शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीत सारे काही आलबेल? मंत्र्यांच्या नाराजीनंतर शिंदेनी दरे नाही, दिल्ली गाठली; अमित शहांकडे तक्रार...
2
"राजा रघुवंशी प्रमाणे...!" ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानला धडा शिकवणाऱ्या जवानाला वाटते भीती, 'सोनमसारखं' करण्याची धमकी देतेय पत्नी!
3
माळेगावात तणाव! शरद पवार राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष नितीन तावरे यांच्यावर जीवघेणा हल्ला 
4
₹१०००००००००००००० स्वाहा...! 6 आठवड्यांत क्रिप्टो मार्केट क्रॅश, बिटकॉइन 27% घसरला; गुंतवणूकदारांवर डोकं झोडून घ्यायची वेळ
5
'घातपाताच्या सूत्रधाराला वाचवणाऱ्या सरकारचे संरक्षण नको!' मनोज जरांगेंचा मोठा निर्णय
6
क्रिकेट चाहत्यांना धक्का! विश्वचषकात भारत-पाकिस्तान सामना होणार नाही, आयसीसीने ग्रुप स्टेजसाठी घेतला मोठा निर्णय...
7
KTM च्या बाईकना आग लागण्याचा धोका; Duke मॉडेल माघारी बोलविल्या...
8
एक 'ट्रिप'... एक 'ट्रिक'... अन् उभा राहिला १.५ कोटींचा उद्योग; कोल्हापूरच्या अद्वैतचा नादच खुळा
9
Travel : भारतापासून हजारो मैल दूर वसलाय 'मिनी इंडिया'; दिसायला सुंदर, फिरायला बेस्ट अन् इतिहासही आहे रंजक!
10
"मी अनेक वेळा रात्रीचे जेवण करत नाही, विचार करते...!"; करण जौहरसोबत अगदी मोकळेपणानं बोलली सानिया मिर्झा
11
नवी Honda City पाहिलीत का? कधी येणार; डिझाईन आणि प्लॅटफॉर्मची माहिती लीक झाली...
12
"तुमचा अहंकार ड्रेसिंग रुममध्ये ठेवा!" गावसकरांनी गंभीर-आगरकरांनाही सुनावलं
13
"जेव्हापासून बिहारचे निकाल लागलेत, माझी झोपच उडालीये", प्रशांत किशोरांना कोणत्या गोष्टीची सल?
14
अनमोल बिश्नोईला ११ दिवसांची कोठडी; ३५ हून अधिक हत्यांशी त्याचा थेट संबंध असल्याचा 'NIA'चा दावा
15
अल फलाह विद्यापीठाचे संस्थापक जवाद सिद्दीकींना ४१५ कोटींच्या फसवणुकी प्रकरणी ईडी कोठडी; १३ दिवसांची रिमांड
16
"जेव्हा मुस्लीम अल्लाहवर विश्वास ठेवतो, तेव्हा शत्रूवर फेकलेली मातीही मिसाइल बनते, पुन्हा युद्द झाले तर..."; मुनीर यांची 'कोल्हेकुई' 
17
'हो, आम्ही काश्मीरपासून लाल किल्ल्यापर्यंत हल्ले केले... ', सीमापार दहशतवादाबद्दल पाक नेत्याची धक्कादायक कबुली
18
Delhi Blast : "आता कुटुंबाचं पोट कसं भरणार?"; दिल्ली स्फोटातील जखमींची मन हेलावून टाकणारी गोष्ट
19
अफगाणिस्तानचे उद्योगमंत्री भारत दौऱ्यावर; 'या' महत्वाच्या विषयांवर होणार चर्चा...
20
जुन्या वाहन मालकांना जबर धक्का...! वाहनांचे आयुष्य १५ वरून १० वर्षे झाले, फिटनेसचे शुल्क १० पटींनी वाढविले...
Daily Top 2Weekly Top 5

चिमूर क्रांती जिल्ह्याची मागणी ऐरणीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2019 21:38 IST

चिमूर क्रांती जिल्हा निर्माण करावा, या मागणीकरिता सर्वपक्षीय नेत्यांनी तहसीलदार संजय नागतिळक यांच्यामार्फत मुख्यमंत्री देवेंद्र्र फडणवीस यांच्याकडे शनिवारी निवेदन सादर केले.

