शहरं
Join us  
Trending Stories
1
आता दोघांनीही थांबावे; डोनाल्ड ट्रम्प यांची भारत-पाकिस्तानमध्ये पुन्हा मध्यस्थीची ऑफर
2
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
3
भारताच्या एअर स्ट्राईकमुळे पाकिस्तानमध्ये कितीजण मृत्युमुखी पडले? आकडा आला समोर  
4
बहावलपूरवरील हल्ला पाकिस्तानी सैन्याच्या लागलाय जिव्हारी, कापलं गेलंय नाक, कारण काय?
5
पाकिस्तानच्या गोळीबारात भारतीय जवान शहीद; डॉक्टरांनी वाचविण्याचा खूप प्रयत्न केला...
6
नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडून आगळीक, भारतीय नागरिकांच्या मृत्यूनंतर चोख प्रत्युत्तर देण्याचे लष्कराला आदेश 
7
‘ऑपरेशन सिंदूर’ला नागपुरातील ‘नागास्त्र-१’चे बळ ? टेहळणीसोबतच लक्ष्याचा भेद करण्याची क्षमता
8
पॉवरप्लेमध्ये अर्धा संघ तंबूत परतल्यावरही CSK नं काढली मॅच; प्लेऑफ्स शर्यतीत KKR तळ्यात मळ्यात
9
Operation Sindoor 2.0: पाकिस्तानला सहजासहजी सोडणार नाही भारत, आणखी काय-काय घडणार?
10
Thank You Rohit Sharma! हिटमॅनच्या कसोटी निवृत्तीनंतर कोण काय म्हणाले? वाचा सविस्तर
11
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचे अवसान गळाले, आता म्हणतात, "आम्ही संयम पाळू, तणाव आणखी वाढता नये’’  
12
मुरिदकेमध्ये बड्या दहशतवाद्याचा खात्मा? पाकिस्तानी सैन्यातील अधिकाऱ्यांची अंत्ययात्रेला हजेरी   
13
Mumbai Local: मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मुंबई लोकल सेवा विस्कळीत, प्रवाशांची गैरसोय
14
'ऑपरेशन सिंदूर'बद्दल पंतप्रधान मोदींनी कालच दिले होते संकेत? 'त्या' वाक्यावरून रंगलीये चर्चा
15
Rohit Sharma: रोहित शर्माची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
16
Operation Sindoor Live Updates: रक्ताच्या एकेक थेंबाचा बदला घेऊन, शाहबाज शरीफ यांची भारताला धमकी
17
"मारुतीरायाच्या आदर्शांचं पालन केलं, आम्ही त्यांनाच मारलं ज्यांनी…’’, राजनाथ सिंह यांचं मोठं विधान  
18
"दहशतवाद्यांना माफी नाही"; 'ऑपरेशन सिंदूर'वर इंग्लंडचे माजी PM ऋषी सुनक यांची रोखठोक प्रतिक्रिया
19
अजिंक्य रहाणेचं अर्धशतक हुकलं; पण IPL मध्ये ५ हजार धावांचा पल्ला गाठत मारली खास क्लबमध्ये एन्ट्री
20
Operation Sindoor : "कलमाबद्दल विचारणाऱ्यांना भारतीय सैन्याने महाभारत सुनावलं, आपल्या शांत झोपेमागे..."

ध्वनी प्रदूषणही डेंजर लेव्हलवर !

By admin | Updated: June 9, 2017 00:50 IST

गीत, संगीताची गोष्ट निघाली की आवाजाच्या सुमधूरतेची चर्चा रंगते. आवाजात मधुरता असली तर जगही जिंकता येते, असे म्हटले जाते.

