शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांनो काळजी घ्या! पुढील २४ तासांसाठी पावसाचा रेडअलर्ट, हवामान खात्याचा इशारा
2
आता खामेनेईचा खात्मा करणारच..: हॉस्पिटलवरील हल्ल्यानंतर इस्त्रायलचे खुले चॅलेंज
3
मुंबई, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यासह पुणे घाट, सातारा घाट परिसरात 24 तासांसाठी ऑरेंज अलर्ट
4
'हवाई हलकल्लोळ' सुरूच! आधी दिल्ली-लेह फ्लाइट... नंतर हैदराबाद-तिरूपती विमानाचा 'यू टर्न'
5
बसच्या तिकिटामुळे हत्या उघडकीस आली! पाच वर्षाचे रिलेशन, लग्नाची इच्छा, घडलं वेगळंच
6
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर: १० राशी मालामाल, इच्छापूर्ती काळ; अचानक पैसे मिळतील, चांगले घडेल!
7
Video: इलॉन मस्क यांना मोठा धक्का; प्रक्षेपणादरम्यान SpaceX च्या स्टारशिप रॉकेटमध्ये स्फोट
8
Air India Plane Crash: 'असं वाटलं पाकिस्ताननेच मिसाईल हल्ला केला, चार मित्र गमावले'; अपघातातून वाचलेल्या केशवने सांगितला थरार
9
ठाकरेंसोबत रात्रीतून खेळ झाला! काल मातोश्रीवर आलेले 'ते' दोन नेते आज शिंदेंच्या शिवसेनेत
10
अहमदाबाद विमान अपघात एक गूढच राहणार? ब्लॅक बॉक्समधून माहिती मिळेना; अमेरिकेला पाठवणार
11
लीड्स टेस्टपूर्वीच टीम इंडियाला मोठा झटका, 259 धावा करणाऱ्या 'या' क्रिकेटरला दुखापत! नेमकं काय घडलं? आता कशी असेल प्लेइंग 11?
12
Ashadhi Ekadashi 2025: संत नामदेवांनी पांडुरंगाच्या आरतीत उल्लेखलेली 'राही' नेमकी कोण?
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राहुल गांधी यांना वाढदिवसानिमित्त दिल्या खास शुभेच्छा, म्हणाले...
14
Shree Swami Samarth: एक पैशाचा खर्च नाही, ‘हा’ उपाय एकदा करून पाहा; स्वामी कायम पाठीशी असतील, अशक्यही शक्य होईल!
15
चालत्या रिक्षात अचानक झाला स्फोट; आगीत महिला प्रवासी जिवंत जळाली, ५ जण जखमी
16
अहमदाबाद विमान अपघात: Air India ४,०८० कोटी रुपयांचा 'इन्श्युरन्स क्लेम' करणार, इतिहासातील सर्वाधिक आकडा ठरणार?
17
Pandharpur Wari 2025: वारकऱ्यांसाठी टोलमाफी! पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांना कसे मिळणार टोलमाफीचे पास?
18
Monolithisch India IPO Listing: ६२ टक्क्यांच्या प्रीमिअमसह लिस्टिंग, नंतर लागलं अपर सर्किट; पहिल्याच दिवशी गुंतणूकदार मालामाल
19
प्यार तूने क्या किया! बॉयफ्रेंडच्या घरात बसलेली बायको, संतापलेल्या नवऱ्याने घेतला नाकाचा चावा
20
Sonam Raghuvanshi : बनावट मृतदेह, संजय वर्मा...; राजा रघुवंशीच्या हत्येसाठी सोनम आणि राजचं खतरनाक प्लॅनिंग

सिंदेवाही तालुक्यात धानाच्या सरासरी उत्पादनात घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2018 21:52 IST

आॅनलाईन लोकमतसिंदेवाही : सिंदेवाही उद्योग विरहीत तालुका असून या तालुक्यात धानाचे मुख्य पीक घेतले जाते. मात्र सिंचनाचे साधन नसल्याने तालुक्यातील अनेक शेतकरी निसर्गाच्या भरवशावर अवलंबून असते. यावर्षी अत्यल्प पावसामुळे धान पिकाला प्रचंड फटका बसला. त्यातच धान पिकावर विविध रोगाने आक्रमण केल्याने उतारीत सरासरी कमालीची घट आली आहे. त्यामुळे शासनाने प्रती ...

ठळक मुद्देशेतकरी चिंताग्रस्त : धानाला ३००० रूपये दराची मागणी

आॅनलाईन लोकमतसिंदेवाही : सिंदेवाही उद्योग विरहीत तालुका असून या तालुक्यात धानाचे मुख्य पीक घेतले जाते. मात्र सिंचनाचे साधन नसल्याने तालुक्यातील अनेक शेतकरी निसर्गाच्या भरवशावर अवलंबून असते. यावर्षी अत्यल्प पावसामुळे धान पिकाला प्रचंड फटका बसला. त्यातच धान पिकावर विविध रोगाने आक्रमण केल्याने उतारीत सरासरी कमालीची घट आली आहे. त्यामुळे शासनाने प्रती क्विंटल ३ हजार रुपये भाव द्यावे, अशी मागणी सिंदेवाही तालुक्यातील धान उत्पादक शेतकºयांनी केली आहे.सततच्या नापिकीमुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. त्यातच शेती व्यवसायासाठी आवश्यक असलेले रासायनिक खत, कीटकनाशक औषधी, बीज आदीचे भाव महागले आहेत. मात्र त्या मानाने उत्पादन खर्चाचा विचार केल्यास शेतकºयांना खर्चानुसार त्यांच्या उत्पादनाला हमीभाव मिळत नसल्याने शेतकरी कर्जबाजारी होत आहे. खते, कीटकनाशक यांचे दर लक्षात घेतले तर मजुरीसुद्धा परवडत नाही. अशा परिस्थितीत शेतकºयांनी जगावे की मरावे, असा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची दैनावस्था झाली असून शासनाने आधारभूत किंमत ठरवून शेतकºयांना प्रती क्विंटल तीन हजार रुपये भाव द्यावा, अशी शेतकºयांची मागणी आहे.कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग, पण शेतकºयांना काय ?शासनाने शासकीय कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोगाची घोषणा केली आहे. त्यामुळे त्यांच्या वेतनामध्ये पुन्हा वाढ होईल. परंतु भुमीपुत्राच्या शेतीचे काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे. कर्जबाजारी होवून डबघाईस आलेल्या शेतकºयांसाठी शासन कोणता आयोग राबविणार, असे शेतकरी बोलत आहेत. निसर्गाचा कोप आणि सरकारचे दुर्लक्ष यामुळे शेतकºयांचे कर्जाचे डोंगर वाढतच आहे. त्यातच उत्पादीत मालाला अल्प दर मिळत असल्याने शासनाकडून शेतकºयांची बोळवण केली जात आहे. उत्पादनापेक्षा खर्च अधिक अशी स्थिती शेतकºयांची आहे. अनेकांना कर्जमाफीचा लाभ मिळालेला नसल्याने शेतकºयांना मोठ्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.