शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारची शेतकऱ्यांना भेट; 'पंतप्रधान धन-धान्य कृषी योजने'साठी २४ हजार कोटींची तरतूद
2
मोठी बातमी! आनंदराज आंबेडकरांची एकनाथ शिंदेंना साथ; शिंदेसेना-रिपब्लिकन सेनेच्या युतीची घोषणा
3
MTNL Defaults: कर्जात बुडालीये 'ही' सरकारी कंपनी; बँकांना परत करू शकत नाहीये ८५८५ कोटींचं लोन, जाणून घ्या
4
बाबर क्रूर, अकबर सहिष्णू तर औरंगजेब मंदिर पाडणारा', NCERT ने पुस्तकात केले मोठे बदल
5
१६०० कोटी पगार! मेटा 'या' व्यक्तींसाठी उधळतोय पाण्यासारखा पैसा, कारण ऐकून धक्का बसेल!
6
तिकीट काढले विमानाचे, प्रवास घडला कारचा; Air India च्या प्रवाशांसोबत नेमके काय घडले?
7
भारताकडून ब्राह्मोस, जपानकडून युद्धनौका, आता तैवानसोबत मिळून चीनला आव्हान देणार हा देश
8
लँडिंगसाठी जागाच मिळेना, एकाच वेळी १७३ प्रवाशांचा जीव होता धोक्यात; इंडिगोच्या पायलटने 'अशी' दाखवली हुशारी!
9
गुहेत राहणाऱ्या रशियन महिलेने कसे कमावले पैसे, भारतात स्थायिक होण्याचे कारणही सांगितले
10
मुलाच्या हव्यासापोटी जन्मदाता बापच झाला हैवान; ७ वर्षांच्या लेकीला कालव्यात फेकून मारलं
11
श्री स्वामी समर्थ महाराजांची आरती दररोज करता का? शुभ-लाभ होतात, स्वामी कायम सोबत राहतात!
12
Chaturmas 2025: चातुर्मासात गुरुवारपासून सुरू करा दत्तबावनी, फक्त पाळा 'हे' नियम!
13
कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळ पहिल्या क्रमांकावर राज्य करणारे गोलंदाज!
14
एकटे PM मोदीच आठवड्याला १०० तास काम करतात; '७० तास'वरून ट्रोल झालेल्या नारायण मूर्तींचं प्रशस्तीपत्रक
15
गुवाहाटीची रहीमा सोनमपेक्षाही भयंकर! पतीला संपवलं अन् बेडरूमध्येच गाडलं, शांततेत झोपली; कशी पकडली गेली?
16
सूर्य गोचराने शुभ राजयोग: ७ राशींचे कल्याण, भाग्याची साथ; महिनाभर ‘हे’ करा, लाभच लाभ मिळवा!
17
चला हवा येऊ द्या! CHYD चं नवं शीर्षक गीत रिलीज; कॉमेडीच्या गँगवॉरची झलक बघा
18
मस्क अजूनही नंबर १, पण झुकरबर्गला बसला मोठा धक्का! AI च्या कामगिरीने 'हा' उद्योगपती झाला जगात दुसरा श्रीमंत!
19
IND vs ENG: शुभमन गिलने कोहलीसारखा ब्रँड बनण्याचा प्रयत्न करू नये, माजी क्रिकेटपटूचा महत्त्वाचा सल्ला!

शेतीला उद्योग घोषित केल्यास प्रदूषणमुक्ती

By admin | Updated: February 28, 2017 00:38 IST

शेती हा चिरंतन उद्योग आहे. उद्योग व खनिज यांचा साठा मर्यादित आहे.

सुरेश चोपणे : ‘आमचे गाव-आमचा वक्ता’ उपक्रमचंद्रपूर : शेती हा चिरंतन उद्योग आहे. उद्योग व खनिज यांचा साठा मर्यादित आहे. त्यामुळे शेतीला उद्योग घोषित केल्यास उद्योगांची वाढती संख्या नियंत्रित करता येईल. त्यातून प्रदूषणमुक्त वातावरणात निर्माण करणे शक्य होईल, असे प्रतिपादन प्रसिद्ध पर्यावरणतज्ज्ञ आणि ग्रीन प्लॅनेट सोसायटीचे अध्यक्ष प्रा. सुरेश चोपणे यांनी केले.विदर्भ साहित्य संघ, गोंडवन शाखेतर्फे 'आमचं गाव आमचा वक्ता' या उपक्रमात प्रा. चोपणे बोलत होते. विसा संघाने सऔद्योगिक विकास आणि पर्यावरण’ या विषयावर त्यांचे व्याख्यान आकाशवाणी जवळच्या इन्स्पायर संस्थेच्या सभागृहात आयोजित केले होते.यावेळी प्रा. चोपणे पुढे म्हणाले की, उद्योगाचे विकेंद्रीकरण केले पाहिजे. चंद्रपूर जिल्ह्यातील उद्योग जिल्ह्यातील सर्व तालुक्यात विकेंद्रित करणे आवश्यक आहे. छोटे-छोटे उद्योग उभारले पाहिजे. लघु उद्योगांमुळे रोजगार निर्मिती होत असते. मात्र संसाधने व आपली सोय पाहून उद्योगवाले केवळ नफा कमावण्याचे धोरण राबवतात. भारतात पर्यावरण रक्षणासाठी सर्वात जास्त व सर्वात चांगले कायदे आहेत. परंतु त्याची अंमलबजावणी केली जात नाही. उलट आपल्या देशात पर्यावरण संरक्षणाचे कायदे सर्वात जास्त मोडले जातात, असे त्यांनी सांगितले.(प्रतिनिधी)चंद्रपुरातील ५४ टक्के लोकांना विविध आजारऔदयोगिक विकास झाला म्हणजे मानवाचा विकास झाला, असे नाही. चंद्रपुरातील ५४ टक्के लोक विविध आजारांनी ग्रस्त आहेत. भारताचा विकास १७ टक्के शेतीवर, २४ टक्के उद्योगावर आणि ५७ टक्के सेवाक्षेत्रावर अवलंबून आहे. त्यामुळे आता आपला देश शेतीप्रधान राहिलेला नाही. मात्र शेती ५८ टक्के रोजगार देते. तर उद्योग केवळ २० रोजगार देतात. म्हणजे उद्योग येऊनही आपल्याला रोजगार देऊ शकले नाहीत, असेही प्रा. चोपणे यांनी स्पष्ट केले.