शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
2
'ओबीसी समाज श्रीमंत मराठ्यांविरोधात जाऊ नये, हाच शरद पवारांच्या मंडळ यात्रेचा हेतू'; प्रकाश आंबेडकरांचा टोला
3
'मतचोरी' विरोधात इंडिया आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली खासदार संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार
4
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
5
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
6
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
7
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
8
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
9
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
10
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
11
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
12
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
13
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
14
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
15
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
16
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
17
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
18
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
19
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
20
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...

सिंदेवाही तालुक्यात धानाच्या सरासरी उत्पादनात घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2018 21:52 IST

आॅनलाईन लोकमतसिंदेवाही : सिंदेवाही उद्योग विरहीत तालुका असून या तालुक्यात धानाचे मुख्य पीक घेतले जाते. मात्र सिंचनाचे साधन नसल्याने तालुक्यातील अनेक शेतकरी निसर्गाच्या भरवशावर अवलंबून असते. यावर्षी अत्यल्प पावसामुळे धान पिकाला प्रचंड फटका बसला. त्यातच धान पिकावर विविध रोगाने आक्रमण केल्याने उतारीत सरासरी कमालीची घट आली आहे. त्यामुळे शासनाने प्रती ...

ठळक मुद्देशेतकरी चिंताग्रस्त : धानाला ३००० रूपये दराची मागणी

आॅनलाईन लोकमतसिंदेवाही : सिंदेवाही उद्योग विरहीत तालुका असून या तालुक्यात धानाचे मुख्य पीक घेतले जाते. मात्र सिंचनाचे साधन नसल्याने तालुक्यातील अनेक शेतकरी निसर्गाच्या भरवशावर अवलंबून असते. यावर्षी अत्यल्प पावसामुळे धान पिकाला प्रचंड फटका बसला. त्यातच धान पिकावर विविध रोगाने आक्रमण केल्याने उतारीत सरासरी कमालीची घट आली आहे. त्यामुळे शासनाने प्रती क्विंटल ३ हजार रुपये भाव द्यावे, अशी मागणी सिंदेवाही तालुक्यातील धान उत्पादक शेतकºयांनी केली आहे.सततच्या नापिकीमुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. त्यातच शेती व्यवसायासाठी आवश्यक असलेले रासायनिक खत, कीटकनाशक औषधी, बीज आदीचे भाव महागले आहेत. मात्र त्या मानाने उत्पादन खर्चाचा विचार केल्यास शेतकºयांना खर्चानुसार त्यांच्या उत्पादनाला हमीभाव मिळत नसल्याने शेतकरी कर्जबाजारी होत आहे. खते, कीटकनाशक यांचे दर लक्षात घेतले तर मजुरीसुद्धा परवडत नाही. अशा परिस्थितीत शेतकºयांनी जगावे की मरावे, असा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची दैनावस्था झाली असून शासनाने आधारभूत किंमत ठरवून शेतकºयांना प्रती क्विंटल तीन हजार रुपये भाव द्यावा, अशी शेतकºयांची मागणी आहे.कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग, पण शेतकºयांना काय ?शासनाने शासकीय कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोगाची घोषणा केली आहे. त्यामुळे त्यांच्या वेतनामध्ये पुन्हा वाढ होईल. परंतु भुमीपुत्राच्या शेतीचे काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे. कर्जबाजारी होवून डबघाईस आलेल्या शेतकºयांसाठी शासन कोणता आयोग राबविणार, असे शेतकरी बोलत आहेत. निसर्गाचा कोप आणि सरकारचे दुर्लक्ष यामुळे शेतकºयांचे कर्जाचे डोंगर वाढतच आहे. त्यातच उत्पादीत मालाला अल्प दर मिळत असल्याने शासनाकडून शेतकºयांची बोळवण केली जात आहे. उत्पादनापेक्षा खर्च अधिक अशी स्थिती शेतकºयांची आहे. अनेकांना कर्जमाफीचा लाभ मिळालेला नसल्याने शेतकºयांना मोठ्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.