शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
2
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
3
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
4
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
5
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
6
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
7
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
8
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
9
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
10
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
11
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
12
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
13
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
14
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
15
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
16
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
17
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
18
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
19
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
20
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...

बाजारात शीतपेयाची मागणी वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2019 22:41 IST

उन्हाची दाहकता कमी शमवण्यासाठी अनेकजण आईस्क्रीम खाणे वा थंडपेय पिणे पसंत करतात. सध्या शहरातील विविध भागात थाटलेल्या आईस्क्रीम पार्लर व रसवंतीच्या दुकानांवर नागरिक व विशेषत: बच्चे कंपनीची गर्दी मोठ्या प्रमाणावर वाढल्याचे दिसून येत आहे. यातून अनेकांना हंगामी रोजगार मिळाला आहे.

ठळक मुद्देमिळाला हंगामी रोजगार : शहरातील प्रमुख मार्गावर हातठेले

लोकमत न्यूज नेटवर्कआयुधनिर्माणी (भद्रावती): उन्हाची दाहकता कमी शमवण्यासाठी अनेकजण आईस्क्रीम खाणे वा थंडपेय पिणे पसंत करतात. सध्या शहरातील विविध भागात थाटलेल्या आईस्क्रीम पार्लर व रसवंतीच्या दुकानांवर नागरिक व विशेषत: बच्चे कंपनीची गर्दी मोठ्या प्रमाणावर वाढल्याचे दिसून येत आहे. यातून अनेकांना हंगामी रोजगार मिळाला आहे.अलिकडे सूर्य आग ओकायला लागला आहे. या उन्हामुळे अंगाची लाहीलाही होत आहे. साहजिकच यापासून थंडावा लाभावा, यासाठी उन्हाळ्यात थंड पदार्थ खाण्याकडे व शितपेय पिण्याकडे सर्वाधिक कल दिसून येत आहे. नागरिकांची पसंती लक्षात घेऊन चतूर दुकानदार विविध कंपन्यांचे आईस्क्रीम, ज्युस, लस्सी, कुल्फी, चोकोबार तथा शितपेयाची दुकाने मोठया प्रमाणात थाटतात. ऊसाच्या ताज्या रसाची रसवंतीची व लिंबू शरबताच्या गाड्याही मोठया प्रमाणावर लावल्या जातात. शहरात खाद्यपदार्थांच्या दुकानांप्रमाणेच आईस्क्रीम पार्लरची संख्याही मोठया प्रमाणात वाढली आहे. आईस्क्रीमनंतर लस्सी व चोकोबारला बच्चे कंपनी जास्त पसंती देत असल्याचे दिसून येते. अमुक कंपनीचेच आईस्क्रीम ग्राहकांपर्यंत जावे, यासाठी नामांकित कंपन्या आईस्क्रीम विक्रेत्यांना विशेष पॅकेज देत आहेत. या पॅकेजमध्ये डिप फ्रीज, दुकानाला लागणारे फर्निचर आदी सोयीसवलतींचा अंतर्भाव असल्याचे सांगितले जाते. वीजदर वाढल्याने मागील दोन तीन वर्षांपासून आईस्क्रीम व्यवसाय डबघाईस आला आहे. सध्या बाजारात दहा रुपयांपासून शंभर सव्वाशे रुपये पर्यंत किमतीचे आईस्क्रीम बाजारात खवय्यांसाठी उपलब्ध आहे. तप्त उन्हाळा सुरू झाला. त्यामुळे भद्रावती शहरातील मुख्य रस्त्याच्या कडेला पायनापल ज्युस, लस्सी, उसाचा रस, लिंबू शरबताची दुकाने मोठया प्रमाणात थाटली आहे. या हंगामी दुकानात थंड पदार्थ थोडे स्वस्त भावाने मिळत असल्याने ग्राहकांचा कल या दुकानांकडेही आहे. विद्युत बिलांमुळे हा व्यवसाय काहीप्रमाणात आर्थिक कोंडीत सापडला. शहरात उन्हाळ्याव्यतिरिक्त बाराही महिने आईस्क्रीम खाणारा वर्ग असल्याचे शहरात दिसून येते.वीज दरवाढीचा फटकाअनेक कुटुंबात जेवण केल्यानंतर अथवा कौटुंबिक उत्सवप्रसंगी स्वीट डिश म्हणून आईस्क्रीम खाण्याची पध्दत रूढ झाली आहे. मात्र दीर्घकाळ विद्युत पुरवठा खंडित असल्यास या व्यवसायात नुकसान होत असते. वीजदरवाढ होत राहिल्यास आगामी हा व्यवसाय गुंडाळल्याशिवाय पर्याय नाही, अशी माहिती एका विके्रत्याने ‘लोकमत’ शी बोलताना दिली. या व्यवसायात अनेकदा आर्थिक नुकसान होते. पण हंगामी रोजगारासाठी हा व्यवसाय चांगला पर्याय आहे, असेही त्यांनी सांगितले.