शहरं
Join us  
Trending Stories
1
‘एमपीएससी’ची तयारी करणाऱ्या एकुलत्या एक मुलाचा अपघाती मृत्यू; पुण्याच्या दिशेने जात होता...
2
‘लाडकी बहीण’मुळे निधी उशिरा, कामे होणार कशी? गुलाबी रंगात निवडून आलेल्या अजित पवार गटाच्या मंत्र्यांचाच तक्रारीचा सूर
3
६ दिवसांपासून बेपत्ता असलेल्या स्नेहाचा मृतदेह सापडला; आई-वडिलांचा टाहो, मैत्रिणीचा मोठा दावा
4
Good Luck Cafe: बन मस्क्यामध्ये काचेचे तुकडे; एफ. सी. रोडवरील गुडलक कॅफेचा परवाना तात्पुरता निलंबित
5
Accident: आंब्याने भरलेली लॉरी मिनी ट्रकवर उलटली; ९ जण ठार, अनेकजण जखमी!
6
गृहप्रवेशानंतर नववधू चक्कर येऊन पडली, पतीने थेट प्रेग्नन्सी टेस्ट किटच आणली! चिडलेल्या नवरीने काय केलं वाचाच... 
7
Pravin Gaikwad : 'माझ्या हत्येचा कट होता, याला पूर्णपणे सरकार जबाबदार'; प्रवीण गायकवाडांचा आरोप
8
स्मशानभूमीचे उद्घाटन न झाल्याने अंत्यविधीस परवानगी नाकारली; भरपावसात डिझेल ओतून पेटवली चिता
9
नवी मुंबई: बेलापूरमधील पारसिक टेकडीवर भूस्खलन; मातीच्या ढिगाऱ्यासह झाडे उन्मळून पडली
10
Anthem Biosciences IPO आजपासून गुंतवणुकीसाठी खुला; कधीपर्यंत आणि किती करावी लागेल गुंतवणूक, GMP किती?
11
मनसेचे २ दिवसीय शिबिर, ठाकरे बंधू युतीवर भूमिका ठरणार; राज ठाकरे काय देणार 'कानमंत्र'?
12
'ते गप्पा चांगल्या मारतात, पण रात्रीच्या अंधारात लोकांवर बॉम्ब टाकतात', ट्रम्प पुतीन यांच्यावर भडकले
13
अरे देवा! आई वारंवार भेंडीची भाजी बनवायची म्हणून लेक चिडला, १२०० किमी दूर पळून गेला अन्...
14
नोकरीसाठी डिग्री आणि सीव्हीची गरज नाही! थेट १ कोटी रुपयांचं पॅकेज, फक्त 'या' २ अटी पूर्ण करा
15
ऑपरेशन 'सिंदूर'नंतर 'ब्रह्मोस मिसाइल'ची मागणी वाढली, १४-१५ देश रांगा लावून उभे!
16
रशियाकडून क्रुड ऑईलची विक्रमी आयात; पेट्रोलियम मंत्री म्हणाले, "भारताचं ऊर्जा धोरण कोणत्याही दबावाखाली..."
17
"कलाकाराला ऐकून घ्यावंच लागतं, पण..." शरद उपाध्येंच्या आरोपांवर निलेश साबळेचं पुन्हा प्रत्युत्तर
18
ठाणे स्टेशनजवळ भीषण आग! स्कायवॉकजवळच्या आगीमुळे प्रवाशांमध्ये उडाला गोंधळ
19
साप्ताहिक राशीभविष्य: २ राजयोगांचा ९ राशींना दुपटीने लाभ, सुबत्ता-भरभराट; गुंतवणुकीत नफा!
20
गुडबाय ISS! पृथ्वीवर परतण्यापूर्वी शुभांशू शुक्ला यांचे फोटो आले समोर, आजपासून परतीचा प्रवास सुरू होणार

अवैध वाहतुकीवर आळा घाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:11 IST

वाहतुकीच्या कोंडीमुळे नागरिक त्रस्त चंद्रपूर : मनपा प्रशासनाने आझाद बागेजवळ पे पार्किंग सुरू केली असली तरी रघुवंशी ...

