शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
2
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
3
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
4
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
5
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
6
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
7
१२४ वर्षांनंतर अक्षय तृतीया-चतुर्थी-रोहिणी नक्षत्र अन् बुधवारचा दुर्मीळ योग!
8
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
9
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
10
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
11
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
12
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
13
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
14
टी२० मुंबई लीगसाठी आयकॉन खेळाडूंची घोषणा; यादीत सूर्यकुमार, श्रेयससह ८ भारतीय खेळाडू
15
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
16
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
17
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
18
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
19
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
20
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल

जंगली जनावरांनी केले पीक उद्ध्वस्त

By admin | Updated: May 7, 2017 00:33 IST

मूल तालुक्यातील मारोडा परिसरातील शिवापूर चक येथे सर्व्हे नं. २४४ मध्ये जंगलाला लागून किरण विठ्ठलराव पोरेड्डीवार यांचे धानपीक शेवटच्या टप्प्यात म्हणजे .....

धान पीक नष्ट : वन विभागाकडे नुकसानभरपाईची मागणीलोकमत न्यूज नेटवर्कचिखली : मूल तालुक्यातील मारोडा परिसरातील शिवापूर चक येथे सर्व्हे नं. २४४ मध्ये जंगलाला लागून किरण विठ्ठलराव पोरेड्डीवार यांचे धानपीक शेवटच्या टप्प्यात म्हणजे जवळपास धानाचा निसवापूर्ण होत असताना शेती भोवती पूर्ण कुंपण केले असतानासुद्धा अचानक रात्री जंगली रान म्हशींनी पिकावर हल्ला चढविला आणि एका रात्रीतून पूर्ण धानपीक फस्त केले. पोरेड्डीवार यांच्या मालकीचे २.९ हे.आर. शेत असून त्यापैकी १.२० हे. आर. जागेमध्ये उन्हाळी धान पिकाची लागवड केली. मोठ्या कष्टाने सिंचनाची सोय करून आपल्याला शेतीमधून फायदा होईल या दृष्टिकोनातून शेतात विहीर बांधली. विहिरीला पाणी भरपूर असल्याने त्यांनी उन्हाळी धान पिकाची लागवड केली. दुसऱ्या दिवशी त्यांना शेतात फक्त धानाचे खुतवे दृष्टीस पडले. त्यामुळे शेतकऱ्यांची आतापर्यंत केलेली मेहनत व खर्च केलेला पैसा पूर्णत: वाया गेला. त्यांचे एक ते दीड लाखाचे नुकसान झाले आहे.एकीकडे वन विभागाच्या जाचक अटी व वन्यप्राण्यांच्या हत्येवर बंदी असल्यामुळे जंगलात मोठ्या प्रमाणात वन्यप्राण्यांची संख्या वाढली आहे. त्यांना मुबलक प्रमाणात चारा मिळत नसल्यामुळे ते पिकांवर हल्ला करीत असून त्यांचा बंदोबस्त करण्यात शेतकरी अपयशी ठरत आहेत. त्याची झळ सामान्य शेतकऱ्याला सोसावी लागत आहे. या आधीही पावसाळी धानपिकाचीसुद्धा अशीच नासाडी केली होती. तेव्हा फक्त त्यांना सात हजार रुपये मिळाले. नुकसान लाख ते दीड लाखाचे आणि मदत सात हजारांची ? कसा जगेल शेतकरी ? वन विभागानी नुकसान झालेल्या शेतकऱ्याच्या धान पिकाची पाहणी करून आर्थिक मदत करावी, अशी मागणी आहे.