शहरं
Join us  
Trending Stories
1
मल्लिकार्जुन खर्गे यांच्या RSS वर बंदी घालण्याच्या मागणीवर अमित शाह यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले
2
एक काेटी वाहनांना नाही ‘हाय सिक्युरिटी नंबरप्लेट’! एकूण ६८.२४ लाख चालकांनी दिला प्रतिसाद
3
कसली थंडी..? आता अनुभवा ‘नोव्हेंबर हीट’! मुंबईसह राज्यभरात अवकाळी पावसाचीही शक्यता
4
दुलारचंद यादव हत्याकांड: नाट्यमय घडामोडींनंतर अनंत सिंह यांना अटक, रात्री पोहोचले पोलीस, त्यानंतर...
5
आजचे राशीभविष्य, ०२ नोव्हेंबर २०२५: हाती पैसा, यश-कीर्ती लाभेल; पण हट्टीपणा सोडावा
6
महिला वर्ल्डकप: आज घडणार इतिहास; प्रथमच जिंकेल भारत किंवा दक्षिण आफ्रिका; उत्सुकता शिगेला
7
कुष्ठरोगाचे निदान झाले रे झाले की, रुग्णनाेंद बंधनकारक; सार्वजनिक आरोग्य विभागाचा निर्णय
8
आयोगाचा सर्व्हर कुणाच्या कार्यालयात? कुणाची नावे काढायची, कुठली टाकायची हा कट सुरू: ठाकरे
9
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभच लाभ, पद-पैसा वाढ; ६ राशींना काहीसा ताप, तुमची रास कोणती?
10
चार हजार ग्राहकांनी वाढवली २२ मेगावॅट क्षमता; २ हजार ४६० औद्योगिक ग्राहकांचाही समावेश
11
मूक आंदोलन करून भाजपने केला पलटवार! ...हा तर मविआचा नवा कट- रवींद्र चव्हाण
12
जय हरी विठ्ठल.. एकनाथ शिंदे यांनी सपत्नीक केली विठ्ठल-रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
13
दुबार मतदार दिसताच बडवा; मविआ-मनसेचा महाएल्गार! मतदार यादीतील घोळाबाबत मुंबईत निषेध मोर्चा
14
गाव पोटा.. व्यवसाय शेती अन् वालेगावकर दाम्पत्याला मिळाला उपमुख्यमंत्र्यांसोबत महापूजेचा मान
15
‘तुमच्या विमानात आज १९८४ मद्रास स्टाईल बॉम्ब अटॅक होणार आहे’; मुंबईत इमर्जन्सी लँडिंग
16
२४ मोबाईल खेचणाऱ्या दोन आरोपींना अटक; आचोळेच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांची कामगिरी
17
ठेकेदारांचे कामबंद, हिवाळी अधिवेशन नागपूर की मुंबईत? बांधकाम खाते संभ्रमात
18
Ganesh Kale Pune: आधी चार गोळ्या झाडल्या, नंतर डोक्यात कोयत्याने वार; काळेच्या हत्येचा पोलिसांनी सांगितला थरार
19
अमेरिका 'या' देशावर स्ट्राईक करण्याच्या तयारीत, ट्रम्प यांनी दिला आदेश?; रिपोर्टमधून खुलासा
20
चीनसोबत मिळून रशियानं दिला भारताला दगा?; ताजिकिस्तानात रचलं षडयंत्र, वाचा इनसाईड स्टोरी

काँग्रेसच्या उमेदवाराबाबत उत्सुकता शिगेला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2019 22:13 IST

लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यापासून काँग्रेस उमेदवाराबाबत मतदारांसह सर्वच राजकीय पक्षांची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. शनिवारी काँग्रेसचे दिल्ली हायकमांड चंद्रपूर लोकसभा मतदार संघाच्या उमेदवाराबाबत निर्णय घेण्याची शक्यता सूत्राने वर्तविली आहे. याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहेत.

ठळक मुद्देआज दिल्लीत निर्णयाची अपेक्षा : अन्य राजकीय पक्षांच्या तंबूतही शांतताच

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यापासून काँग्रेस उमेदवाराबाबत मतदारांसह सर्वच राजकीय पक्षांची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. शनिवारी काँग्रेसचे दिल्ली हायकमांड चंद्रपूर लोकसभा मतदार संघाच्या उमेदवाराबाबत निर्णय घेण्याची शक्यता सूत्राने वर्तविली आहे. याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहेत.२०१४ च्या निवडणुकीत तब्बल १८ उमेदवार रिंगणात होते. यामध्ये भाजपा, काँग्रेस, बसपा या प्रमुख पक्षांसह आरपीआय, एसपी(आय), आरपी(खोरीप), आम आदमी पार्टी, लोकभारती, आ.पा. इंडिया, एसआयटीसी, बहुजन मुक्ती, प्रबुद्ध रिपब्लिकन पार्टीसह सहा अपक्ष उमेदवारांचा समावेश होता. ११ एप्रिल रोजी होऊ घातलेल्या निवडणुकीसाठी आतापर्यंत केवळ भाजप आणि वंचित बहुजन आघाडीचेच उमेदवार निश्चित झालेले आहे. उर्वरित एकाही पक्षाकडून कुणाचे नाव पुढे आले नाही. काँग्रेस हा या मतदार संघातील बलाढ्य पक्ष आहे. मात्र काँग्रेसच्या उमेदवारीचा तिढा थेट दिल्ली दरबारी गेला आहे. दिल्लीतही निर्णय व्हायला वेळ लागत असल्यामुळे कार्यकर्ते कुणाचा झेंडा हातात घ्यावा, या विवंचनेत आहे. १६ मार्च रोजी चंद्रपूर मतदार संघाबाबत पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील, अशी अपेक्षा दिल्लीत गेल्या सोमवारपासून तळ ठोकून असलेली काँग्रेसची मंडळी सांगत आहे. मात्र याबाबतही ते साशंक आहे. नामांकन अर्ज दाखल करण्याच्या दिनांकापर्यंतही उमेदवारीचा निर्णय लांबला जाऊ शकतो, असा संशयही ते वर्तवित आहे. त्यामुळे तुर्तास काँग्रेसकडून एकाही नावावर स्थानिक पक्ष नेतृत्व ठाम नसल्याचे चित्र आहे. २०१४ च्या निवडणुकीत आम आदमी पार्टी तिसऱ्या क्रमांकावर होती. आपच्या उमेदवाराने तब्बल २ लाख ४ हजार मतांपर्यंत मजल मारली होती. आता निवडणूक काही दिवसांवर असतानाही आम आदमी पार्टीची निवडणुकीसाठी तयारी दिसत नाही. ४९ हजार मते घेऊन बसपा चौथ्या क्रमांकावर होती. या निवडणुकीत बसपाकडून अद्यापही हालचाली होताना दिसत नाही. वास्तविक, काँग्रेसचा उमेदवार जाहीर होत नाही, तोपर्यंत अन्य राजकीय पक्षांच्या तंबूत शांतताच राहतील, असे बोलले जात आहे. काँग्रेस उमेदवार जनतेपुढे आल्यानंतरच या निवडणुकीला रंग चढतील, असेही बोलले जात आहे.