शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
2
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
3
शांततेचे प्रयत्न अपयशी! इराणसाठी ट्रम्प यांचा खतरनाक 'प्लॅन बी' तयार; भारताच्या तेल पुरवठ्यावरही संकट?
4
"इराणने आम्हाला संपवण्याची धमकी दिली, आता स्वतःच...!" शांतता चर्चा फिसकटल्याने नेतन्याहू भडकले
5
शांतता चर्चा फिस्कटल्याने डोनाल्ड ट्रम्प चिडले; आता इराणची खैर नाही, घेराव टाकण्याची दिली धमकी
6
NCB ची मोठी कारवाई! गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; २१० किलो गांजा जप्त, चौघांना अटक
7
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
8
अमेरिका-इराण चर्चा फिस्कटली; काय होत्या अमेरिकेच्या प्रमुख मागण्या? आता पाकिस्ताननं दोघांकडे केली नवी मागणी
9
डॉक्टर, मला मृत्यू हवाय..., लिविंग विल हा पर्याय किती उपयुक्त?
10
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
11
सुविधा देताना रेल्वेचे 'सावत्र' प्रेम!; मध्य-पश्चिम रेल्वेत दुजाभाव होतोय, प्रवाशांची भावना
12
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
13
IPL 2026: सुरुवात धमाकेदार, पण 'वैभव'शाली प्रवासाचा दीर्घ पल्ला शिल्लक
14
पाणी हेच पहिले औषध... पण किती आणि केव्हा प्यावे?
15
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
16
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
17
Manav Shah : Video-"एकटेपणा, जेलसारखं वाटायचं"; ४० लाखांचं पॅकेज सोडून भारतात परतला तरुण, काय घडलं?
18
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
19
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
20
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांसाठी धरणे आणि मोर्चा

By admin | Updated: July 11, 2015 01:41 IST

काँग्रेस पक्षाच्या वतीने केंद्र व राज्य सरकारच्या शेतकरी धोरणा विरुद्ध शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमुक्तीसाठी स्थानिक गांधी चौकात धरणे आंदोलन करुन विद्यमान राज्य सरकारचा निषेध करण्यात आला.

