शहरं
Join us  
Trending Stories
1
Operation Sindoor: कित्येक निष्पापांचा जीव घेतला! आता स्वतःच्या कुटुंबाचा खात्मा झाल्यावर दहशतवादी मसूद अजहर म्हणतो...
2
“दहशतवादी हल्ल्याला युद्ध हे उत्तर नाही, एअर स्ट्राइक करणे पर्याय असू शकत नाही”: राज ठाकरे
3
‘ऑपरेशन सिंदूर’ म्हणजे माझ्या आईसारख्या महिलांचा सन्मान; गणबोटे कुटुंबाने मानले मोदींचे आभार 
4
युद्धापूर्वीच पाकिस्तानचे आत्मसमर्पण, संरक्षण मंत्री म्हणाले- 'आम्ही कारवाई करणार नाही'
5
Operation Sindoor : अखेर न्याय झालाच! भारताने पहलगाम हल्ल्याचा घेतला बदला; कोणी दिलं 'ऑपरेशन सिंदूर' हे नाव?
6
Operation Sindoor : 'ऑपरेशन सिंदूर'नंतर काय काय घडलं? जगभरातून समर्थन...
7
'अभी पिक्चर बाकी है...', ऑपरेशन सिंदूरनंतर माजी लष्करप्रमुख मनोज नरवणे यांची सूचक पोस्ट!
8
पीएम किसानचा २०वा हप्ता कधी येणार? तुमचं नाव यादीत आहे का? मोबाईलवरुनही तपासू शकता
9
Operation Sindoor : 'ऑपरेशन सिंदूर'च नव्हे, भारताने आधीही पाकिस्तानविरुद्ध केलेल्या 'या' मोठ्या कारवाया!
10
'ऑपरेशन सिंदूर' हेच नाव का ठेवले गेले? काय आहे भारतीय संस्कृतीत सिंदूरचे महत्त्व? वाचा!
11
Operation Sindoor Live Updates: "यापुढेही भारतावर हल्ल्याची शक्यता, म्हणून उत्तर देणे गरजेचे होते"
12
Operation Sindoor: कुख्यात दहशतवादी मसूद अजहरच्या कुटुंबाचा खात्मा; १४ लोकांना यमसदनी धाडलं
13
आजोबा, वडील एक्स आर्मी, पतीही...! कोण आहेत 'ऑपरेशन सिंदूर'ची माहिती देणाऱ्या लेफ्टनंट कर्नल सोफिया कुरेशी
14
Operation Sindoor: नऊ ठिकाणं... ९० दहशतवाद्यांचा खात्मा; भारतीय लष्कराने दहशतवाद्यांचे कंबरडेच मोडले!
15
Operation Sindoor: २५ मिनिटांत ९ दहशतवादी तळ उद्ध्वस्त; कर्नल सोफिया कुरैशी यांनी सांगितला थरार
16
Operation Sindoor : पाकिस्तानमध्ये हल्ल्याच्या २३ मिनिटे आधीच लष्कराने ट्विट केले? समोर आली माहिती
17
‘ऑपरेशन सिंदूर’चे श्रेय तुम्ही घेऊ नका, ते फक्त भारतीय सेनेचेच; संजय राऊतांची सरकारवर टीका
18
'ऑपरेशन सिंदूर'चा परिणाम! 'या' डिफेन्स स्टॉक्सने घेतली मोठी झेप; ३ महिन्यात नफा दुप्पट
19
गृह मंत्रालय अलर्ट! निमलष्करी दलांच्या सुट्ट्या रद्द; 'ऑपरेशन सिंदूर'नंतर भारत-पाकमधील तणाव वाढला
20
पाकिस्तानी स्टॉक मार्केटचे काय हाल ऐकाल...; रात्री भारताची मिसाईल कोसळली, दिवसा भीतीने शेअर बाजार...

पटावरील बंदी उठविल्याने संस्कृतीला मिळणार उजाळा

By admin | Updated: January 11, 2016 01:04 IST

मंडई, नाटक आणि शंकरपट या तीन गोष्टींना झाडीपट्टीत अनन्य साधारण महत्त्व आहे. यापैकी शंकरपटावर लादण्यात आलेली ...

