शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
2
राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक; तरुण Kiss घेऊन पळाला, व्हिडिओ व्हायरल...
3
"वडिलांच्या नवीन मर्सिडीजवर विपिनची नजर, ६० लाखांची मागणी", निक्कीच्या भावाने मांडली व्यथा
4
बायकोला जिवंत जाळल्याचा आरोप असलेल्या पतीची पहिली प्रतिक्रिया, पत्नीच्या हत्येमागील कारण काय सांगितले?
5
पहिल्यांदाच मिझोरममध्ये पोहोचली रेल्वे; १४२ पूल अन् ४८ बोगद्यांद्वारे तयार झाला मार्ग...
6
निवृत्तीनंतर चेतेश्वर पुजाराला BCCI किती पेन्शन देणार? निवृत्त वेतनासाठी कोणतं सूत्र वापरतात?
7
खुशखबर...! पुढच्याच महिन्यात मारुती नवी धाकड SUV आणणार; क्रेटा, सेल्टोसला थेट टक्कर देणार, किंमतही असणार या सर्वांपेक्षा कमी!
8
ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही रशियाचे युक्रेनवरील हल्ले सुरूच, दोन गावांवरही कब्जा!
9
नेतन्याहू यांचा 'कंट्रोल गाझा' प्लॅन सुरू! इस्रायली हल्ल्यात ६३ जणांचा मृत्यू; पुढे काय होणार?
10
गर्भवती पत्नीची निर्घृण हत्या, मृतदेहाचे तुकडे करून पतीने लपवले; धक्कादायक घटनेने परिसर हादरला!
11
"रोज म्हणतात व्होट चोरी... व्होट चोरी..., यांचं डोकं चोरी झालंय!" देवेंद्र फडणवीस यांचा विरोधकांवर हल्लाबोल; स्पष्टच बोलले
12
३० वर्षीय पत्नीने प्रियकरासोबत रचला कट, ६० वर्षीय पतीला जंगलात नेऊन आवळला गळा
13
घसा खूपच खवखवतोय अन् खोकलाही जाता जाईना... 'या' ६ गोष्टी आहेत रामबाण उपाय
14
'कर्नाटक-महाराष्ट्रात मतचोरी; बिहारमध्ये होऊ देणार नाही', राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर निशाणा
15
५,००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल लखपती? जाणून घ्या १५ वर्षांत किती परतावा मिळेल
16
"मर्यादेत राहा...!"; आशिया कपमध्ये भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी वसीम अक्रमचा इशारा, नेमकं काय म्हणाला?
17
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी ६८ अर्ज; अनेक खासदारांच्या बनावट स्वाक्षरी केल्याचे उघड
18
सोहम बांदेकरसोबत लग्नाच्या चर्चांनंतर अभिनेत्री पूजाने पहिल्यांदाच शेअर केली स्टोरी, म्हणाली...
19
८व्या वेतन आयोगात बँक कर्मचाऱ्यांचे पगारही वाढतील का? कधी होणार लागू? मोठी अपडेट समोर
20
Sara Ali Khan : जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन! सारा अली खानने फक्त 'या' २ गोष्टी सोडून कमी केलं ४५ किलो वजन

नरेश पुगलियांकडून मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी

By admin | Updated: September 2, 2014 23:37 IST

लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रामध्ये काँग्रेसच्या झालेल्या पिछाडीला मुख्यमंत्री या नात्याने पृथ्वीराज चव्हाण हेच जबाबदार आहेत. तरीही पक्षाच्या या पराभवाला राहूल गांधी यांचा कचखाऊपणा जबाबदार

चंद्रपूर : लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रामध्ये काँग्रेसच्या झालेल्या पिछाडीला मुख्यमंत्री या नात्याने पृथ्वीराज चव्हाण हेच जबाबदार आहेत. तरीही पक्षाच्या या पराभवाला राहूल गांधी यांचा कचखाऊपणा जबाबदार असल्याचे त्यांनी केलेले विधान स्वत:ची निष्क्रियता आणि निर्णयक्षमता लपविण्यासाठी आहे. त्यामुळे मुख्यमंत्रीपदाचा राजिनामा देऊन त्यांनी प्रायश्चित्त घ्यावे, असे आवाहन माजी खासदार नरेश पुगलिया यांनी मंगळवारी सायंकाळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत केले.लोकसभेतील काँग्रेसच्या पराभवाला युपीए-२ सरकारची वाईट प्रतिमा आणि राहूल गांधी यांचा कचखाऊपणा जबाबदार असल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी अलिकडे दिली होती. या पार्श्वभूमीवर घेतलेल्या पत्रकार परिषदेत पुगलिया म्हणाले, पृथ्वीराज चव्हाण यांची एकाधिकारशाही संपविण्यासाठी पक्षाने त्यांच्या अधिकारांचे विकेंद्रीकरण केले. त्यामुळे तोल सुटल्याने आपल्या मर्यांदांचे भान विसरून त्यांनी खुद्द पक्ष नेतृत्वावरच असा आरोप केला आहे. मुख्यमंत्र्यांनी पक्षनेतृत्वाबद्दल केलेले नकारात्मक वक्तव्य पक्षाची प्रतिमा मलिन करणारी असून पक्षकार्यकर्त्यांच्या आदराला धक्का पोहचविणारी आहे. प्रत्यक्षात मुख्यमंत्री या नात्याने ते अकार्यक्षम राहीले आहेत. अलिकडे दिसणारी कार्यक्षमता गेल्या दोन वर्षात दिसली असती तर पक्षाला फायदा झाला असता. मात्र आपल्या निष्क्रियतेचे खापर राहूल गांधींच्या माथी फोडण्याचा हा प्रकार चुकीचा असल्याची टीका त्यांनी केली. मुख्यमंत्र्याच्या या अस्वस्थेमागे बरीच कारणे असल्याचे सांगून ते म्हणाले, लोकसभा निवडणुकीत सक्षम उमेदवारांना तिकीटा देण्याऐवजी स्वमर्जीतील व्यक्तींना तिकीटा दिल्याने पराभव पहावा लागला. ही जबाबदारी त्यांची असताना नेतृत्वावर आरोप कितपत योग्य आहे, असा प्रश्नही उपस्थित केला. (जिल्हा प्रतिनिधी)