वाहतुकीच्या कोंडीमुळे नागरिक त्रस्त

चंद्रपूर : मनपा प्रशासनाने आझाद बागेजवळ पे पार्किंग सुरू केली असली तरी रघुवंशी कॉम्प्लेक्स ते हिंदी सिटी हायस्कूलपर्यंतच्या मार्गावर अवैधरीत्या चारचाकी वाहने पार्क केली जात आहेत. ही वाहने दिवसभर तिथेच राहत असल्याने या रस्त्यावर अनेकवेळा वाहतुकीची कोंडी होते. त्यामुळे येथे वाहतूक पोलिसांची नियुक्ती करण्याची मागणी केली जात आहे.

पुरस्कारप्राप्त गावातच स्वच्छतेचे तीनतेरा

सिंदेवाही : ग्रामीण भागातील हागणदारी बंद व्हावी, यासाठी शासनाने प्रोत्साहनपर अनुदान योजना सुरू केली. गावात शौचालयाची संख्या वाढली. परंतु, या शौचालयाचा वापर नगण्य आहे. त्यामुळे प्रशासनो जनजागृती करावी, तसेच उघड्यावर जाणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.

वटवाघूळांचे अस्तित्व आले धोक्यात

चंद्रपूर : अलीकडे वटवाघूळांची संख्या कमी होत आहे. त्यांचे अस्तित्व नाहीसे झाल्यास निसर्गाचे चक्र बंद पडेल. तसे होऊ नये म्हणून मानवी संघटना व शासन व्यवस्थेने प्रयत्न करणे गरजेचे आहे. परंतु याकडे दुर्लक्ष केले जात असल्याने पक्षी मित्र संघटनांकडून संताप व्यक्त केला जात आहे. सर्वांनी मिळून वटवाघूळांचे अस्तित्व टिकविणे गरजेचे आहे.

जनावरांच्या विक्रीकडे शेतकऱ्यांचा कल

चंद्रपूर: पूर्वी गावोगावी आढळणारे जनावरांचे कळप आता इतिहासजमा होत आहेत. सततच्या ओल्या आणि कोरड्या दुष्काळामुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत. त्यामुळे त्यांचे पालनपोषण करणे आता कठीण होत असल्यामुळे तसेच जनावरांच्या चारापाण्याची समस्या निर्माण होत असल्याने शेतकरी, शेतमजुरांनी जनावरे मिळेल त्या भावात विक्रीला काढली आहेत.

शासकीय योजनांचा खऱ्या लाभार्थ्यांना लाभ द्या

चंद्रपूर : शासनाने गोरगरिबांना विविध धान्य व योजनेचा लाभ मिळावा म्हणून बीपीएल यादी तयार केली. मात्र या यादीत गोरगरिबांऐवजी श्रीमंत, सधन कुटुबांचीच नावे समाविष्ट असल्याचा आरोप केला जात आहे. यात गरिबांची पिळवणूकच होत असून खऱ्या लाभार्थ्यांना शासकीय योजनांचा लाभ देण्यासाठी शासनाने उपाययोजना करण्याची गरज आहे.

पथदिवे बंद, सुरू करण्याची मागणी

सावली : तालुक्यातील अनेक गावांचे पथदिवे बंद असल्याने नागरिकांना अंधारातून मार्गक्रमण करावे लागत आहे. रात्री साप, विंचूसारखे सरपटणारे प्राणी रस्त्यावर येतात. अंधार असल्याने धोका निर्माण होऊ शकतो. चोरांचाही त्रास वाढला आहे. पथदिवे सुरू करून दिलासा द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

बेरोजगारांसाठी शिबिर राबवावे

चंद्रपूर : दिवसेंदिवस बेरोजगारी वाढत आहे. त्यामुळे आजची युवा पिढी ही नैराश्यात जगत आहे. अनेकांनी पैसे खर्च करून स्पर्धा परीक्षेचे वर्ग सुरू केले. मात्र कोरोना संकट तसचे शासनाकडून नोकर भरती बंदीमुळे दिवसेंदिवस बेरोजगारीच्या संख्येत वाढ होत आहे. शासन बेरोजगारासाठी मोठमोठ्या योजना राबविते. परंतु ढिसाळ नियोजनामुळे त्याचा फायदाही बेरोजगारांना होत नाही. त्यामुळे बेरोजगार युवकांसाठी योग्य मार्गदर्शन शिबिर राबविण्याची मागणी होत आहे.