काँग्रेस पक्षाचे आयोजन : हजारो शेतकऱ्यांचा सहभाग, मुख्यमंत्र्यांना पाठविले निवेदनचंद्रपूर: काँग्रेस पक्षाच्या वतीने केंद्र व राज्य सरकारच्या शेतकरी धोरणा विरुद्ध शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमुक्तीसाठी स्थानिक गांधी चौकात धरणे आंदोलन करुन विद्यमान राज्य सरकारचा निषेध करण्यात आला. यात हजारोंवर शेतकऱ्यांनी सहभाग घेतला.येथील गांधी चौकात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी खासदार नरेश पुगलिया यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांना संपूर्ण कर्ज माफी देण्यात यावी, शेतकऱ्यांच्या शेती मालाला हमी भाव देण्यात यावा, युपीए सरकारचा भूमी अधिग्रहण कायदा लागू करण्यात यावा, शेतकऱ्यांना जोड धंद्यासाठी ५० टक्के अनुदान देण्यात यावे, कामगार विरोधी कायदा रद्द करुन जिल्ह्यातील बंद उद्योग सुरु करावे व भ्रष्टाचारी तथा घोटाळेबाज मंत्र्यांना मंत्रिमंडळातून बरखास्त करण्याच्या मागणीसाठी धरणे आंदोलन करण्यात आले.यावेळी चंद्रपूर जिल्हा शहर काँग्रेसचे अध्यक्ष गजानन गावंडे, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे महासचिव राहुल पुगलिया, काँग्रेसचे महासचिव अ‍ॅड. अविनाश ठावरी, नगरसेवक प्रविण पडवेकर, बल्लारपूरच्या नगराध्यक्ष छाया मडावी, तालुका काँग्रेस अध्यक्ष घनश्याम मुलचंदानी, जिल्हा परिषद सदस्य रामभाऊ टोंगे, अविनाश जाधव, जिल्हा परिषद गट नेते डॉ. सतिश वारजुरकर, विनोद अहीरकर, चंद्रकांत गोहोकर, ओमेश्वर पद्मगिरीवार, माजी जिल्हा परिषद सदस्य गोदरु जुमनाके, प्रकाश गांगरेड्डीवार, तारासिंग कलशी, संजय महाडोळे, अनेकश्वर मेश्राम, अ‍ॅड. हरिश गेडाम, साईनाथ बुचे, चंद्रशेखर पोडे यांच्यासह शेकडा शेतकरी उपस्थित होते. दरम्यान, धरणे आंदोलनातील प्रमुख पदाधिकाऱ्यांनी राहुल पुगलिया यांच्या नेतृत्वात न्याय्य मागण्यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावाने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. धरणे आंदोलनात जिल्हा भरातील शेकडोंवर शेतकऱ्यांची उपस्थिती होती. (शहर प्रतिनिधी)चंद्रपूर : शेतकऱ्यांना संपूर्ण कर्ज मुक्ती व मुस्लिम समुदायाला आरक्षण, यासह इतर अनेक मागण्यांच्या पूर्ततेसाठी आमदार विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वात चंद्रपूर जिल्हा शहर काँग्रेस कमेटी व चंद्रपूर जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमेटीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. जिल्ह्यातील हजारो शेतकरी बांधव या मोर्चात सहभागी झाले होते.तत्पूर्वी येथील गांधी चौकात सभा घेण्यात आली. यावेळी आ. विजय वडेट्टीवार, ग्रामीण काँग्रेसचे अध्यक्ष प्रकाश देवतळे, चंद्रपूर जिल्हा शहर काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष नंदू नागरकर, काँग्रेसच्या महाराष्ट्र प्रदेश सचिव सुनिता लोढिया, महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष आश्विनी खोब्रागडे, माजी जिल्हाध्यक्ष विनायक बांगडे, माजी आमदार सुभाष धोटे, माजी आमदार अविनाश वारजुकर, सुभाषसिंह गौर, डॉ. विजय देवतळे, आसावरी देवतळे, देवराव भांडेकर, प्रमोद राखुंडे, महेंद्र मेंढे, आबिद अली उपस्थित होते. त्यानंतर जिल्हाभरातील हजारो शेतकरी गांधी चौकात एकत्र झाले. दुपारी १ वाजताच्या सुमारास गांधी चौकातून मोर्चा काढण्यात आला. मोर्चात कर्जबाजारीला कंटाळून आत्महत्या करू पाहणाऱ्या शेतकऱ्यांचे ह्दयद्रावक दृष्य साकारण्यात आले होते. शहराच्या मुख्य मार्गावरून सदर मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयाकडे गेला. शेतकऱ्यांना कर्ज मुक्ती मिळालीच पाहिजे, मुस्लिम समाजाला आरक्षण दिलेच पाहिजे अशा घोषणा देण्यात येत होत्या. मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकल्यानंतर आ. विजय वडेट्टीवार, माजी आमदार सुभाष धोटे, नंदू नागरकर, प्रकाश देवतळे, विनायक बांगडे, सुभाषसिंह गौर, देवराव भांडेकर, शिवा राव, विनोद दत्तात्रय,आश्विनी खोब्रागडे, नंदा अल्लूरवार, डॉ. आसावरी देवतळे, यांच्या शिष्टमंडळाद्वारे जिल्हाधिकारी डॉ. दीपक म्हैसेकर यांची भेट घेऊन त्यांच्या मार्फतीने मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले. महाराष्ट्रात दुष्काळ, अवकाळी पाऊस, गारपीट, वादळी वारे अशा नैसर्गिक संकटामुळे मागील वर्षी मोेठे नुकसान झाले. थोड्या फार प्रमाणात काही पिके आली. त्याला योग्य भाव मिळाला नाही. त्यामुळे सध्या शेतकरी प्रचंड आर्थिक अडचणीत आहे. बँकांचे कर्ज थकले आहे. पाल्यांचे शिक्षण, विवाह आदी कौटुंबिक जबाबदाऱ्यांसाठी त्याच्याकडे पैसा नाही. त्यामुळे आता अधिक उशिर न करता तातडीने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी जाहीर केली जावी व मुस्लिम समुदायाला पाच टक्के आरक्षण देण्यात यावे, अशी मागणी या निवेदनातून केली आहे. (शहर प्रतिनिधी)