शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचे समर्थन करणारे माजी सुरक्षा सल्लागार जॉन बोल्टन यांच्या घरावर एफबीआयची धाड, प्रकरण काय?
2
पाकिस्तानविरुद्ध कारवाई सुरूच, भारतीय हवाई हद्दीत कोणतेही विमान उड्डाण करू शकणार नाही; बंदी २४ सप्टेंबरपर्यंत वाढवली
3
अमेरिकन लोकांनाच फसवताहेत ट्रम्प! नियम बनवून आपलाच खजिना भरताहेत, ६ महिन्यांत केली ८६० कोटींची गुंतवणूक
4
Anil Ambani : अनिल अंबानी अडचणीत? घरासह इतरही ठिकाणांवर सकाळपासूनच छापे; १७००० कोटींच्या बँक कर्ज घोटाळाप्रकरणी CBI ची कारवाई!
5
मुंबईच्या रस्त्यावर नव्या लॅम्बोर्गिनीत दिसला रोहित शर्मा, किती आहे या Luxurious कारची किंमत? जाणून थक्क व्हाल!
6
'भारत-पाकिस्तान मुद्द्यावर कोणतीही मध्यस्थी स्वीकार्य नाही', परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी नाव न घेता ट्रम्प यांना स्पष्टच सांगितले
7
Pokerbaazi नं बंद केलं सर्व रियल मनी ऑनलाइन गेम्स; Nazara च्या शेअर्सची वाईट स्थिती
8
जुळ्या मुलांच्या जन्मानंतर अभिनेत्रीला पुन्हा होणार होते 'ट्विन्स', पण एकाचा झाला मृत्यू; भावुक पोस्ट
9
मुंबईत घडामोडींना वेग, शिवसेना शिंदे गटाच्या मंत्र्यांनी घेतली शरद पवारांची भेट; कारण काय?
10
TikTok Ban: टिकटॉक खरंच भारतात पुन्हा सुरू होणार आहे का? केंद्र सरकारनेच दिलं उत्तर
11
सरकारची 'उपसमिती' म्हणजे 'जुनेच खुळ', आमच्या मागण्यांचे काय? मनोज जरांगेंचा संतप्त सवाल
12
नागपूर: चालकाला येऊ लागली झोप, स्वतःच कार...; अपघातात कुलगुरू हरेराम त्रिपाठी यांचा पत्नीसह मृत्यू
13
Ganesh Chaturthi 2025: धर्मशास्त्रानुसार गणपती विसर्जनाचा योग्य दिवस कोणता? ते जाणून घ्या!
14
हरितालिका तृतीया २०२५: व्रत पूजेचे सगळे साहित्य घेतले ना, काही राहिले तर नाही? पाहा, यादी
15
एक ऑर्डर पोहोचवण्यासाठी Myntra आणि Amazon च्या डिलिव्हरी बॉयला किती पैसे मिळतात?
16
मुंबईत घडतेय तरी काय? आता अमित ठाकरेंनी घेतली आशिष शेलारांची भेट; राजकीय वर्तुळात चर्चा
17
Priya Bapat: "छन छन छन...असा आवाज करत ते...", प्रिया बापटनं सांगितला दादरच्या घरातील थरकाप उडवणारा प्रसंग
18
ठरलं! मेस्सी अर्जेंटिनाचा अख्खा वर्ल्ड चॅम्पियन संघ घेऊन भारतात खेळायला येतोय! कधी अन् कुठं रंगणार सामना?
19
विराट आणि रोहित वनडेतून कधी निवृत्त होणार? राजीव शुक्ला स्पष्टच बोलले...
20
भाद्रपद महिन्यात गौरी, गणपती आणि पितृपक्षही; जाणून घ्या या मराठी महिन्याचे महत्त्व!

