शहरं
Join us  
Trending Stories
1
Bihar Election 2025 Date: बिहारमध्ये निवडणुकीचा बिगुल! विधानसभेच्या २४३ जागांसाठी दोन टप्प्यांत मतदान; बालदिनी निकाल
2
“भाजपाने तारखा दिल्या, ज्ञानेश कुमारांनी वाचून दाखवल्या”; बिहार निवडणुकीवरून विरोधकांची टीका
3
बिहारसह ‘या’ ७ ठिकाणी होणार पोटनिवडणुका, निवडणूक आयोगाकडून मतदान, निकालाची तारीख जाहीर
4
मोठी बातमी! राज्यातील २४७ नगरपालिका, १४७ नगरपंचायतींसाठी आरक्षण जाहीर; कोण मिळवणार सत्तेची खुर्ची?
5
'तुम्ही इतके दिवस कुठे होतात'; मुलांसह लेणीत राहणाऱ्या रशियन महिलेच्या पतीला सर्वोच्च न्यायालयाने झापले
6
ऐकावं ते नवलच! नवरदेवाने हुंडा स्वीकारण्यास दिला नकार, सासऱ्याने मोडलं लग्न; नेमकं काय घडलं?
7
रिलेशनशिपची चर्चा, यशस्वीची ती कथित गर्लफ्रेंड कोण? नात्याबाबत केला मोठा गौप्यस्फोट
8
SIP की RD? दरमहा गुंतवणूक कुठे करावी? तज्ज्ञांच्या मते 'हा' आहे मोठा फरक, निर्णयापूर्वी वाचा महत्त्वाचे मुद्दे
9
'जेव्हा तू खराब फॉर्मशी झुंजशील, तेव्हा..." धोनीनं दिलेला कानमंत्र सिराजसाठी ठरतोय करिअरचा यु-टर्न
10
VIDEO: अमेरिकन बुद्धिबळपटूनं भारताच्या डी. गुकेशच्या 'राजा'ला प्रेक्षकांमध्ये का फेकलं?
11
"मनोज जरांगे पाटील यांनी राहुल गांधींबद्दल वापरलेली भाषा निषेधार्ह, त्यांच्या वक्तव्यांना राजकीय वास’, काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया   
12
"देशात पेरलं जाणारं विष आता...'; सरन्यायाधीशांवर हल्ल्याचा प्रयत्न, शरद पवारांनी व्यक्त केली चिंता
13
आयटी, फार्मा आणि बँकिंग क्षेत्रात तेजी! निफ्टी २५,००० च्या पुढे; गुंतवणूकदारांनी कमावले २.०१ लाख कोटी
14
नवा ट्रेंड! मूल नको, पण कुत्रा-मांजर हवं; मुलांची जागा घेतली प्राण्यांनी, देशात का वाढतंय पेट पॅरेंटिंग?
15
“१९९४ला आमच्या हक्काचे १६ टक्के शरद पवारांनी ओबीसींना दिले, आमचे वाटोळे केले”: मनोज जरांगे
16
’प्रस्तावाची वाट कसली पाहता, अमित शाहांच्या दौऱ्याआधीच शेतकऱ्यांना पॅकेज जाहीर करायला हवे होते’, काँग्रेसचा टोला   
17
‘आनंदाचा शिधा’वर पुन्हा गदा! आर्थिक चणचणीमुळे योजनेसाठी निधीच नाही; गरिबांची दिवाळी फराळाविना
18
“मनोज जरांगेंना आता देव झाल्यासारखे वाटतेय, काही झाले तर चिठ्ठीत लिहिणार की...”: वडेट्टीवार
19
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये भारताने पाकिस्तानचे F-16 विमानाचे नुकसान केले होते, अमेरिकेने त्यांची दुरुस्ती केली
20
Flipkart: फ्लिपकार्टकडून ग्राहकांची फसवणूक? ५ हजारांचा पास घेऊनही आयफोन न मिळाल्यानं ग्राहक संतप्त

ग्रामीण भागाला सिंगल फेजिंग योजनेचा शाप

By admin | Updated: November 8, 2014 22:34 IST

तालुक्यातील ग्रामीण भाग लोडशेडिंग मुक्त केल्याचा मोठा गाजावाजा करीत सात वर्षांपूर्वी सिंगल फेजींग योजना कोट्यवधी रुपये खर्च करुन राबविण्यात आली. सिंगल फेजींगमध्ये गावात उजेड मिळाला.

