शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! ऑपरेशन सिंदूरला सुरुवात; भारताचा पाकिस्तान, पीओकेवर हवाई हल्ला 
2
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
3
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
4
पांड्या तुला सूर्यावर भरवसा नाय काय? मुंबई इंडियन्सनेच जिंकली असती मॅच, पण... (VIDEO)
5
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
6
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
7
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
8
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
9
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
10
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
11
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
12
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
13
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
14
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
15
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
16
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
17
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
18
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
19
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
20
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”

असुरक्षिततेमुळे फवारणी करणाऱ्या शेतमजुरांच्या जिवास धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2021 04:31 IST

गोंडपिंपरी : सध्या शेतीचा खरीप हंगाम सर्वत्र जोमात सुरू आहे. अशातच बळीराजा पूर्ण उत्साहाने शेतीकामात मग्न झाला असताना पावसाने ...

गोंडपिंपरी : सध्या शेतीचा खरीप हंगाम सर्वत्र जोमात सुरू आहे. अशातच बळीराजा पूर्ण उत्साहाने शेतीकामात मग्न झाला असताना पावसाने अचानक दडी मारल्याने पिकांवर रोगराईचे संकट ओढवले. यावर उपाययोजना म्हणून पिकांवर फवारणी करण्यासाठी शेत मालकाकडून शेतमजुरांना रोजंदारीवर फवारणी कामी लावण्यात येत आहे. मात्र शेत मालकाकडून शेतमजुरांना कुठल्याही प्रकारची सुरक्षा किट देण्यात येत नसल्यामुळे जिवावर उदार होऊन शेतमजूर विषारी औषधांची फवारणी करत असून, शेत मालकाच्या हलगर्जीपणामुळे अनेकांचा जीव धोक्यात असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.

जिल्हा सीमेवर वसलेले गोंडपिपरी तालुक्यात औद्योगिकरणाच्या अभावामुळे तसेच शासनाच्या उदासीन धोरणामुळे तालुक्यात उद्योग निर्मिती करण्यात आली नाही. यामुळे तालुक्यातील ८० टक्के लोकांचा प्रमुख व्यवसाय हा शेती व्यवसाय असून, यावरच तालुक्याची अर्थव्यवस्था विसंबून आहे. अशातच सध्या शेती व्यवसायाचा खरीप हंगाम सुरू असून, शेतमालक व शेतमजूर जोमाने कामाला लागले आहे. मात्र गेल्या पंधरा दिवसांच्या कालावधीत अपेक्षेपेक्षा कमी पाऊस पडल्याने तालुक्यातील कोरडवाहू पिकांमधील कापूस पीक तसेच ओलिताखाली शेतीमधील धान पीक यावर विविध रोगाने हल्ला चढविला आहे. यामुळे शेत मालकांनी शेतमजुरांचा शोध घेत फवारणी उपाय राबविण्यासाठी रोजंदारीवर मजूर ठेवले. मात्र विषारी रासायनिक औषधे असलेल्या द्रव फवारणीसाठी शेतमजुरांना कुठल्याही सुरक्षा कवच किंवा किट न देता फवारणी करण्यास कामाला लावण्यात येत असून, फवारणी काम करणाऱ्या मजुराला याचे दुष्परिणाम आरोग्यावर जाणवत आहे. अशा असुरक्षित कामामुळे चक्क जिवावर उदार होऊन काम करावे लागत आहे. शेतमालकांनी शेतमजुरांच्या जीवनाबाबत गंभीरता दर्शवून फवारणी काम करताना सुरक्षा किट प्रदान करूनच फवारणी करून घ्यावी, अशी मागणी मजुरांनी केली आहे.

120821\images (5).jpeg

सुरक्षा किट वीना फवारणी करताना शेतमजूर