शहरं
Join us  
Trending Stories
1
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
2
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
3
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
4
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
5
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
6
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
7
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
8
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल
9
ना धक्का.. ना धोका! वनडे वर्ल्ड कप पर्यंत रोहितची कॅप्टन्सी सेफ? BCCI नव्हे तर ICC नं दिली हिंट
10
दिलीप प्रभावळकर यांना 'लगे रहो मुन्नाभाई'मध्ये अशी मिळाली महात्मा गांधींची भूमिका, म्हणाले...
11
सिक्स सेन्स? आतड्यातील बॅक्टेरिया थेट मेंदूशी साधतात संवाद; रिसर्चमध्ये आश्चर्यकारक खुलासा
12
अग्नितांडव! दिल्लीतील रुग्णालयाला भीषण आग; एकाचा मृत्यू, काचा फोडून रुग्णांना वाचवलं
13
पत्नीला कपड्यांवरून टोमणे मारणे, जेवणावरून थट्टा करणे ही क्रूरता नाही; मुंबई हायकोर्टाचा निकाल
14
ओलाची लाली उतरू लागली! ईलेक्ट्रीक मोटरसायकल आणली तरी खरेदीदार मिळेनात, जुलैची विक्री पहाल तर...
15
दररोज अंगाला साबण लावत असाल तर आताच बदला सवय; कधी, किती वेळा करायचा वापर?
16
इस्राइलच्या हल्ल्यात स्टार फुटबॉलपटूचा मृत्यू, या देशाचा ‘पेले’ अशी होती ओळख 
17
एका घरात दोनच 'लाडक्या बहिणी', इतरांचा होणार पत्ता कट; सरकारच्या नियमानं महिला धास्तावल्या
18
सॅमसंग गॅलेक्सी एस २४ अल्ट्रा ५० हजारांनी स्वस्त, कॅमेरा क्वालिटीत कुठलंही कॉम्प्रमाइज नाही!
19
मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीचा लग्नानंतर ६ महिन्यातच मृत्यू; प्रकरणात आला नवा ट्विस्ट
20
रक्षाबंधन सणासाठी जाताना अपघात; आई-वडीलांच्या डोळ्यांदेखत चिमुकल्याचा मृत्यू, गडचिरोलीतील घटना

काँग्रेसच्या उमेदवाराबाबत उत्सुकता शिगेला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2019 22:13 IST

लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यापासून काँग्रेस उमेदवाराबाबत मतदारांसह सर्वच राजकीय पक्षांची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. शनिवारी काँग्रेसचे दिल्ली हायकमांड चंद्रपूर लोकसभा मतदार संघाच्या उमेदवाराबाबत निर्णय घेण्याची शक्यता सूत्राने वर्तविली आहे. याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहेत.

ठळक मुद्देआज दिल्लीत निर्णयाची अपेक्षा : अन्य राजकीय पक्षांच्या तंबूतही शांतताच

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यापासून काँग्रेस उमेदवाराबाबत मतदारांसह सर्वच राजकीय पक्षांची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. शनिवारी काँग्रेसचे दिल्ली हायकमांड चंद्रपूर लोकसभा मतदार संघाच्या उमेदवाराबाबत निर्णय घेण्याची शक्यता सूत्राने वर्तविली आहे. याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहेत.२०१४ च्या निवडणुकीत तब्बल १८ उमेदवार रिंगणात होते. यामध्ये भाजपा, काँग्रेस, बसपा या प्रमुख पक्षांसह आरपीआय, एसपी(आय), आरपी(खोरीप), आम आदमी पार्टी, लोकभारती, आ.पा. इंडिया, एसआयटीसी, बहुजन मुक्ती, प्रबुद्ध रिपब्लिकन पार्टीसह सहा अपक्ष उमेदवारांचा समावेश होता. ११ एप्रिल रोजी होऊ घातलेल्या निवडणुकीसाठी आतापर्यंत केवळ भाजप आणि वंचित बहुजन आघाडीचेच उमेदवार निश्चित झालेले आहे. उर्वरित एकाही पक्षाकडून कुणाचे नाव पुढे आले नाही. काँग्रेस हा या मतदार संघातील बलाढ्य पक्ष आहे. मात्र काँग्रेसच्या उमेदवारीचा तिढा थेट दिल्ली दरबारी गेला आहे. दिल्लीतही निर्णय व्हायला वेळ लागत असल्यामुळे कार्यकर्ते कुणाचा झेंडा हातात घ्यावा, या विवंचनेत आहे. १६ मार्च रोजी चंद्रपूर मतदार संघाबाबत पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील, अशी अपेक्षा दिल्लीत गेल्या सोमवारपासून तळ ठोकून असलेली काँग्रेसची मंडळी सांगत आहे. मात्र याबाबतही ते साशंक आहे. नामांकन अर्ज दाखल करण्याच्या दिनांकापर्यंतही उमेदवारीचा निर्णय लांबला जाऊ शकतो, असा संशयही ते वर्तवित आहे. त्यामुळे तुर्तास काँग्रेसकडून एकाही नावावर स्थानिक पक्ष नेतृत्व ठाम नसल्याचे चित्र आहे. २०१४ च्या निवडणुकीत आम आदमी पार्टी तिसऱ्या क्रमांकावर होती. आपच्या उमेदवाराने तब्बल २ लाख ४ हजार मतांपर्यंत मजल मारली होती. आता निवडणूक काही दिवसांवर असतानाही आम आदमी पार्टीची निवडणुकीसाठी तयारी दिसत नाही. ४९ हजार मते घेऊन बसपा चौथ्या क्रमांकावर होती. या निवडणुकीत बसपाकडून अद्यापही हालचाली होताना दिसत नाही. वास्तविक, काँग्रेसचा उमेदवार जाहीर होत नाही, तोपर्यंत अन्य राजकीय पक्षांच्या तंबूत शांतताच राहतील, असे बोलले जात आहे. काँग्रेस उमेदवार जनतेपुढे आल्यानंतरच या निवडणुकीला रंग चढतील, असेही बोलले जात आहे.