नियमांचे पालन ध्वनी प्रदूषणाबाबतही नाहीरवी जवळे । लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : गीत, संगीताची गोष्ट निघाली की आवाजाच्या सुमधूरतेची चर्चा रंगते. आवाजात मधुरता असली तर जगही जिंकता येते, असे म्हटले जाते. मात्र हाच आवाज मर्यादा ओलांडतो, कानठळ्या बसवितो, तेव्हा ह्दयाची स्पंदने वाढतात. जल, वायू प्रदूषणाने काळंवडलेल्या चंद्रपूर जिल्ह्यात किमान ध्वनी प्रदूषण तरी नसावे; पण हाय...येथेही जिल्हावासीयांचे दुर्र्दैवच. जल आणि वायू प्रदूषणाने आरोग्याचे धिंडवडे उडत असतानाच आता ध्वनी प्रदूषणही यात हातभारच लावत आहे.चंद्रपूर जिल्ह्यात अलीकडच्या काळात औद्योगिक क्रांती झाली. महाऔष्णिक वीज केंद्र, सिमेंट कंपन्या, वेकोलिच्या कोळसा खाणी, पेपर मील, एमईएल प्लांट, पॉवर प्लांट यासह अनेक छोटेमोठे उद्योग जिल्ह्यात आहेत. आजघडीला ७५० उद्योग जिल्ह्याच्या भूमीत दिमाखाने उभे आहेत. या उद्योगात शेकडो मशनरीज, हजारो वाहने, जमिनीत खड्डा पाडणाऱ्या मशीन्स आहेत. या मशीनरीजचा आवाज नेहमी औद्योगिक परिसरात घुमत असतो. याशिवाय वेकोलि कोळसा खाण व सिमेंट कंपन्यातील वाहनांची वाहतूक २४ तास सुरू असते. ही वाहनांचा रात्रीही प्रवास सुरू राहत असल्याने वाहनांच्या मार्गावरील रहिवासी क्षेत्रात आवाजाचा त्रास जाणवतो. अनेकदा या वाहतुकीमुळे व त्यांच्या हार्नमुळे नागरिकांना झोप लागत नाही. रात्रीच्या वेळेत कोणत्याही प्रकारचे ध्वनी प्रदूषण होऊ नये, असे स्पष्ट कायद्याचे संकेत आहे. मात्र बोअरवेल खोदणाऱ्या मशीन्स नेहमी रात्रीच्या वेळेतच सुरू असतात. वेकोलिच्या कोळसा खाणीत मोठमोठे ब्लास्ट केले जाते. या ब्लास्टमुळे आजबाजुच्या घरांनाच भेगा पडतात, तेव्हा कानाचे आणि ह्दयाचे काय होत असेल, याचा विचार वेकोलिला तर सोडाच; प्रशासनालाही कधी शिवला नाही. ध्वनी प्रदूषण अधिनियम २००० नुसार आवाजाबाबत अनेक नियम लागू करण्यात आले आहे. मात्र हे नियम कधी कुणी जाणून घेण्याच्या भानगडीत पडत नाही. उलट ते पायदळी तुडविले जातात. आधीच जिल्हावासीयांचे जीवनमान जल व वायू प्रदूषणाने कमी करून टाकले आहे. आता ध्वनी प्रदूषण जिल्ह्यात गंभीर होऊ पाहत आहे. कायदा आहे हेच माहीत नाहीवाद्य वाजविण्याला कुणाचीही बंदी नाही. मात्र त्यासाठी आवाजाच्या मर्यादा आहेत. कायदाही आहे. मात्र कायदा पाळताना कुणीच दिसत नाही. किंबहुना ध्वनीचेही प्रदूषण असते आणि त्यासाठीही कायदा अस्तित्वात आहे, हेदेखील अनेकांना माहीत नाही. एरवी एखादा कायदा तोडला जाऊ नये म्हणून दक्षतेने काम करणारे पोलीस अधिकारी आणि शासकीय यंत्रणा आवाजाच्या या कायद्याबाबत गंभीर दिसत नाही. ध्वनी प्रदुषणाच्या विरोधात कायदा आहे, हे जरा इतरांनाही कळू देण्याची वेळ निश्चितच आली आहे. प्रवासी वाहनांचाही कर्णकर्कश आवाजशासनाकडे नोकऱ्या नाहीत. बेरोजगारी झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे काय रोजगार करावा, हे तरुणांना सुचेनासे होत आहे. अशावेळी ट्रॅक्स, सुमोसारखी वाहने घेऊन त्याचा प्रवासी वाहने म्हणून वापर केला जात आहे. परिणामी प्रवासी वाहने गावागावात सुमार झालेली दिसून येत आहेत. ही वाहने ध्वनी प्रदूषणाबाबत असलेल्या कोणत्याच नियमांचे पालन करीत नाही. प्रवाशांना माहित व्हावे, यासाठी या वाहनांचे हार्नही मोठ्या आवाजाचे असतात.डीजेचा तर फक्त धिंगाणासध्या जमाना डीजेचा आहे. कमी आवाजात कुणाचे भागतच नाही. विशेष म्हणजे, हे डिजे १२५ डेसीबल आवाजाचे असतात. असे असले तरी या डीजेला ५० ते ५५ डेसीबल आवाजाची मर्यादा ठरवून देण्यात आली आहे. मात्र याचे भान डीजे वाजविणाऱ्याला आणि डीजेच्या तालावर नाचणाऱ्याला नसते. गणपती-देवीच्या विसर्जन मिरवणुकीपर्यंत सिमीत असलेला हा प्रकार आता चक्क लग्नापर्यंत पोहचला आहे.कानठळ्या बसतील एवढ्या आवाजात डिजे वाजवून तासाप्रमाणे पैसा वसूल करण्याच्या आसुरी वृत्तीपायी ही अतिउत्साही मंडळी इतरांच्या जीवावर उठली आहे.