शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
5
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
6
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
7
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
8
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
9
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
10
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
11
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
12
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
13
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
14
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
15
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
16
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
17
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
18
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
19
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
20
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली

ग्रामीण भागाला सिंगल फेजिंग योजनेचा शाप

By admin | Updated: November 8, 2014 22:34 IST

तालुक्यातील ग्रामीण भाग लोडशेडिंग मुक्त केल्याचा मोठा गाजावाजा करीत सात वर्षांपूर्वी सिंगल फेजींग योजना कोट्यवधी रुपये खर्च करुन राबविण्यात आली. सिंगल फेजींगमध्ये गावात उजेड मिळाला.

थ्री फेजचा अत्यल्प पुरवठा :वरोरा : तालुक्यातील ग्रामीण भाग लोडशेडिंग मुक्त केल्याचा मोठा गाजावाजा करीत सात वर्षांपूर्वी सिंगल फेजींग योजना कोट्यवधी रुपये खर्च करुन राबविण्यात आली. सिंगल फेजींगमध्ये गावात उजेड मिळाला. परंतु थ्री फेजचा पुरवठा अत्यल्प प्रमाणात होत असल्याने शेताला सिंचनाकरिता पाणी देणे अडचणीचे ठरत आहे. ग्रामीण भागातील उद्योगांना थ्री फेज पुरवठा होत नसल्याने उद्योगही बुडाले आहे. त्यामुळे वरोरा तालुक्यात सिंगल फेज योजना शेतकरी व उद्योगांकरिता शाप ठरली आहे. ग्रामीण व शहरी भाग लोडशेंडींगमुक्त करण्याकरिता वीज वितरण कंपनीने नागरिकांच्या सहकार्याने अक्षय प्रकाश योजना राबविली. नागरिकांनी प्रतिसाद दिल्याने लोडशेडिंगमुक्त करण्यासाठी विशेषत: ग्रामीण भागात सिंगल फेज योजना राबविणे सुरू केले. लोडशेडींगच्या वेळी घरातील वीज पुरवठा सुरू राहतो. ही योजना वरोरा तालुक्यात यशस्वीपणे राबविल्याने वरोरा तालुक्याचे नाव महाराष्ट्रात सर्वत्र गेले होते. आता या योजनेची डोकेदुखी दिवसागणिक वाढत आहे.बुधवार, गुरुवार व शनिवार या तीन दिवसात सकाळी १०.४५ ते दुपारी ४.४५ वाजेपर्यंत थ्री फेजचा पुरवठा राहतो तर मंगळवार,शुक्रवार व रविवार थ्री फेजचा पुरवठा दुपारी ३.४५ ते रात्री ९.४५ पर्यंत राहतो. त्यामुळे आठवड्यातील चार दिवस शेती व उद्योगांना थ्री फेजचा पुरवठा दिवसा सहा तास मिळतो तर उर्वरित दिवसात रात्री सहा तास मिळतो. परंतु या दिवसात रात्री ९.४५ पर्यंत थ्री फेजचा पुरवठा होत असल्याने रात्री शेती व उद्योगांना त्याचा उपयोग कसा करावा, हा प्रश्न सध्या अनुत्तरीत आहे. २४ तासात ग्रामीण भागात फक्त सहा तास थ्री फेजचा पुरवठा सुरू असतो. त्यामुळे लाखो रुपये गुंतवणूक केलेल्या उद्योजकांना चांगलाच फटका बसत आहे. अशीच अवस्था शेतकऱ्यांची झाली आहे. सरपटणाऱ्या प्राण्यांचा मोठा वावर शेतात असल्याने रात्री पिकांना पुरेसे पाणी देता येत नाही. त्यामुळे कर्ज काढून शेतात ट्यूबवेल व विहिरी खोदल्या. त्यावर वीज पंप बसवून सिंचनाची व्यवस्था करता येत नसल्याने शेतकऱ्यांना कर्जाचा डोंगर दिवसागणिक वाढत आहे.शेतकरी मोठ्या अडचणीत सापडला आहे. थ्री फेज सुरू असताना कधी मेंटेनन्स, ब्रेकडाऊन, शटडावून असा व्यत्ययही अनेकदा येत असते. त्यामुळे ग्रामीण भागात दिवसा थ्री फेजचा पुरवठा सातही दिवस ठेवून सध्याच्या थ्री फेजच्या तारामध्ये वाढ करणे गरजेचे झाले आहे. अन्यथा ग्रामीण भागातील वाढत्या बेरोजगारीमध्ये आणखी वाढ झाल्यास त्यात आश्चर्य वाटू नये. परिणामी या सिंगल फेजिंग योजनेमध्ये दुरुस्ती करण्याची मागणी ग्रामीण भागात जोर धरीत आहे. (तालुका प्रतिनिधी)