शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय शिष्टमंडळातील समावेशामुळे काँग्रेस नाराज, आता शशी थरूर स्पष्टच बोलले, म्हणाले...  
2
Mumbai Water Storage: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये फक्त १८ टक्के पाणीसाठा शिल्लक
3
IPL 2025 Playoffs Race : आता MI सह ६ संघ शर्यतीत; कुणाचा पेपर सोपा कुणाला आहे सर्वाधिक धोका?
4
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
5
IPL 2025 : गत चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स OUT! 'विराट' शक्ती प्रदर्शनासह RCB टॉपला; पण...
6
"पुतीन यांच्याशी थेट बोलणार, रशिया आणि युक्रेनमधील भीषण युद्ध थांबवणार’’, ट्रम्प यांचं मोठं विधान
7
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
8
Pune: पुण्यात १५ वर्षीय मुलीला सर्पदंश, वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू
9
तू स्वप्नातही...! राहुल द्रविडचा हिटमॅन रोहितसाठी खास मेसेज; मुंबई इंडियन्सनं शेअर केला व्हिडिओ
10
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
11
IPL 2025 : मोहीम फत्ते! 'दर्दी' चाहत्यांनी विराटसाठी व्हाइट जर्सीत केली गर्दी
12
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
13
ज्योती मल्होत्रा ​​कोण आहे? पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली झाली अटक
14
दर्यापूरचे सराफा दुकान फोडणारी आंतरराज्यीय टोळी अटकेत
15
पाच बायका, शाहबाज शरीफ यांची लव्ह स्टोरी ऐका, चुलत बहिणीशी केलं पहिलं लग्न, त्यानंतर...
16
नातेवाईकावर अंत्यसंस्कार करून आंघोळीसाठी नदीत उरतले, बाप-लेकासह तिघांचा बुडून मृत्यू
17
अलिशान स्पोर्ट्स कारवरील स्क्रॅच बघून संतापला रोहित शर्मा; भावावर असा काढला राग (VIDEO)
18
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
19
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच आईला संपवलं; इन्स्टाग्रामने उलगडलं हत्येचं गूढ
20
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा

चिंतलधाबा येथे सिलिंडर गॅस वाटपात सावळागोंधळ

By admin | Updated: May 13, 2015 00:06 IST

वनव्यवस्थापन समिती व वनविभागाकडून गेल्या दोन वर्षापासून गॅस कनेक्शनचे पैसे भरुन सुद्धा गॅस कनेक्शनचा पुरवठा करण्यात आले नसल्याने ....

पोंभुर्णा: वनव्यवस्थापन समिती व वनविभागाकडून गेल्या दोन वर्षापासून गॅस कनेक्शनचे पैसे भरुन सुद्धा गॅस कनेक्शनचा पुरवठा करण्यात आले नसल्याने स्थानिक लाभार्थ्यांवर अन्याय झाला आहे. यामुळे सरपनाचे मोठे संकट उभे ठाकले असून जाळण्यासाठी लाकडे कुठून आणावीत, असा प्रश्न लाभार्थ्यांना पडला आहे. पोंभुर्णा तालुक्यातील चिंतलधाबा व खरमत या गावातील लाभार्थ्यांनी गेल्या दोन वर्षांपासून चिंतलधाबा येथील वन व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष देवराव संभाजी कळते, खरमत येथील अध्यक्ष अनिल दादाजी शेडमाके व वनसंरक्षक पालीकोंडावार यांचेकडे स्थानिक लाभार्थ्यांनी दोन हजार २५२ रुपये तर काही लाभार्थ्यांनी एक हजार ५०० रुपये याप्रमाणे रक्कम जमा केली. त्यातील काही लाभार्थ्यांना गॅस कनेक्शनचे वाटपसुद्धा करण्यात आले. परंतु यातील बहुतांश लाभार्थ्यांना दोन वर्षांचा कालावधी लोटूनसुद्धा गॅस देण्यात आले नाही. त्यामुळे या योजनेत सावळा गोंधळ झाल्याचा आरोप लाभार्थ्यांकडून केला जात असून सदर भोंगळ कारभाराची चौकशी करुन संबंधित प्रकरणातील दोषी व्यक्तीवर कारवाई करण्यात यावी व लाभार्थ्यांना सिलेंडर गॅसचा पुरवठा करण्यात यावा, यासाठी वन् ामंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे नोव्हेंबर २०१४ मध्ये वाघाच्या हल्यात ठार झालेल्या पद्मा मडावी यांच्या कुटुंबियांना भेट देण्यासाठी चिंतलधाबा येथे आले असताना त्यांना लेखी निवेदन देण्यात आले. परंतु सहा महिन्यांचा कालावधी लोटूनसुद्धा संबंधीत व्यक्तींवर कुठलीच कारवाई झाली नाही. तसेच लाभार्थ्यांना अजुनपर्यंत गॅसचे वितरणसुद्धा करण्यात आले नाही. त्यामुळे संबंधित लाभार्थ्यांना इंधन व्यवस्थेसाठी भटकंती करावी लागत आत्ते. एकीकडे वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी वन्य प्राण्यांच्या भितीमुळे नागरिकांना सरपणासाठी जंगलात जाण्यास मज्जाव करतात, तर दुसरीकडे गॅस सिलिंडर वाटप न झाल्याने इंधनाचा बिकट प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे त्यांची चुल पेटणार कशी, ते जगणार कसे असे विविध प्रश्न त्यांच्यासमोर उभे ठाकले असून वनविभागाच्या नाकर्तेपणामुळेच स्थानिकांना सरपण जमा करण्यास जावे लागत आहे. परिणामी ग्रामीण परिसरातील जनतेचे जंगली जनावरांमुळे जीवन धोक्यात येत असून याला केवळ वनविभाग व वनसमिती जबाबदार असल्याचे बोलल्या जात आहे. सदर प्रकरणाची तात्काळ चौकशीी करुन दोषींवर कारवाई करण्यात यावी व गॅसपासून वंचित असलेल्या लाभार्थ्यांना गॅसचे वितरण करण्याची मागणी चिंतलधाबा व खरमत येथील लाभार्थ्यांनी केली आहे. (वार्ताहर) वनमंत्र्यांचे आश्वासन हवेत विरले४पोंभुर्णा तालुक्यातील चिंतलधाबा येथील महिला पद्मा हनुमंत मडावी (३२) ही महिला २१ नोव्हेंबर २०१४ रोजी परिसरातील जंगलामध्ये सरपण गोळा करण्यासाठी गेली असता नरभक्षक वाघाने तिच्यावर हल्ला करुन तिला जागीच ठार केले. या महिलेच्या कुटुंबियाना भेटण्यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री तथा वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी नोव्हेंबरमध्ये चिंतलधाबा येथे भेट दिली. पद्मा मडावी यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत देऊन त्यांचे सांत्वन केले. तेव्हा गावकऱ्यांनी ना.मुनगंटीवारांना भेटून सरपणविषयक समस्या सोडविण्याची मागणी केली. त्यावर त्यांनी वनविभागाचे डेपोवर निस्तार दरातून ३०० रुपये दराने बिट उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याचे सांगितले. परंतु अजूनपर्यंत ३०० रुपयांमध्ये मिळणारे निस्तार हक्काचे बिट स्थानिक परिसरात पोहोचलेच नसल्याने त्यांनी दिलेले आश्वासन हवेतत विरले असल्याचे दिसते.