शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
5
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
6
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
7
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
8
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
9
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
10
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
11
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
12
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
13
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
14
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
15
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
16
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
17
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
18
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
19
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
20
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
Daily Top 2Weekly Top 5

जिवंत महिलेस मृत दाखवून लाटला ‘डेथक्लेम’

By admin | Updated: September 29, 2016 00:57 IST

आपले भविष्य उज्ज्वल करण्यासाठी अनेक जण आपला विमा काढतात. मात्र काही अभिकर्त्याद्वारे ग्राहकाची लूट केली जात आहे.

पोलिसात तक्रार : विमा अभिकर्त्यावर कारवाई करण्यास टाळाटाळगोंडपिपरी : आपले भविष्य उज्ज्वल करण्यासाठी अनेक जण आपला विमा काढतात. मात्र काही अभिकर्त्याद्वारे ग्राहकाची लूट केली जात आहे. गडचिरोलीच्या एलआयसी शाखेतील एका विमा अभिकर्त्याने तालुक्यातील राळापेठ येथील जीवंत महिलेला मृत दाखवून विमा राशी लाटण्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. याला महिनाभराचा कालावधी लोटूनही संबंधित विमा अभिकर्त्यावर कारवाई करण्यास एलआयसीच्या वरिष्ठांकडून टाळाटाळ केली जात असल्याने पॉलिसीधारकाकडून संताप व्यक्त केला जात आहे. तालुक्यातील राळापेठ येथील साधना किसन पिंपळशेंडे यांनी वर्ष २००९ मध्ये एलआयसी गडचिरोली शाखेच्या विमा अभिकर्त्याकडून विमा पॉलिसी काढली. मुदतीपूर्व ती पॉलिसी काढण्याकरिता शाखेत गेल्या असता तेथील प्रकार पाहून त्या दंग झाल्या. त्यांनी आपल्या पॉलिसीबाबत विचारले असता त्यांच्या समक्ष त्यांना मृत असे संबोधून तुमची मृत्युपश्चात विमा राशी तुमच्या वारसांच्या नावे जमा करण्यात आल्याचे उत्तर मिळाले. हे ऐकताच त्यांनी तेथील शाखा व्यवस्थापक यांना भेटून याबाबतची तक्रारही केली. यावेळी शाखा व्यवस्थापकांनीदेखील पॉलिसीधारकाचा मृत्यू झाल्याचे सांगितले. यामुळे त्यांनी संबंधित विमा अभिकर्ता कृष्णा मंडल व त्यांचे पती कवीत मंडल यांची भेट घेऊन त्यांना याबाबत जाब विचारला व पुन्हा गडचिरोेली शाखा गाठून तेथील व्यवस्थापकांना आपण जिवंत असल्याची माहिती पुरविली. हा सर्व प्रकार उघड झाल्यानंतर विमा अभिकर्त्यानेच रक्कम लाटल्याची माहिती पुढे आली. यावर संबंधित विमा अभिकर्ता व शाखा व्यवस्थापक यांनी साधना पिंपळशेंडे यांची समजूत घालण्याचा अयशस्वी प्रयत्न चालविला. मात्र साधना पिंपळशेंडे यांचा मुलगा अक्षय याने या संबंधीची तक्रार पोलिसात देण्याचे ठरविले. त्याने गावी येवून गोंडपिपरी ठाणे गाठून जिवंत व्यक्तीला मृत दाखवृन तीन लाख ३२ हजारांचा डेथक्लेम लाटणाऱ्याविरुद्ध पोलीसात तक्रार दिली. मात्र प्रकरण गडचिरोली जिल्ह्यातील असल्याने गोंडपिपरी पोलिसांनी सदर प्रकरण गडचिरोली पोलिसांना सुपूर्द केले. आज या प्रकरणाला महिनाभराहूनही अधिक दिवस लोटले असून कोट्यवधी ग्राहकांची विश्वसनीय असलेल्या एलआयसीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून न्याय मिळाला नसल्याची खंत अक्षय पिंपळशेंडे यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केली. संबंधित विमा अभिकर्ता व गडचिरोली एलआयसी शाखेचे अधिकारी यांच्या संगणमताने हा सर्व प्रकार घडला असून या प्रकरणाचा कसून तपास केल्यास मोठे रॅकेट गळाला लागणार असल्याचेही अक्षय यांचे म्हणणे आहे. या गैरव्यवहाराला वरिष्ठांची मुक संमती आहे का, असा प्रश्नही उपस्थित केला आहे. (तालुका प्रतिनिधी)