शहरं
Join us  
Trending Stories
1
९ जुलैला भारत बंद, २५ कोटी कामगार संपावर; शाळा, कॉलेज, बँका आणि बाजारासह काय-काय बंद राहणार? जाणून घ्या
2
तिरुपतीला गेलेल्या अहिल्यानगरच्या तिघांचा दुर्वैवी मृत्यू; कार उलटल्याने झाला भीषण अपघात
3
'भारतासह ब्रिक्स देशांना द्यावा लागणार अतिरिक्त १० टक्के कर"; व्यापार करारापूर्वी ट्रम्प यांचे विधान
4
"एक स्पष्ट आदेश... पक्षातील कोणीही..."; मराठीचा मुद्दा गाजत असतानाच राज ठाकरेंची फेसबूक पोस्ट
5
"रेल्वे कर्मचाऱ्याला तमीळ येत नव्हतं, म्हणून दुर्घटना घडली", आता तामिळनाडू रेल्वे-व्हॅन अपघातातही भाषेची एन्ट्री!
6
२ कोटींच्या विम्यासाठी मित्राला गाडीत जिवंत जाळलं; नऊ महिने सुरु होती प्लॅनिंग, पत्नीचाही सहभाग
7
भारताचे INS महेंद्रगिरी शत्रूला पाणी पाजायला तयार! चीन-पाकिस्तानची झोप उडणार, काय आहे यात खास? जाणून थक्क व्हाल!
8
ठाकरे बंधूंची युती होईल का, किती टिकेल? स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वतींची मोठी भविष्यवाणी
9
मराठी शाळा बंद, ५००० शिक्षकाचं आंदोलन, मुख्यमंत्र्यांनी त्याकडे लक्ष द्यावं- सुप्रिया सुळे
10
“ज्येष्ठ कलाकार मनमोहन माहिमकर यांना बेघर होऊ देणार नाही”; DCM एकनाथ शिंदेंनी दिली ग्वाही
11
महाराष्ट्रातील सीईटी कक्षाकडून घेण्यात येणाऱ्या प्रवेश नोंदणीला मुदतवाढ; विद्यार्थी हितासाठी निर्णय!
12
टॉप 10 अब्जाधिशांच्या यादीतून बिल गेट्स बाहेर, संपत्तीत मोठी घसरण
13
कोट्यवधी लोकांना खूशखबर, पीएफच्या खात्यात जमा झाले व्याजाचे पैसे, असा तपासा बॅलन्स
14
१४ वर्षांच्या पोराचा आणखी एक पराक्रम! आता वैभव सूर्यंवशीनं मोडला शुबमन गिलचा विक्रम
15
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
16
येमेनमध्ये भारतीय नर्स निमिषा प्रियाला फाशीची शिक्षा; न्यायालयाने तारीख ठरवली
17
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
18
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
19
भारतीय क्रिकेटर स्मृती मन्धानाला इंग्लंडमध्ये मिळाला 'लाल गुलाब'; फोटो व्हायरल, रंगली चर्चा
20
गोपाल खेमका हत्याकांडात मोठा गौप्यस्फोट, एका व्यावसायिकानेच दिली होती सुपारी, समोर आलं असं कारण

पटावरील बंदी उठविल्याने संस्कृतीला मिळणार उजाळा

By admin | Updated: January 11, 2016 01:04 IST

मंडई, नाटक आणि शंकरपट या तीन गोष्टींना झाडीपट्टीत अनन्य साधारण महत्त्व आहे. यापैकी शंकरपटावर लादण्यात आलेली ...

