शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
2
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
3
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
4
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
5
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
6
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
7
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
8
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
9
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
10
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
11
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
12
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
13
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
14
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
15
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
16
लोकसभेत असं काय घडलं की अमित शाह यांच्या सुरक्षेसाठी धावले मार्शल? विधेयकाची प्रतही फाडली गेली!
17
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
18
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
19
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
20
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव

मनुष्यबळ पुनर्रचनेत ग्राहकांचे हित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2019 22:36 IST

महावितरणमध्ये काम करत असलेल्या एकाच क्षेत्रिय अधिकारी किंवा कर्मचाऱ्याकडे नवीन कनेक्शन देणे, वसुली करणे, थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करणे, वीजगळती कमी करणे अशा अनेक जबाबदाऱ्या असतात. त्यामुळे कामाला योग्य न्याय मिळत नाही. कामाची गुणवत्ता बाधित होते. यावर पर्याय म्हणून मनुष्यबळ पुनर्रचना आराखडा व्यवस्थापनाने तयार केला आहे.

ठळक मुद्देप्रसाद रेशमे : महावितरणच्या नवीन आराखड्याचे सादरीकरण

लोकमत न्यूज नेटवर्कच्ांद्रपूर : महावितरणमध्ये काम करत असलेल्या एकाच क्षेत्रिय अधिकारी किंवा कर्मचाऱ्याकडे नवीन कनेक्शन देणे, वसुली करणे, थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करणे, वीजगळती कमी करणे अशा अनेक जबाबदाऱ्या असतात. त्यामुळे कामाला योग्य न्याय मिळत नाही. कामाची गुणवत्ता बाधित होते. यावर पर्याय म्हणून मनुष्यबळ पुनर्रचना आराखडा व्यवस्थापनाने तयार केला आहे. महावितरणचे ग्राहक व कर्मचाऱ्यांच्या भल्यासाठीच हा आराखडा आहे. यातून कार्यसंस्कृती वाढेल. कर्मचाºयांनी वस्तुनिष्ठता लक्षात घेऊन स्वीकारावा, असे प्रतिपादन महावितरणचे कार्यकारी संचालक (पायाभूत आराखडा) प्रसाद रेशमे यांनी केले.चंद्र्रपूर व गडचिरोली मंडळ कार्यालयात गुरूवारी घेतलेल्या बैठकीत नवीन आराखडा सादर करताना ते बोलत होते. महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकिय संचालक संजीव कुमार यांच्या निर्देशानुसार ही पुनर्रचना करण्यात आली. या रचनेबाबत महावितरण अधिकारी व कर्मचारी, संघटनांची मते जाणून घेण्यात आले. महावितरणचे कार्यकारी संचालक (पायाभूत आराखडा) रेशमे यानी कर्मचारी, संघटनेच्या प्रतिनिधींचीही चर्चा केली. नवीन आराखड्यातील सर्व पैलुंचे सादरीकरण केले. मनुष्यबळ पुनर्रचनेमुळे कोणतीही पदे कमी होणार नाहीत. पदोन्नती व सेवा ज्येष्ठता, संविधानातील आरक्षण धोरणाला धक्का लागणार नाही. नवीन धोरणामुळे जिथे काम करणाºयांची गरज आहे, तिथे मनुष्यबळ देऊन प्रत्येकाच्या कामाचे वाटप निश्चित केले जाणार आहे, अशी माहिती संचालक रेशमे यांनी दिली. ग्रामीण भागासाठी पुरेसे मनुष्यबळ मिळेल, देखभाल दुरूस्ती व बिलींगसाठी स्वतंत्र रचना होईल, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. यावेळी मुख्य अभियंता अरविंद भादिकर, अधीक्षक अभियंता अशोक म्हस्के, अनिल बोरसे, अनिल घोघरे, मुख्य औद्योगिक संबंध अधिकारी मधुसूदन मराठे, सहाय्यक महाव्यवस्थापक महेश बुरंगे, उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी सुशिल विखार, कार्यकारी अभियंता, संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.