीफ नरमले; आंदोलन मागेही घेतले
6
केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांचे शिर्डी विमानतळावर आगमन
7
आयटीनंतर ॲाटो क्षेत्रातही कर्मचारी कपात, ही कंपनी ३००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार   
8
“RSS-BJPने ओबीसींचा घात केला, मोहन भागवत कधी गजानन महाराजांच्या दर्शनाला गेले का”: आंबेडकर
9
टॉपर तरुणीला गुंगीचे औषध देऊन अत्याचार; स्वतःला संपवायला निघालेल्या माय-लेकीला माजी सैनिकाने वाचवलं
10
"भारत माझी मातृभूमी, तर पाकिस्तान…’’, दानिश कनेरियाचं मोठं विधान, नागरिकत्वाबाबत म्हणाला  
11
...तर रोहित-विराटवर वनडे वर्ल्ड कप स्पर्धेआधीच निवृत्ती घेण्याची वेळ येणार?
12
भारतीय तरुणांना फसवून सायबर गुन्ह्यांसाठी जुंपणारी आंतरराष्ट्रीय टोळी उघडकीस; दोघे अटकेत, भारतीय आरोपींसह चिनी कनेक्शन आले समोर 
13
बिहारमध्ये लालू यादवांच्या निवासस्थांनी उमेदवारीवरून गोंधळ, घरात घुसले कार्यकर्ते, म्हणाले, आम्हाला...  
14
पावसाच्या 'बॅटिंग'च्या जोरावर श्रीलंकेनं उघडलं खातं; पाकला पराभूत करताच टीम इंडिया होईल टॉपर
15
अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या घालून हत्या; शिक्षणासोबत पेट्रोल पंपावर करत होता पार्ट-टाईम काम
16
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
17
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
18
निसर्ग अशांतच! अतिवृष्टीनंतर आता ‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा
19
वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार; रोहित शर्मा दुसरा, मग पहिला कोण?
20
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी

चिमूर क्रांती जिल्ह्याची मागणी ऐरणीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2019 21:38 IST

चिमूर क्रांती जिल्हा निर्माण करावा, या मागणीकरिता सर्वपक्षीय नेत्यांनी तहसीलदार संजय नागतिळक यांच्यामार्फत मुख्यमंत्री देवेंद्र्र फडणवीस यांच्याकडे शनिवारी निवेदन सादर केले.

ठळक मुद्देमुख्यमंत्र्यांना निवेदन : जिल्ह्यासाठी पायाभूत सुविधा असल्याचा कृती समितीचा दावा

लोकमत न्यूज नेटवर्कचिमूर : चिमूर क्रांती जिल्हा निर्माण करावा, या मागणीकरिता सर्वपक्षीय नेत्यांनी तहसीलदार संजय नागतिळक यांच्यामार्फत मुख्यमंत्री देवेंद्र्र फडणवीस यांच्याकडे शनिवारी निवेदन सादर केले.चिमूर जिल्हा निर्माण व्हावा, याकरिता १९८३ पासून अनेक आंदोलने, निवेदन व पत्रव्यवहारद्वारे मागण केली जात आहे. मात्र शासनाने याकडे दुर्लक्ष केले. या आंदोलनदरम्यान ६ जानेवारी२००२ रोजी तहसील कार्यालयाची इमारत जाळण्यात आली होती. पोलिसांनी अनेकांनी अटक केली. त्यामुळे नागरिकांसाठी हा काळा दिवस ठरला होता. चिमूर जिल्हा निर्मितीची मागणी सर्वप्रथम स्वातंत्रसैनिक दामोदर काळे यांनी केली होती. त्यानंतर सर्वपक्षीय नेते, कार्यकर्ते व सामाजिक संघटनांनी एकत्र येऊन चिमूर क्रांती जिल्हा कृती समिती गठित करून पाठपुरावा करत आहेत.शिष्टमंडळात समितीचे अध्यक्ष नरेंद्र राजूरकर प्रा. संजय पिठाडे, माधव बिरजे, मनीष नंदेश्वर, सुरेश डांगे, भरत बंडे, रामदास हेमके, राजू हिंगणकर, राजेंद्र लोणारे, सिंधु रामटेके, अनिल डगवार, प्रा. राम राऊत, प्रकाश बोकारे, अरूण लोहकरे, अतुल लोथे, विलास डांगे, उमेश शंभरकर, अभय धोपटे, रामकृष्ण राऊत, प्रवीण वरगंटीवार, डॉ. हेमंत जांभुळे आदी उपस्थित होते.काळे गुरूजींचे स्मरणचिमूर क्रांती जिल्हा कृती समितीद्वारे सर्वपक्षीय नेत्यांनी तहसीलदारांना निवेदन देताना स्वातंत्र्यसैनिक दामोदर काळे गुरुजींची आठवण सर्वांना येत होती. चिमूर जिल्हा निर्मितीच्या प्रत्येक आंदोलनात ते अग्रणी होते. दोन वर्षांपूर्वी त्यांचे निधन झाले. शासन दरबारी प्रभावीपणे पाठपुरावा करणारे लोकनेते म्हणून गुरूजीचे नाव कायम स्मरणात राहणार आहे.दोन हजार नागरिकांच्या स्वाक्षऱ्याचिमूर जिल्हा निर्मितीकरिता प्रा. दादा दहिकार यांनी दोन हजार नागरिकांच्या स्वाक्षऱ्यांचे निवेदन तहसीलदाराला देण्यात आले. मागील १५ दिवसांपासून स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आली होती. २००२ मध्ये प्रा. दहीकर यांनी १३ दिवसांचा तुरूंगवास भोगला आहे. चिमूर जिल्हा निर्माण झाला नाही तर ‘जोडा मारो’ आंदोलन करण्याचाही त्यांनी इशारा दिला आहे.