जुने वैभव पुन्हा येणार : झाडीपट्टीत उत्साहाला उधाणघनश्याम नवघडे नागभीडमंडई, नाटक आणि शंकरपट या तीन गोष्टींना झाडीपट्टीत अनन्य साधारण महत्त्व आहे. यापैकी शंकरपटावर लादण्यात आलेली बंदी केंद्र सरकारने नुकतीच उठविल्याने झाडीपट्टीत उत्साहाला उधान आले आहे. बंदी उठल्याने झाडीपट्टीचा हा उत्सव लवकरच सुरू होणार आहे.झाडीपट्टीत प्रामुख्याने चंद्रपूर, भंडारा, गडचिरोली आणि गोंदिया या चार जिल्ह्यांचा समावेश होतो. या चार जिल्ह्याचे प्रमुख आणि एकमेव पीक धान हेच आहे. या धान पीकाच्या हंगामाचा काळ जुलै ते डिसेंबर असा आहे. हा हंगाम झाल्यानंतर शेतकरी तसा मोकळाच असतो. या मोकळ्या वेळेत मनोरंजन म्हणून मंडई, नाटक आणि शंकरपटात तो आपला वेळ घालवण्यासाठी या प्रथा पडल्या असाव्यात, असे मत अनेकजण व्यक्त करीत असतात.साधारणत: दिवाळीपासून नाटक आणि मंडईची रेलचेल सुरू होत असली तरी शंकरपटांचा आरंभ मात्र मकरसंक्रांतीपासून सुरू होतो आणि तो जून, जुलैपर्यंत सुरू असतो. दोन-तीन दशकांपूर्वी शंकरपट प्रत्येक गावात भरवले जायचे. शंकरपट भरविण्यामागे या निमित्ताने नातलगांच्या भेटीगाठी आणि उपवर वधू-वरांची पाहणी हे सुद्धा कारण सांगितले जाते. पण आता काळ बदलला आणि याचबरोबर त्याच्या व्याख्याही बदलल्या. तशा शंकरपटावरही मर्यादा आल्या. शंकरपटाची ‘दान’ ही गावाजवळ वाहत असल्याने बदलत्या नागरिकरणात या दानीवर अतिक्रमणे झाली. काही गावातील दानी जंगल कायद्याच्या कचाट्यात सापडल्या तर मनोरंजनाची दालणे आता मोठ्या प्रमाणावर उपलब्ध झाल्याने काहीसे शंकरपटाकडे दुर्लक्ष सुद्धा केले.असे असले तरी शंकरपटाचे वेड काही कमी झाले नाही. याची प्रचिती नागभीड तालुक्यातील मसली, सावरगाव, गिरगाव, गोविंदपूर, वढोणा, सिंदेवाही तालुक्यातील देलनवाडी, रत्नापूर, शिवणी, ब्रह्मपुरी तालुक्यात हळदा, मुडझा, रान्होरी, दिघोरी, सावली तालुक्यातील मगरमेंढा या गावात अनेकांनी घेतली आहे. लोक अक्षरश: झपाटून जात असतात. मिळेल त्या वाहनाने आणि भेटेल त्या सवंगड्यासोबत जावून शंकरपटाचा आनंद घेत असत.न्यायालयाच्या एका निर्णयानुसार मागील दोन वर्ष शंकरपटावर बंदी लादण्यात आली होती. त्यावेळी पटप्रेमी आणि ज्या गावात पटाचे आयोजन होते, त्या परिसरात चांगलीच खळबळ निर्माण झाली होती. म्हणूनच या निर्णयाविरोधात अनेकांनी न्यायालयात याचिका दाखल केल्या होत्या. एवढेच नाही तर शंकरपट हे महाराष्ट्राचे मनोरंजन कसे आहे हे सुद्धा केंद्र शासनाला पटवून देण्यात आले. सर्व खात्री झाल्यानंतरच केंद्र शासनाने शंकरपटावर लादण्यात आलेली बंदी उठविली.केंद्र शासनाने शंकरपटावरील बंदी उठविल्यानंतर झाडीपट्टीत उत्साहाला उधान आले आहे. गेली दोन वर्ष शंकरपटावर बंदी असल्याने अनेकांनी आपले पटाचे बैल शेतीच्या कामात काढले होते. छकडे अडगळीत टाकले होते. पटाच्या दानीकडे दुर्लक्ष केले होते. या सर्वांना आता ‘अच्छे दिन’ येणार आहेत.