ठळक मुद्देमुख्यमंत्र्यांना निवेदन : जिल्ह्यासाठी पायाभूत सुविधा असल्याचा कृती समितीचा दावा

लोकमत न्यूज नेटवर्कचिमूर : चिमूर क्रांती जिल्हा निर्माण करावा, या मागणीकरिता सर्वपक्षीय नेत्यांनी तहसीलदार संजय नागतिळक यांच्यामार्फत मुख्यमंत्री देवेंद्र्र फडणवीस यांच्याकडे शनिवारी निवेदन सादर केले.चिमूर जिल्हा निर्माण व्हावा, याकरिता १९८३ पासून अनेक आंदोलने, निवेदन व पत्रव्यवहारद्वारे मागण केली जात आहे. मात्र शासनाने याकडे दुर्लक्ष केले. या आंदोलनदरम्यान ६ जानेवारी२००२ रोजी तहसील कार्यालयाची इमारत जाळण्यात आली होती. पोलिसांनी अनेकांनी अटक केली. त्यामुळे नागरिकांसाठी हा काळा दिवस ठरला होता. चिमूर जिल्हा निर्मितीची मागणी सर्वप्रथम स्वातंत्रसैनिक दामोदर काळे यांनी केली होती. त्यानंतर सर्वपक्षीय नेते, कार्यकर्ते व सामाजिक संघटनांनी एकत्र येऊन चिमूर क्रांती जिल्हा कृती समिती गठित करून पाठपुरावा करत आहेत.शिष्टमंडळात समितीचे अध्यक्ष नरेंद्र राजूरकर प्रा. संजय पिठाडे, माधव बिरजे, मनीष नंदेश्वर, सुरेश डांगे, भरत बंडे, रामदास हेमके, राजू हिंगणकर, राजेंद्र लोणारे, सिंधु रामटेके, अनिल डगवार, प्रा. राम राऊत, प्रकाश बोकारे, अरूण लोहकरे, अतुल लोथे, विलास डांगे, उमेश शंभरकर, अभय धोपटे, रामकृष्ण राऊत, प्रवीण वरगंटीवार, डॉ. हेमंत जांभुळे आदी उपस्थित होते.काळे गुरूजींचे स्मरणचिमूर क्रांती जिल्हा कृती समितीद्वारे सर्वपक्षीय नेत्यांनी तहसीलदारांना निवेदन देताना स्वातंत्र्यसैनिक दामोदर काळे गुरुजींची आठवण सर्वांना येत होती. चिमूर जिल्हा निर्मितीच्या प्रत्येक आंदोलनात ते अग्रणी होते. दोन वर्षांपूर्वी त्यांचे निधन झाले. शासन दरबारी प्रभावीपणे पाठपुरावा करणारे लोकनेते म्हणून गुरूजीचे नाव कायम स्मरणात राहणार आहे.दोन हजार नागरिकांच्या स्वाक्षऱ्याचिमूर जिल्हा निर्मितीकरिता प्रा. दादा दहिकार यांनी दोन हजार नागरिकांच्या स्वाक्षऱ्यांचे निवेदन तहसीलदाराला देण्यात आले. मागील १५ दिवसांपासून स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आली होती. २००२ मध्ये प्रा. दहीकर यांनी १३ दिवसांचा तुरूंगवास भोगला आहे. चिमूर जिल्हा निर्माण झाला नाही तर ‘जोडा मारो’ आंदोलन करण्याचाही त्यांनी इशारा दिला आहे.