शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
2
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
3
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
4
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
5
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
6
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
7
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
8
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
9
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
10
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
11
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
12
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
13
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
14
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
15
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
16
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
17
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
18
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
19
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
20
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामीण भागाला सिंगल फेजिंग योजनेचा शाप

By admin | Updated: November 8, 2014 22:34 IST

तालुक्यातील ग्रामीण भाग लोडशेडिंग मुक्त केल्याचा मोठा गाजावाजा करीत सात वर्षांपूर्वी सिंगल फेजींग योजना कोट्यवधी रुपये खर्च करुन राबविण्यात आली. सिंगल फेजींगमध्ये गावात उजेड मिळाला.

थ्री फेजचा अत्यल्प पुरवठा :वरोरा : तालुक्यातील ग्रामीण भाग लोडशेडिंग मुक्त केल्याचा मोठा गाजावाजा करीत सात वर्षांपूर्वी सिंगल फेजींग योजना कोट्यवधी रुपये खर्च करुन राबविण्यात आली. सिंगल फेजींगमध्ये गावात उजेड मिळाला. परंतु थ्री फेजचा पुरवठा अत्यल्प प्रमाणात होत असल्याने शेताला सिंचनाकरिता पाणी देणे अडचणीचे ठरत आहे. ग्रामीण भागातील उद्योगांना थ्री फेज पुरवठा होत नसल्याने उद्योगही बुडाले आहे. त्यामुळे वरोरा तालुक्यात सिंगल फेज योजना शेतकरी व उद्योगांकरिता शाप ठरली आहे. ग्रामीण व शहरी भाग लोडशेंडींगमुक्त करण्याकरिता वीज वितरण कंपनीने नागरिकांच्या सहकार्याने अक्षय प्रकाश योजना राबविली. नागरिकांनी प्रतिसाद दिल्याने लोडशेडिंगमुक्त करण्यासाठी विशेषत: ग्रामीण भागात सिंगल फेज योजना राबविणे सुरू केले. लोडशेडींगच्या वेळी घरातील वीज पुरवठा सुरू राहतो. ही योजना वरोरा तालुक्यात यशस्वीपणे राबविल्याने वरोरा तालुक्याचे नाव महाराष्ट्रात सर्वत्र गेले होते. आता या योजनेची डोकेदुखी दिवसागणिक वाढत आहे.बुधवार, गुरुवार व शनिवार या तीन दिवसात सकाळी १०.४५ ते दुपारी ४.४५ वाजेपर्यंत थ्री फेजचा पुरवठा राहतो तर मंगळवार,शुक्रवार व रविवार थ्री फेजचा पुरवठा दुपारी ३.४५ ते रात्री ९.४५ पर्यंत राहतो. त्यामुळे आठवड्यातील चार दिवस शेती व उद्योगांना थ्री फेजचा पुरवठा दिवसा सहा तास मिळतो तर उर्वरित दिवसात रात्री सहा तास मिळतो. परंतु या दिवसात रात्री ९.४५ पर्यंत थ्री फेजचा पुरवठा होत असल्याने रात्री शेती व उद्योगांना त्याचा उपयोग कसा करावा, हा प्रश्न सध्या अनुत्तरीत आहे. २४ तासात ग्रामीण भागात फक्त सहा तास थ्री फेजचा पुरवठा सुरू असतो. त्यामुळे लाखो रुपये गुंतवणूक केलेल्या उद्योजकांना चांगलाच फटका बसत आहे. अशीच अवस्था शेतकऱ्यांची झाली आहे. सरपटणाऱ्या प्राण्यांचा मोठा वावर शेतात असल्याने रात्री पिकांना पुरेसे पाणी देता येत नाही. त्यामुळे कर्ज काढून शेतात ट्यूबवेल व विहिरी खोदल्या. त्यावर वीज पंप बसवून सिंचनाची व्यवस्था करता येत नसल्याने शेतकऱ्यांना कर्जाचा डोंगर दिवसागणिक वाढत आहे.शेतकरी मोठ्या अडचणीत सापडला आहे. थ्री फेज सुरू असताना कधी मेंटेनन्स, ब्रेकडाऊन, शटडावून असा व्यत्ययही अनेकदा येत असते. त्यामुळे ग्रामीण भागात दिवसा थ्री फेजचा पुरवठा सातही दिवस ठेवून सध्याच्या थ्री फेजच्या तारामध्ये वाढ करणे गरजेचे झाले आहे. अन्यथा ग्रामीण भागातील वाढत्या बेरोजगारीमध्ये आणखी वाढ झाल्यास त्यात आश्चर्य वाटू नये. परिणामी या सिंगल फेजिंग योजनेमध्ये दुरुस्ती करण्याची मागणी ग्रामीण भागात जोर धरीत आहे. (तालुका प्रतिनिधी)