शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
3
SL vs BAN : 'काठावर पास' झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
4
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
5
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
6
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
7
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
8
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
9
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
10
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
11
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
12
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
13
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
14
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
15
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
16
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
17
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
18
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
19
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
20
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...

ध्वनी प्रदूषणही डेंजर लेव्हलवर !

By admin | Updated: June 9, 2017 00:50 IST

गीत, संगीताची गोष्ट निघाली की आवाजाच्या सुमधूरतेची चर्चा रंगते. आवाजात मधुरता असली तर जगही जिंकता येते, असे म्हटले जाते.

नियमांचे पालन ध्वनी प्रदूषणाबाबतही नाहीरवी जवळे । लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : गीत, संगीताची गोष्ट निघाली की आवाजाच्या सुमधूरतेची चर्चा रंगते. आवाजात मधुरता असली तर जगही जिंकता येते, असे म्हटले जाते. मात्र हाच आवाज मर्यादा ओलांडतो, कानठळ्या बसवितो, तेव्हा ह्दयाची स्पंदने वाढतात. जल, वायू प्रदूषणाने काळंवडलेल्या चंद्रपूर जिल्ह्यात किमान ध्वनी प्रदूषण तरी नसावे; पण हाय...येथेही जिल्हावासीयांचे दुर्र्दैवच. जल आणि वायू प्रदूषणाने आरोग्याचे धिंडवडे उडत असतानाच आता ध्वनी प्रदूषणही यात हातभारच लावत आहे.चंद्रपूर जिल्ह्यात अलीकडच्या काळात औद्योगिक क्रांती झाली. महाऔष्णिक वीज केंद्र, सिमेंट कंपन्या, वेकोलिच्या कोळसा खाणी, पेपर मील, एमईएल प्लांट, पॉवर प्लांट यासह अनेक छोटेमोठे उद्योग जिल्ह्यात आहेत. आजघडीला ७५० उद्योग जिल्ह्याच्या भूमीत दिमाखाने उभे आहेत. या उद्योगात शेकडो मशनरीज, हजारो वाहने, जमिनीत खड्डा पाडणाऱ्या मशीन्स आहेत. या मशीनरीजचा आवाज नेहमी औद्योगिक परिसरात घुमत असतो. याशिवाय वेकोलि कोळसा खाण व सिमेंट कंपन्यातील वाहनांची वाहतूक २४ तास सुरू असते. ही वाहनांचा रात्रीही प्रवास सुरू राहत असल्याने वाहनांच्या मार्गावरील रहिवासी क्षेत्रात आवाजाचा त्रास जाणवतो. अनेकदा या वाहतुकीमुळे व त्यांच्या हार्नमुळे नागरिकांना झोप लागत नाही. रात्रीच्या वेळेत कोणत्याही प्रकारचे ध्वनी प्रदूषण होऊ नये, असे स्पष्ट कायद्याचे संकेत आहे. मात्र बोअरवेल खोदणाऱ्या मशीन्स नेहमी रात्रीच्या वेळेतच सुरू असतात. वेकोलिच्या कोळसा खाणीत मोठमोठे ब्लास्ट केले जाते. या ब्लास्टमुळे आजबाजुच्या घरांनाच भेगा पडतात, तेव्हा कानाचे आणि ह्दयाचे काय होत असेल, याचा विचार वेकोलिला तर सोडाच; प्रशासनालाही कधी शिवला नाही. ध्वनी प्रदूषण अधिनियम २००० नुसार आवाजाबाबत अनेक नियम लागू करण्यात आले आहे. मात्र हे नियम कधी कुणी जाणून घेण्याच्या भानगडीत पडत नाही. उलट ते पायदळी तुडविले जातात. आधीच जिल्हावासीयांचे जीवनमान जल व वायू प्रदूषणाने कमी करून टाकले आहे. आता ध्वनी प्रदूषण जिल्ह्यात गंभीर होऊ पाहत आहे. कायदा आहे हेच माहीत नाहीवाद्य वाजविण्याला कुणाचीही बंदी नाही. मात्र त्यासाठी आवाजाच्या मर्यादा आहेत. कायदाही आहे. मात्र कायदा पाळताना कुणीच दिसत नाही. किंबहुना ध्वनीचेही प्रदूषण असते आणि त्यासाठीही कायदा अस्तित्वात आहे, हेदेखील अनेकांना माहीत नाही. एरवी एखादा कायदा तोडला जाऊ नये म्हणून दक्षतेने काम करणारे पोलीस अधिकारी आणि शासकीय यंत्रणा आवाजाच्या या कायद्याबाबत गंभीर दिसत नाही. ध्वनी प्रदुषणाच्या विरोधात कायदा आहे, हे जरा इतरांनाही कळू देण्याची वेळ निश्चितच आली आहे. प्रवासी वाहनांचाही कर्णकर्कश आवाजशासनाकडे नोकऱ्या नाहीत. बेरोजगारी झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे काय रोजगार करावा, हे तरुणांना सुचेनासे होत आहे. अशावेळी ट्रॅक्स, सुमोसारखी वाहने घेऊन त्याचा प्रवासी वाहने म्हणून वापर केला जात आहे. परिणामी प्रवासी वाहने गावागावात सुमार झालेली दिसून येत आहेत. ही वाहने ध्वनी प्रदूषणाबाबत असलेल्या कोणत्याच नियमांचे पालन करीत नाही. प्रवाशांना माहित व्हावे, यासाठी या वाहनांचे हार्नही मोठ्या आवाजाचे असतात.डीजेचा तर फक्त धिंगाणासध्या जमाना डीजेचा आहे. कमी आवाजात कुणाचे भागतच नाही. विशेष म्हणजे, हे डिजे १२५ डेसीबल आवाजाचे असतात. असे असले तरी या डीजेला ५० ते ५५ डेसीबल आवाजाची मर्यादा ठरवून देण्यात आली आहे. मात्र याचे भान डीजे वाजविणाऱ्याला आणि डीजेच्या तालावर नाचणाऱ्याला नसते. गणपती-देवीच्या विसर्जन मिरवणुकीपर्यंत सिमीत असलेला हा प्रकार आता चक्क लग्नापर्यंत पोहचला आहे.कानठळ्या बसतील एवढ्या आवाजात डिजे वाजवून तासाप्रमाणे पैसा वसूल करण्याच्या आसुरी वृत्तीपायी ही अतिउत्साही मंडळी इतरांच्या जीवावर उठली आहे.