थ्री फेजचा अत्यल्प पुरवठा :वरोरा : तालुक्यातील ग्रामीण भाग लोडशेडिंग मुक्त केल्याचा मोठा गाजावाजा करीत सात वर्षांपूर्वी सिंगल फेजींग योजना कोट्यवधी रुपये खर्च करुन राबविण्यात आली. सिंगल फेजींगमध्ये गावात उजेड मिळाला. परंतु थ्री फेजचा पुरवठा अत्यल्प प्रमाणात होत असल्याने शेताला सिंचनाकरिता पाणी देणे अडचणीचे ठरत आहे. ग्रामीण भागातील उद्योगांना थ्री फेज पुरवठा होत नसल्याने उद्योगही बुडाले आहे. त्यामुळे वरोरा तालुक्यात सिंगल फेज योजना शेतकरी व उद्योगांकरिता शाप ठरली आहे. ग्रामीण व शहरी भाग लोडशेंडींगमुक्त करण्याकरिता वीज वितरण कंपनीने नागरिकांच्या सहकार्याने अक्षय प्रकाश योजना राबविली. नागरिकांनी प्रतिसाद दिल्याने लोडशेडिंगमुक्त करण्यासाठी विशेषत: ग्रामीण भागात सिंगल फेज योजना राबविणे सुरू केले. लोडशेडींगच्या वेळी घरातील वीज पुरवठा सुरू राहतो. ही योजना वरोरा तालुक्यात यशस्वीपणे राबविल्याने वरोरा तालुक्याचे नाव महाराष्ट्रात सर्वत्र गेले होते. आता या योजनेची डोकेदुखी दिवसागणिक वाढत आहे.बुधवार, गुरुवार व शनिवार या तीन दिवसात सकाळी १०.४५ ते दुपारी ४.४५ वाजेपर्यंत थ्री फेजचा पुरवठा राहतो तर मंगळवार,शुक्रवार व रविवार थ्री फेजचा पुरवठा दुपारी ३.४५ ते रात्री ९.४५ पर्यंत राहतो. त्यामुळे आठवड्यातील चार दिवस शेती व उद्योगांना थ्री फेजचा पुरवठा दिवसा सहा तास मिळतो तर उर्वरित दिवसात रात्री सहा तास मिळतो. परंतु या दिवसात रात्री ९.४५ पर्यंत थ्री फेजचा पुरवठा होत असल्याने रात्री शेती व उद्योगांना त्याचा उपयोग कसा करावा, हा प्रश्न सध्या अनुत्तरीत आहे. २४ तासात ग्रामीण भागात फक्त सहा तास थ्री फेजचा पुरवठा सुरू असतो. त्यामुळे लाखो रुपये गुंतवणूक केलेल्या उद्योजकांना चांगलाच फटका बसत आहे. अशीच अवस्था शेतकऱ्यांची झाली आहे. सरपटणाऱ्या प्राण्यांचा मोठा वावर शेतात असल्याने रात्री पिकांना पुरेसे पाणी देता येत नाही. त्यामुळे कर्ज काढून शेतात ट्यूबवेल व विहिरी खोदल्या. त्यावर वीज पंप बसवून सिंचनाची व्यवस्था करता येत नसल्याने शेतकऱ्यांना कर्जाचा डोंगर दिवसागणिक वाढत आहे.शेतकरी मोठ्या अडचणीत सापडला आहे. थ्री फेज सुरू असताना कधी मेंटेनन्स, ब्रेकडाऊन, शटडावून असा व्यत्ययही अनेकदा येत असते. त्यामुळे ग्रामीण भागात दिवसा थ्री फेजचा पुरवठा सातही दिवस ठेवून सध्याच्या थ्री फेजच्या तारामध्ये वाढ करणे गरजेचे झाले आहे. अन्यथा ग्रामीण भागातील वाढत्या बेरोजगारीमध्ये आणखी वाढ झाल्यास त्यात आश्चर्य वाटू नये. परिणामी या सिंगल फेजिंग योजनेमध्ये दुरुस्ती करण्याची मागणी ग्रामीण भागात जोर धरीत आहे. (तालुका प्रतिनिधी)