शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Rains: रायगडला मुसळधार पावसाचा तडाखा, २४ तासांत १२९.३ मिमी पावसाची नोंद, अनेक मार्ग ठप्प!
2
स्विस बँकांमध्ये भारतीयांच्या ठेवींमध्ये तीन पट वाढ! २०२१ नंतर विक्रमी पातळी गाठली
3
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
4
Air India Plane Crash: विमान अपघातातील २१५ मृतांची ओळख पटली, १९८ मृतदेह कुटुंबांकडे
5
Share Market Today: आधी फ्लॅट सुरुवात, नंतर Sensex ची २५५ अंकांनी उसळी; PSU बँकांमध्ये जोरदार खरेदी
6
इराणच्या अस्थिरतेला पाकिस्तान घाबरला! म्हणाला,'इस्रायली हल्ला आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन'
7
पॅन कार्ड बनवण्यासाठी आता आवश्यक झालं 'हे' डॉक्युमेंट, आधार लिंक करायची अखेरची तारीखही जाणून घ्या
8
झोपडपट्टीधारकांना मुंबईबाहेर काढू शकत नाही- मुंबई उच्च न्यायालय
9
Air India Plane Crash: एअर होस्टेस रोशनीच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार!
10
Eknath Shinde: "...हे पाप तुमचे आहे!" एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
11
आमिर खानसोबत फोटोसाठी पोझ देत होती जिनिलीया, बाजूला उभा राहून बघत होता रितेश, अन् मग...
12
"शिवसेनाप्रमुखांचा ब्रँड पुसून टाकण्याचा प्रयत्न कराल तर नामोनिशान पुसून टाकू"
13
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
14
Mumbai Local: मुंबईकरांचा प्रवास आणखी सुखकर होणार, रेल्वेमंत्र्यांची लोकल ट्रेनबाबत मोठी घोषणा
15
आजचे राशीभविष्य : २० जून २०२५; विनाकारण खर्च वाढतील, प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
16
रॅपिडो, उबर बाइक टॅक्सीविरुद्ध गुन्हा, नेमकं प्रकरण काय?
17
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, भावुक झाली करिश्मा, मुलांना अश्रू अनावर
18
samruddhi mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर अपघातात दोघांचा मृत्यू, जीपचालकाला डुलकी लागल्याने दुर्घटना!
19
Bombay High Court: ‘त्या’ एसआरए योजनेत ३५ टक्के जागा खुल्या ठेवा
20
MSRTC: ऐन हंगामात एसटीकडे प्रवाशांची पाठ, उत्पन्नात मोठी घट!

बापरे ! पिकांच्या रखवालीसाठी रात्रभर रावट्यावर जागरण !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2022 05:00 IST

पळसगाव वन परिसरातील विहीरगाव, पिपर्डा, मदनापूर, करबडा, गोंडमोहाळी, वाघेडांतर्गत वनविभागाचे जंगल आहे. त्याच परिसरात मोठे तलाव असल्याने वन विभागाच्या जंगलातील वन्यप्राणी पाणी पिण्यासाठी रात्रीच्या वेळी तलाव व बोडीवर येतात. त्यामुळे वन विभागाच्या जंगलाला लागून असलेल्या शेतकऱ्यांमध्ये आपल्या शेतात रावट्या तयार करून रात्रभर जागरण करावे लागत आहे.

विकास खोब्रागडेलोकमत न्यूज नेटवर्कपळसगाव (पिपर्डा) : चिमूर तालुक्यातील ताडोबाच्या बफर झोनअंतर्गत येणाऱ्या अतिदुर्गम भागात असलेल्या पळसगाव व  परिसरातील गावात ताडोबाच्या वन विभागाच्या जंगलाला लागून असलेल्या शेतकऱ्यांना पिके राखण्यासाठी शेतात रावट्या टाकून रात्रभर जागरण करावे लागत आहे.पळसगाव वन परिसरातील विहीरगाव, पिपर्डा, मदनापूर, करबडा, गोंडमोहाळी, वाघेडांतर्गत वनविभागाचे जंगल आहे. त्याच परिसरात मोठे तलाव असल्याने वन विभागाच्या जंगलातील वन्यप्राणी पाणी पिण्यासाठी रात्रीच्या वेळी तलाव व बोडीवर येतात. त्यामुळे वन विभागाच्या जंगलाला लागून असलेल्या शेतकऱ्यांमध्ये आपल्या शेतात रावट्या तयार करून रात्रभर जागरण करावे लागत आहे. सध्या शेतात हरभरा, गहू, उन्हाळी धान पिकाची पेरणी शेतकऱ्यांनी केली आहे. वन्य प्राण्यामुळे नुकसान होत आहे. त्यामुळे त्यापासून वाचण्यासाठी शेतकऱ्यांनी धावपळ सुरू केली असून शेतकऱ्यांनी शेतात रावट्या उभारल्या आहेत.  रात्रीच्या वेळी वन्यप्राण्यांची भीती असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले. त्यामुळे शेतकऱ्यांवर चौफेर संकट निर्माण झाले. जीव धोक्यात घालून शेतकरी पिकांची रखवाली करताना दिसत आहेत.  यापूर्वी या परिसरात वन्यप्राण्यांनी जनावरांवर हल्ला केल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. यात जनावरे दगावलीही आहेत.  मात्र, पिकांवरच उदरनिर्वाह असल्याने जीव धोक्यात घालून शेतकरी पीक राखत आहेत.

नुकसान भरपाईत वाढ करण्याची गरजवन्य प्राण्यांकडून जनावरावर हल्ले झाले आहेत. पशुपालकांची  जनावरे दगावली आहेत. त्यांना वन विभागाकडून नुकसान भरपाई मिळते. मात्र, त्यात वाढ होणे महत्त्वाचे आहे. तोकडी मदत मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संताप व्यक्त होत आहे, प्रशासनाने या सर्वांची दखल घेऊन नुकसान भरपाईमध्ये वाढ करण्याची मागणी होत आहे.

 

टॅग्स :agricultureशेती