महाराष्ट्रात ओला दुष्काळ जाहीर करा

By admin | Updated: October 9, 2016 01:30 IST

राज्यभर मोठ्या प्रमाणात पाऊस असून विदर्भ, मराठवाड्यात अति पावसामुळे ओला दुष्काळ पडला आहे.

अशोक चव्हाण : महाराष्ट्र सरकार संवेदनाहीनराजुरा : राज्यभर मोठ्या प्रमाणात पाऊस असून विदर्भ, मराठवाड्यात अति पावसामुळे ओला दुष्काळ पडला आहे. ओला दुष्काळ जाहीर करून राज्यातील शेतकऱ्यांना आर्थिक मदत जाहीर करा, अशी मागणी माजी मुख्यमंत्री खा. अशोकराव चव्हाण यांनी केली. खा. चव्हाण राजुरा तालुका काँग्रेस कमेटीच्या वतीने आयोजित काँग्रेस कार्यकर्ता मेळाव्याप्रसंगी बोलत होते. ते पुढे म्हणाले की, महाराष्ट्र शासनाच्या संवेदना नष्ट झाल्या आहेत. राज्यात शेतकऱ्यांच्या ३ हजार ५०० आत्महत्या झाल्या आहे. आत्महत्या झाल्यानंतर मदत करण्यापेक्षा जीवंतपणी कर्जमाफी करून शेतकऱ्यांना मदत केली पाहिजे. विदर्भ, मराठवाड्याचा अनुशेष पूर्ण झाला पाहिेजे. सोयाबीन, कापूस, मूग, तूर आदी सर्व पीके नष्ट झाली आहेत. राज्य शासनाने पोकळ घोषणा देण्यापेक्षा मदत जाहीर करावी. दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदत करा, अशीही मागणी खा. चव्हाण यांनी केली.याप्रसंगी मेळाव्याचे उद्घाटन माजी केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री मुकुल वासनिक यांच्या हस्ते झाले. प्रमुख अतिथी म्हणून विधानसभेचे काँग्रेसचे उपगटनेते आमदार विजय वडेट्टीवार, माजी मंत्री राजेंद्र मुळक, जेष्ठ नेते अनंतराव घारड, राजुरा विधानसभा क्षेत्राचे निरीक्षक बाबुराव तिडके, चंद्रपूर जिल्हा काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष प्रकाश देवतळे, माजी आमदार आनंदराव गेडाम, नामदेवराव उसेंडी, प्रकाश मारकवार, प्रमोद तितरमारे, चंद्रपूर महिला काँग्रेस अध्यक्ष अश्विनी खोेब्रागडे, माजी आमदार प्रभाकरराव मामुलकर, युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष शिवाराव पोलगेट्टी, माजी आमदार सुभाष धोटे, राजुरा अध्यक्ष दादा लांडे, कोरपना विठ्ठल थिपे, जिवती, गोदरू जुमनाके, गोंडपिपरी, रा. चंदेल, युवक काँग्रेस अध्यक्ष आशिष देरकर, नगराध्यक्ष मंगला आत्राम, उपाध्यक्ष अरुण धोटे, राजुरा शहर अध्यक्ष सुनील देशपांडे, गटनेते स्वामी येरोलवार, बँकेचे माजी अध्यक्ष शेखर धोटे, युवक काँग्रेसचे अध्यक्ष गोलू ठाकरे, एजाज अहमद आदी उपस्थित होते.प्रास्ताविक मेळाव्याचे आयोजक व माजी आमदार सुभाष धोटे यांनी केले. त्यांनी प्रास्ताविकामधून राजुरा विधानसभा क्षेत्रात अनेक विकासाची कामे केल्याचे सांगितले. या विकासाला खिळ बसत असल्याचे त्यांनी सांगितले. या प्रसंगी शेतकरी संघटना, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेसमधून अनेक कार्यकर्त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश घेतला.संचालन सचिन फुलझेले यांनी केले. आभार राजुरा विधानसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष आशिष देरकर यांनी मानले. (शहर प्रतिनिधी)