जुने वैभव पुन्हा येणार : झाडीपट्टीत उत्साहाला उधाणघनश्याम नवघडे नागभीडमंडई, नाटक आणि शंकरपट या तीन गोष्टींना झाडीपट्टीत अनन्य साधारण महत्त्व आहे. यापैकी शंकरपटावर लादण्यात आलेली बंदी केंद्र सरकारने नुकतीच उठविल्याने झाडीपट्टीत उत्साहाला उधान आले आहे. बंदी उठल्याने झाडीपट्टीचा हा उत्सव लवकरच सुरू होणार आहे.झाडीपट्टीत प्रामुख्याने चंद्रपूर, भंडारा, गडचिरोली आणि गोंदिया या चार जिल्ह्यांचा समावेश होतो. या चार जिल्ह्याचे प्रमुख आणि एकमेव पीक धान हेच आहे. या धान पीकाच्या हंगामाचा काळ जुलै ते डिसेंबर असा आहे. हा हंगाम झाल्यानंतर शेतकरी तसा मोकळाच असतो. या मोकळ्या वेळेत मनोरंजन म्हणून मंडई, नाटक आणि शंकरपटात तो आपला वेळ घालवण्यासाठी या प्रथा पडल्या असाव्यात, असे मत अनेकजण व्यक्त करीत असतात.साधारणत: दिवाळीपासून नाटक आणि मंडईची रेलचेल सुरू होत असली तरी शंकरपटांचा आरंभ मात्र मकरसंक्रांतीपासून सुरू होतो आणि तो जून, जुलैपर्यंत सुरू असतो. दोन-तीन दशकांपूर्वी शंकरपट प्रत्येक गावात भरवले जायचे. शंकरपट भरविण्यामागे या निमित्ताने नातलगांच्या भेटीगाठी आणि उपवर वधू-वरांची पाहणी हे सुद्धा कारण सांगितले जाते. पण आता काळ बदलला आणि याचबरोबर त्याच्या व्याख्याही बदलल्या. तशा शंकरपटावरही मर्यादा आल्या. शंकरपटाची ‘दान’ ही गावाजवळ वाहत असल्याने बदलत्या नागरिकरणात या दानीवर अतिक्रमणे झाली. काही गावातील दानी जंगल कायद्याच्या कचाट्यात सापडल्या तर मनोरंजनाची दालणे आता मोठ्या प्रमाणावर उपलब्ध झाल्याने काहीसे शंकरपटाकडे दुर्लक्ष सुद्धा केले.असे असले तरी शंकरपटाचे वेड काही कमी झाले नाही. याची प्रचिती नागभीड तालुक्यातील मसली, सावरगाव, गिरगाव, गोविंदपूर, वढोणा, सिंदेवाही तालुक्यातील देलनवाडी, रत्नापूर, शिवणी, ब्रह्मपुरी तालुक्यात हळदा, मुडझा, रान्होरी, दिघोरी, सावली तालुक्यातील मगरमेंढा या गावात अनेकांनी घेतली आहे. लोक अक्षरश: झपाटून जात असतात. मिळेल त्या वाहनाने आणि भेटेल त्या सवंगड्यासोबत जावून शंकरपटाचा आनंद घेत असत.न्यायालयाच्या एका निर्णयानुसार मागील दोन वर्ष शंकरपटावर बंदी लादण्यात आली होती. त्यावेळी पटप्रेमी आणि ज्या गावात पटाचे आयोजन होते, त्या परिसरात चांगलीच खळबळ निर्माण झाली होती. म्हणूनच या निर्णयाविरोधात अनेकांनी न्यायालयात याचिका दाखल केल्या होत्या. एवढेच नाही तर शंकरपट हे महाराष्ट्राचे मनोरंजन कसे आहे हे सुद्धा केंद्र शासनाला पटवून देण्यात आले. सर्व खात्री झाल्यानंतरच केंद्र शासनाने शंकरपटावर लादण्यात आलेली बंदी उठविली.केंद्र शासनाने शंकरपटावरील बंदी उठविल्यानंतर झाडीपट्टीत उत्साहाला उधान आले आहे. गेली दोन वर्ष शंकरपटावर बंदी असल्याने अनेकांनी आपले पटाचे बैल शेतीच्या कामात काढले होते. छकडे अडगळीत टाकले होते. पटाच्या दानीकडे दुर्लक्ष केले होते. या सर्वांना आता ‘अच्छे दिन’ येणार आहेत.