शहरं
Join us  
Trending Stories
1
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
2
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
3
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
4
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
5
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
6
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
7
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
8
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
9
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
10
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
11
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
12
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
13
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
14
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
15
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
16
"अभिनेत्री केवळ शोभेच्या बाहुल्या...", दीपिका पादुकोणने मांडलं स्पष्ट मत; करिअरबद्दल म्हणाली...
17
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा
18
"लक्ष्याने जगाचा निरोप घेण्यापूर्वी मला..."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याने सांगितला भावुक किस्सा
19
Solapur Accident: वडिलांचा अंत्यविधी उरकून परतताना लेकालाही मृत्यूनं गाठलं, सोलापुरातील घटना!
20
भारताचे २ वेगवेगळे संघ निवडले जाणार; इंग्लंड दौऱ्यापूर्वी सिलेक्टर्सचा मोठा निर्णय, पण का?

वैदिक धर्मव्यवस्था झुगारुन महाराणी अहल्याबार्इंनी स्वराज्य निर्माण केले

By admin | Updated: December 19, 2015 00:54 IST

महाराणी अहल्याबाई होळकर यांनी सतिप्रथेच्या विरोधात बंड पुकारले. त्यांनी पेशवाईच्या काळातील सती प्रथा,

चंद्रपुरात व्याख्यानमाला : गंगाधर बनबरे यांचे प्रतिपादनचंद्रपूर : महाराणी अहल्याबाई होळकर यांनी सतिप्रथेच्या विरोधात बंड पुकारले. त्यांनी पेशवाईच्या काळातील सती प्रथा, धर्मशास्त्रातील रुढी परंपरेसह मनुस्मृती झुगारुन महाराणी अहल्याबाई होळकरांनी स्वराज्य निर्माण केले असल्याचे प्रसिद्ध विचारवंत गंगाधर बनबरे यांनी व्याख्यानमालेत सांगितले. शिवमहोत्सव समितीद्वारा प्रियदर्शिनी सभागृह येथे आयोजित व्याख्यानमालेत ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. मनीषा घाटे, प्रमुख व्याख्याते म्हणून गंगाधर बनबरे तर प्रमुख अतिथी म्हणून मराठा सेवा संघाचे जिल्हासचिव महादेव ढुमणे, नगरसेविका ललिता गराड, प्रा. डॉ. ज्योती राखुंडे, नंदा शेळकी, डॉ. पल्लवी डोंगरे, सरपंच निर्मला मिलमिले, योगिता धांडे, अ‍ॅड. राजश्री मोहितकर, स्नेहलता आखरे, कमला वडस्कर, डॉ. एकता कुरेकर, शिला अडकिने, रत्नमाला बावणे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.गंगाधर बनबरे पुढे म्हणाले, महाराणी अहल्याबाई यांच्या पतीचा वयाच्या २९ व्या वर्षी खंडेरावांचा मृत्यू झाला. त्यावेळी पेशवाईचे राज्य होते. पतीच्या निधनांतर ११ बायका सती जात गेल्या. मात्र अहल्याबाईचे सासरे मल्हारराव यांनी तिला सती जाण्यापासून रोखले. त्यानंतर त्यांच्या कुटुंबातील अनेकांच्या बायका सती गेल्या. त्यावेळी मल्हारराव तिचे सासरे यांनी तिला खंबीरपणे बुरसट विचारसरणी व प्रथेच्या विरोधात संघर्ष करण्याचे प्रोत्साहन दिले, आत्मबळ दिले. त्यावेळेस पराक्रमी अहल्याबाईने लढाईचे सर्व कौशल्य आत्मसात केले. त्यामुळे पराक्रमी अहल्याबाईंनी पेशवाईच्या मुजोरीचा सामना केला. यानंतर अनेक स्वाऱ्यावर चढाई करुन जिंकल्या आणि तिने स्वराज्य निर्माण केले. त्यामुळेच तिचे नाव इतिहासातील महानायिकांमध्ये घेतले जाते. आज काळ व परिस्थिती बदलली. परंतु आजही मनुस्मृती विचारसरणीचा बिमोड झाला नाही. त्यांच्या मानसिकतेबरोबर महिलांच्या मनातील गुलामगिरी संपण्याची गरज निर्माण झाली असल्याचे बनबरे यांनी यावेळी सांगितले. कार्यक्रमाचे संचालन वैशाली भेदे यांनी केले तर आभार प्रतिभा भोयर यांनी मानले. यावेळी अनेकांची उपस्थिती होती. (स्थानिक प्रतिनिधी)