शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन; राम मनोहर लोहिया रुग्णालयात त्यांनी घेतला अखेरचा श्वास
2
डोनाल्ड ट्रंप टॅरिफविरोधात भारतीय सैन्याची एन्ट्री; ५४ वर्षांपूर्वीची कारस्थाने बाहेर काढली...
3
'विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला', 'ऑपरेशन सिंदूर'बाबतच्या चर्चेवरून PM मोदींचा टोला
4
"कोण खरा भारतीय, कोण नाही हे कोर्ट ठरवू शकत नाही’’, प्रियंका गांधींनी केला राहुल गांधींचा बचाव
5
राज ठाकरेंशी युतीला कौल? इंडिया-मविआवर पाणी सोडण्याची तयारी? दिल्लीत उद्धव ठाकरेंची परीक्षा
6
Anil Ambani at ED Office : अनिल अंबानी ED च्या कार्यालयात दाखल; १७ हजार कोटींच्या कर्जाच्या फसवणुकीप्रकरणी झाले हजर
7
मी तिचा पहिला रूग्ण, ती माझी शेवटची डॉक्टर, १३ दिवसांचा ड्रामा नको...; इंजिनिअरनं संपवलं जीवन
8
बँकेचा CEO बदलताच शेअरला 'रॉकेट' स्पीड! एका झटक्यात गुंतवणूकदारांना झाला इतका फायदा
9
'या' महिला खासदाराचे क्रश आहेत पंकज त्रिपाठी, कॉफी डेटची दिलेली ऑफर, म्हणाल्या- "मी त्यांना पत्रही लिहिलं होतं पण..."
10
Mahabharat: महाभारतात ४५ लाख योद्ध्यांसाठी १८ दिवस कोण करत होतं स्वयंपाक?
11
ऑपरेशन सिंदूरचा जोरदार दणका! पाकिस्तानचं रहीम यार खान एअरबेस अजूनही बंद; पुन्हा जारी करण्यात आला NOTAM
12
IND vs ENG: 'या' विकेटने सामना फिरला...; सुनील गावसकरांनी सांगितला सामन्याचा 'टर्निंग पॉईंट'
13
खळबळजनक! एकतर्फी प्रेमात वेडा झाला तरुण, १५ वर्षांच्या मुलीवर दिवसाढवळ्या झाडल्या गोळ्या
14
"लाल किल्ल्यावर भगवा फडकवा पण तिरंगा मानलाच पाहिजे"; संभाजी भिडेंच्या विधानाची चर्चा
15
'दीवार'मधला चिमुकला आहे 'या' मराठी अभिनेत्रीचा मोठा भाऊ, कुटुंबासोबत परदेशात झाला स्थायिक
16
FD की सोने? गुंतवणुकीचा राजा कोण? बहुतेकांना यातील फायदे तोटे माहिती नाही, कशी करायची योग्य निवड?
17
बाबा वेंगाची ऑगस्टसाठी डबल फायर भविष्यवाणी; भले भले अंदाज लावून थकले...
18
आनंदाची बातमी! WhatsApp वापरत नसलेल्यांशी करता येणार चॅट, नव्या फीचरची कमाल
19
'सैराट' फेम अभिनेता लवकरच होणार बाबा?, बेबी शॉवरचे फोटो आले समोर
20
TCS ऑफिसबाहेर फुटपाथवरच झोपला कर्मचारी, थकीत सॅलरीवरून वाद; टाटा कंपनीनं मौन सोडलं

पर्यावरण वाचविण्यासाठी वृक्ष लावण्याचा संकल्प करा

By admin | Updated: June 8, 2016 00:46 IST

प्रत्येकांना प्राण वायुची गरज असून प्राणवायु वृक्षापासून तयार होत असते.

सुधीर मुनगंटीवार यांचे आवाहन : वनविभागातर्फे पर्यावरण दिनचंद्रपूर : प्रत्येकांना प्राण वायुची गरज असून प्राणवायु वृक्षापासून तयार होत असते. जास्तीत जास्त वृक्ष लावून दिवसेंदिवस पर्यावरणामध्ये होणाऱ्या बदलाचे समतोल राखण्यासाठी वृक्ष लावण्याचा संकल्प सर्वांनी करण्याची गरज असल्याचे मत, पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले. वनविभागातर्फे रविवारी आयोजित पर्यावरण दिनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी वनविभागातर्फे तयार करण्यात आलेल्या ‘वाघांचे साम्राज्य’ या घडीपुस्तिकेचे विमोचन व वृक्षारोपन पालकमंत्री यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाला मुख्य वनसंरक्षक संजय ठाकरे, मुख्य वनसंरक्षक तथा क्षेत्र संचालक जी.पी.गरड, उपसंचालक (बफर) गजेंद्र नरवणे, डॉ. गोपाल मुंदडा, डॉ. मंगेश गुलवाडे व वनविभागाचे अधिकारी उपस्थित होते.१ जुलै रोजी राज्यात दोन कोटी वृक्ष लावण्याचा संकल्प करण्यात आला असून त्या पेक्षा जास्त वृक्ष लावून महाराष्ट्र राज्य हे देशात पहिले असेल. यासाठी आपल्या सर्वांच्या सहकार्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. वृक्ष लावताना नकारात्मक भूमिका मनात न ठेवता सकारात्मक भूमीका घेऊन वृक्ष जगविण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याची गरज असल्याचे ते म्हणाले. कार्यक्रमामध्ये वनविभाग, नवमानव बहुउद्देशिय संस्था, महाराष्ट्र राज्य वनरक्षक पदोन्नत वनपाल संघटना व चंद्रपूर बचाओ संघर्ष समिती यांच्या वतीने वनविभाग कार्यालयात रक्तदान शिबिर पार पडले. या रक्तदान शिबिरामध्ये ४५ जणांनी रक्तदान केले. नवमानव संस्थेचे संस्थापक प्रवीन डाहुले, स्वाती लांडे, संजय खोब्रागडे, रामचंद्र शेंडे, महेश मानकर, आशीस हिवरे, संजय भंडारी व प्रफुल मेश्राम या रक्तदात्यांचा पालकमंत्री यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन यावेळी सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. गोपाल मुंदडा यांनी केले. यावेळी संघटनांचे प्रतिनिधी व वनविभागाचे कर्मचारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)