शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
2
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
3
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
4
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
5
Infosys ADR News: इन्फोसिसच्या एडीआरमध्ये ४० टक्क्यांची तेजी; ट्रेडिंगही थांबवलं, पाहा नक्की काय आहे प्रकरण
6
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
7
ठाकरेंना जय महाराष्ट्र, भाजपचा आणखी एक धक्का! लोकसभा लढवणारे संजोग वाघेरेंचा मोठा निर्णय
8
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
9
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
10
मल्लिका शेरावतने डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत व्हाईट हाऊसमध्ये केलं ख्रिसमस डिनर; फोटो केले शेअर
11
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
12
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
13
"मी शाहरुख खान, कृपया मला कॉल कर...", राधिकाला आलेला किंग खानचा मेसेज; म्हणाली...
14
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
15
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
16
अयोध्या राम मंदिरात ७० नवे पुजारी घेतले जाणार, ट्रस्टचा निर्णय; परिसरातील मंदिरात सेवा करणार
17
२१ डिसेंबर रोजी सुरु होणार पौष मास 'भाकड मास' का म्हटला जातो? शुभ कार्यालाही लागतो विराम!
18
पतीनं पत्नीकडून घरखर्चाचा हिशोब मागणं क्रूरता?; सुप्रीम कोर्टाने सुनावला महत्त्वाचा निकाल
19
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
20
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसच्या उमेदवाराबाबत उत्सुकता शिगेला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2019 22:13 IST

लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यापासून काँग्रेस उमेदवाराबाबत मतदारांसह सर्वच राजकीय पक्षांची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. शनिवारी काँग्रेसचे दिल्ली हायकमांड चंद्रपूर लोकसभा मतदार संघाच्या उमेदवाराबाबत निर्णय घेण्याची शक्यता सूत्राने वर्तविली आहे. याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहेत.

ठळक मुद्देआज दिल्लीत निर्णयाची अपेक्षा : अन्य राजकीय पक्षांच्या तंबूतही शांतताच

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यापासून काँग्रेस उमेदवाराबाबत मतदारांसह सर्वच राजकीय पक्षांची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. शनिवारी काँग्रेसचे दिल्ली हायकमांड चंद्रपूर लोकसभा मतदार संघाच्या उमेदवाराबाबत निर्णय घेण्याची शक्यता सूत्राने वर्तविली आहे. याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहेत.२०१४ च्या निवडणुकीत तब्बल १८ उमेदवार रिंगणात होते. यामध्ये भाजपा, काँग्रेस, बसपा या प्रमुख पक्षांसह आरपीआय, एसपी(आय), आरपी(खोरीप), आम आदमी पार्टी, लोकभारती, आ.पा. इंडिया, एसआयटीसी, बहुजन मुक्ती, प्रबुद्ध रिपब्लिकन पार्टीसह सहा अपक्ष उमेदवारांचा समावेश होता. ११ एप्रिल रोजी होऊ घातलेल्या निवडणुकीसाठी आतापर्यंत केवळ भाजप आणि वंचित बहुजन आघाडीचेच उमेदवार निश्चित झालेले आहे. उर्वरित एकाही पक्षाकडून कुणाचे नाव पुढे आले नाही. काँग्रेस हा या मतदार संघातील बलाढ्य पक्ष आहे. मात्र काँग्रेसच्या उमेदवारीचा तिढा थेट दिल्ली दरबारी गेला आहे. दिल्लीतही निर्णय व्हायला वेळ लागत असल्यामुळे कार्यकर्ते कुणाचा झेंडा हातात घ्यावा, या विवंचनेत आहे. १६ मार्च रोजी चंद्रपूर मतदार संघाबाबत पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील, अशी अपेक्षा दिल्लीत गेल्या सोमवारपासून तळ ठोकून असलेली काँग्रेसची मंडळी सांगत आहे. मात्र याबाबतही ते साशंक आहे. नामांकन अर्ज दाखल करण्याच्या दिनांकापर्यंतही उमेदवारीचा निर्णय लांबला जाऊ शकतो, असा संशयही ते वर्तवित आहे. त्यामुळे तुर्तास काँग्रेसकडून एकाही नावावर स्थानिक पक्ष नेतृत्व ठाम नसल्याचे चित्र आहे. २०१४ च्या निवडणुकीत आम आदमी पार्टी तिसऱ्या क्रमांकावर होती. आपच्या उमेदवाराने तब्बल २ लाख ४ हजार मतांपर्यंत मजल मारली होती. आता निवडणूक काही दिवसांवर असतानाही आम आदमी पार्टीची निवडणुकीसाठी तयारी दिसत नाही. ४९ हजार मते घेऊन बसपा चौथ्या क्रमांकावर होती. या निवडणुकीत बसपाकडून अद्यापही हालचाली होताना दिसत नाही. वास्तविक, काँग्रेसचा उमेदवार जाहीर होत नाही, तोपर्यंत अन्य राजकीय पक्षांच्या तंबूत शांतताच राहतील, असे बोलले जात आहे. काँग्रेस उमेदवार जनतेपुढे आल्यानंतरच या निवडणुकीला रंग चढतील, असेही बोलले जात आहे.