शहरं
Join us  
Trending Stories
1
३१ जानेवारीपर्यंत निवडणुका पार पाडा; सर्वोच्च न्यायालयाचा आदेश, राज्य निवडणूक आयोगाला सुनावले खडेबोल
2
मोदी हाच जगातील सर्वांत मोठा ब्रँड; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : भाजप कार्यकर्त्यांचा ब्रँड निर्माण करून देणारा पक्ष
3
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका तीन टप्प्यांत? जाणून घ्या सविस्तर
4
एकनाथ शिंदेंवरील टीकेला प्रत्युत्तर देणार; खा. नरेश म्हस्के यांचा मंत्री नाईकांना अप्रत्यक्ष इशारा
5
परवाना मिळण्याआधीच मोडले नियम; ई-बाईकऐवजी चक्क पेट्रोलवरील गाडी हजर
6
रेसकोर्सवरील थीम पार्कवर पुन्हा ‘इव्हेंट’; काम सुरू होईपर्यंत कार्यक्रमांसाठी देणार भाड्याने
7
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
8
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
9
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
10
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
11
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
12
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
13
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
14
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
15
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
16
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
17
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
18
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
19
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
20
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय

शेतीला उद्योग घोषित केल्यास प्रदूषणमुक्ती

By admin | Updated: February 28, 2017 00:38 IST

शेती हा चिरंतन उद्योग आहे. उद्योग व खनिज यांचा साठा मर्यादित आहे.

सुरेश चोपणे : ‘आमचे गाव-आमचा वक्ता’ उपक्रमचंद्रपूर : शेती हा चिरंतन उद्योग आहे. उद्योग व खनिज यांचा साठा मर्यादित आहे. त्यामुळे शेतीला उद्योग घोषित केल्यास उद्योगांची वाढती संख्या नियंत्रित करता येईल. त्यातून प्रदूषणमुक्त वातावरणात निर्माण करणे शक्य होईल, असे प्रतिपादन प्रसिद्ध पर्यावरणतज्ज्ञ आणि ग्रीन प्लॅनेट सोसायटीचे अध्यक्ष प्रा. सुरेश चोपणे यांनी केले.विदर्भ साहित्य संघ, गोंडवन शाखेतर्फे 'आमचं गाव आमचा वक्ता' या उपक्रमात प्रा. चोपणे बोलत होते. विसा संघाने सऔद्योगिक विकास आणि पर्यावरण’ या विषयावर त्यांचे व्याख्यान आकाशवाणी जवळच्या इन्स्पायर संस्थेच्या सभागृहात आयोजित केले होते.यावेळी प्रा. चोपणे पुढे म्हणाले की, उद्योगाचे विकेंद्रीकरण केले पाहिजे. चंद्रपूर जिल्ह्यातील उद्योग जिल्ह्यातील सर्व तालुक्यात विकेंद्रित करणे आवश्यक आहे. छोटे-छोटे उद्योग उभारले पाहिजे. लघु उद्योगांमुळे रोजगार निर्मिती होत असते. मात्र संसाधने व आपली सोय पाहून उद्योगवाले केवळ नफा कमावण्याचे धोरण राबवतात. भारतात पर्यावरण रक्षणासाठी सर्वात जास्त व सर्वात चांगले कायदे आहेत. परंतु त्याची अंमलबजावणी केली जात नाही. उलट आपल्या देशात पर्यावरण संरक्षणाचे कायदे सर्वात जास्त मोडले जातात, असे त्यांनी सांगितले.(प्रतिनिधी)चंद्रपुरातील ५४ टक्के लोकांना विविध आजारऔदयोगिक विकास झाला म्हणजे मानवाचा विकास झाला, असे नाही. चंद्रपुरातील ५४ टक्के लोक विविध आजारांनी ग्रस्त आहेत. भारताचा विकास १७ टक्के शेतीवर, २४ टक्के उद्योगावर आणि ५७ टक्के सेवाक्षेत्रावर अवलंबून आहे. त्यामुळे आता आपला देश शेतीप्रधान राहिलेला नाही. मात्र शेती ५८ टक्के रोजगार देते. तर उद्योग केवळ २० रोजगार देतात. म्हणजे उद्योग येऊनही आपल्याला रोजगार देऊ शकले नाहीत, असेही प्रा. चोपणे यांनी स्पष्ट केले.