शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही युद्धाला घाबरत नाही, आमचं संपूर्ण आयुष्य..."; सीरियाच्या राष्ट्राध्यक्षांचा इस्रायलला इशारा
2
"राज्यात पाच महिन्यात १ लाख ६० हजार गुन्हे, ९२४ हत्या", अंबादास दानवे यांनी मांडली धक्कादायक आकडेवारी
3
विधिमंडळात पडळकर आणि आव्हाडांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी; CM फडणवीस म्हणाले, 'हे योग्य नाही'
4
काल पडळकर आणि आव्हाडांमध्ये वाद, आज दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते भिडले, विधानभवन परिसरात पुन्हा राडा, पाहा VIdeo
5
VIDEO: अंबरनाथ पालिकेत दोन ठेकेदारांमध्ये पोलिसांसमोरच सुरू झाली फ्री-स्टाइल हाणामारी
6
"भगवद्गीता वाचून हिंदू झालो, पण हिंदू होण्यासाठी...?" बाबा बागेश्वर आणि पाकिस्तानचे आरिफ अजाकिया यांच्यातील प्रश्नोत्तर व्हायरल
7
अहमदाबादमधील विमान अपघात वैमानिकांच्या चुकीमुळे? AAIBने स्पष्टच सांगितलं, ते दावे फेटाळले
8
"महाराष्ट्र झाले २० टक्के कमिशनचे राज्य, राज्यात सत्ताधारी टॉवेल बनियन गँगचा धुमाकूळ’’, विजय वडेट्टीवार यांची टीका  
9
IND vs ENG : नो रिस्क; बुमराह चौथा कसोटी सामना खेळणार हे जवळपास फिक्स! प्रशिक्षकांनीच दिली हिंट
10
CM फडणवीस म्हणाले त्रिभाषा सूत्र लागू करणार; उद्धव ठाकरेंनी हिंदीला विरोध करणारे पुस्तकच भेट दिलं
11
Ghatkopar Wall Collapse: घराच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळल्याने कामगाराचा मृत्यू, घाटकोपर येथील घटना!
12
दिसला गं बाई दिसला... अखेर सारा तेंडुलकर अन् शुबमन गिलचा 'तो' VIDEO सापडलाच..!!
13
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   
14
यूपी पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये २३८ गुन्हेगार ठार, तर ९ हजारांहून अधिक गोळीबारात जखमी
15
IND W vs ENG W : वनडेत एक नंबर कामगिरी! स्मृती-प्रतिका सलामी जोडीनं सेट केला वर्ल्ड रेकॉर्ड
16
"बिहारमध्ये बांगलादेशी-रोहिंग्या सापडले, पण पहलगामचे दहशतवादी..."; ओवैसींची सरकारवर टीका
17
भारतीय ग्रँडमास्टर्स समोर 'बुद्धी' चालेना! आर. प्रज्ञानंद याने वर्ल्ड नंबर वन कार्लसनला दिला शह
18
२ राजयोग करणार ९ राशींची भरघोस भरभराट, अडकलेली कामे होतील; हाती पैसा राहील, शुभ वरदान काळ!
19
चिनी विद्यार्थिनीला युक्रेनियन तरुणासोबत शारीरिक संबंध ठेवल्याची शिक्षा, विद्यापीठानं उचललं टोकाचं पाऊल
20
नॅशनल पार्कमधील ‘वनराणी’चे रुपडे पालटले; व्हिस्टाडोमसह नव्या अवतारात सेवेत, कधी सुरू होणार?

वैदिक धर्मव्यवस्था झुगारुन महाराणी अहल्याबार्इंनी स्वराज्य निर्माण केले

By admin | Updated: December 19, 2015 00:54 IST

महाराणी अहल्याबाई होळकर यांनी सतिप्रथेच्या विरोधात बंड पुकारले. त्यांनी पेशवाईच्या काळातील सती प्रथा,

चंद्रपुरात व्याख्यानमाला : गंगाधर बनबरे यांचे प्रतिपादनचंद्रपूर : महाराणी अहल्याबाई होळकर यांनी सतिप्रथेच्या विरोधात बंड पुकारले. त्यांनी पेशवाईच्या काळातील सती प्रथा, धर्मशास्त्रातील रुढी परंपरेसह मनुस्मृती झुगारुन महाराणी अहल्याबाई होळकरांनी स्वराज्य निर्माण केले असल्याचे प्रसिद्ध विचारवंत गंगाधर बनबरे यांनी व्याख्यानमालेत सांगितले. शिवमहोत्सव समितीद्वारा प्रियदर्शिनी सभागृह येथे आयोजित व्याख्यानमालेत ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. मनीषा घाटे, प्रमुख व्याख्याते म्हणून गंगाधर बनबरे तर प्रमुख अतिथी म्हणून मराठा सेवा संघाचे जिल्हासचिव महादेव ढुमणे, नगरसेविका ललिता गराड, प्रा. डॉ. ज्योती राखुंडे, नंदा शेळकी, डॉ. पल्लवी डोंगरे, सरपंच निर्मला मिलमिले, योगिता धांडे, अ‍ॅड. राजश्री मोहितकर, स्नेहलता आखरे, कमला वडस्कर, डॉ. एकता कुरेकर, शिला अडकिने, रत्नमाला बावणे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.गंगाधर बनबरे पुढे म्हणाले, महाराणी अहल्याबाई यांच्या पतीचा वयाच्या २९ व्या वर्षी खंडेरावांचा मृत्यू झाला. त्यावेळी पेशवाईचे राज्य होते. पतीच्या निधनांतर ११ बायका सती जात गेल्या. मात्र अहल्याबाईचे सासरे मल्हारराव यांनी तिला सती जाण्यापासून रोखले. त्यानंतर त्यांच्या कुटुंबातील अनेकांच्या बायका सती गेल्या. त्यावेळी मल्हारराव तिचे सासरे यांनी तिला खंबीरपणे बुरसट विचारसरणी व प्रथेच्या विरोधात संघर्ष करण्याचे प्रोत्साहन दिले, आत्मबळ दिले. त्यावेळेस पराक्रमी अहल्याबाईने लढाईचे सर्व कौशल्य आत्मसात केले. त्यामुळे पराक्रमी अहल्याबाईंनी पेशवाईच्या मुजोरीचा सामना केला. यानंतर अनेक स्वाऱ्यावर चढाई करुन जिंकल्या आणि तिने स्वराज्य निर्माण केले. त्यामुळेच तिचे नाव इतिहासातील महानायिकांमध्ये घेतले जाते. आज काळ व परिस्थिती बदलली. परंतु आजही मनुस्मृती विचारसरणीचा बिमोड झाला नाही. त्यांच्या मानसिकतेबरोबर महिलांच्या मनातील गुलामगिरी संपण्याची गरज निर्माण झाली असल्याचे बनबरे यांनी यावेळी सांगितले. कार्यक्रमाचे संचालन वैशाली भेदे यांनी केले तर आभार प्रतिभा भोयर यांनी मानले. यावेळी अनेकांची उपस्थिती होती. (स्थानिक प्रतिनिधी)