शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

सिंदेवाही तालुक्यात धानाच्या सरासरी उत्पादनात घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2018 21:52 IST

आॅनलाईन लोकमतसिंदेवाही : सिंदेवाही उद्योग विरहीत तालुका असून या तालुक्यात धानाचे मुख्य पीक घेतले जाते. मात्र सिंचनाचे साधन नसल्याने तालुक्यातील अनेक शेतकरी निसर्गाच्या भरवशावर अवलंबून असते. यावर्षी अत्यल्प पावसामुळे धान पिकाला प्रचंड फटका बसला. त्यातच धान पिकावर विविध रोगाने आक्रमण केल्याने उतारीत सरासरी कमालीची घट आली आहे. त्यामुळे शासनाने प्रती ...

ठळक मुद्देशेतकरी चिंताग्रस्त : धानाला ३००० रूपये दराची मागणी

आॅनलाईन लोकमतसिंदेवाही : सिंदेवाही उद्योग विरहीत तालुका असून या तालुक्यात धानाचे मुख्य पीक घेतले जाते. मात्र सिंचनाचे साधन नसल्याने तालुक्यातील अनेक शेतकरी निसर्गाच्या भरवशावर अवलंबून असते. यावर्षी अत्यल्प पावसामुळे धान पिकाला प्रचंड फटका बसला. त्यातच धान पिकावर विविध रोगाने आक्रमण केल्याने उतारीत सरासरी कमालीची घट आली आहे. त्यामुळे शासनाने प्रती क्विंटल ३ हजार रुपये भाव द्यावे, अशी मागणी सिंदेवाही तालुक्यातील धान उत्पादक शेतकºयांनी केली आहे.सततच्या नापिकीमुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. त्यातच शेती व्यवसायासाठी आवश्यक असलेले रासायनिक खत, कीटकनाशक औषधी, बीज आदीचे भाव महागले आहेत. मात्र त्या मानाने उत्पादन खर्चाचा विचार केल्यास शेतकºयांना खर्चानुसार त्यांच्या उत्पादनाला हमीभाव मिळत नसल्याने शेतकरी कर्जबाजारी होत आहे. खते, कीटकनाशक यांचे दर लक्षात घेतले तर मजुरीसुद्धा परवडत नाही. अशा परिस्थितीत शेतकºयांनी जगावे की मरावे, असा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची दैनावस्था झाली असून शासनाने आधारभूत किंमत ठरवून शेतकºयांना प्रती क्विंटल तीन हजार रुपये भाव द्यावा, अशी शेतकºयांची मागणी आहे.कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग, पण शेतकºयांना काय ?शासनाने शासकीय कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोगाची घोषणा केली आहे. त्यामुळे त्यांच्या वेतनामध्ये पुन्हा वाढ होईल. परंतु भुमीपुत्राच्या शेतीचे काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे. कर्जबाजारी होवून डबघाईस आलेल्या शेतकºयांसाठी शासन कोणता आयोग राबविणार, असे शेतकरी बोलत आहेत. निसर्गाचा कोप आणि सरकारचे दुर्लक्ष यामुळे शेतकºयांचे कर्जाचे डोंगर वाढतच आहे. त्यातच उत्पादीत मालाला अल्प दर मिळत असल्याने शासनाकडून शेतकºयांची बोळवण केली जात आहे. उत्पादनापेक्षा खर्च अधिक अशी स्थिती शेतकºयांची आहे. अनेकांना कर्जमाफीचा लाभ मिळालेला नसल्याने शेतकºयांना मोठ्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.