शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
2
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
4
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
5
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
6
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
7
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
8
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
9
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
10
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
11
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
12
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
13
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
14
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
15
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
16
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
17
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
18
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
19
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
20
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...

उन्हाच्या दाहकतेने पिके करपली

By admin | Updated: August 26, 2014 23:21 IST

पावसाळ्याच्या सुरुवातीपासूनच पावसाने दडी मारली. अधामधात कोसळलेल्या सरींवर पेरणी आटोपली. अंकुर जमिनीबाहेर आले. मात्र पावसाचा पत्ता नाही. आता तर उन्हाळ्यासारखे उन्ह तळपत असून

चंद्रपूर : पावसाळ्याच्या सुरुवातीपासूनच पावसाने दडी मारली. अधामधात कोसळलेल्या सरींवर पेरणी आटोपली. अंकुर जमिनीबाहेर आले. मात्र पावसाचा पत्ता नाही. आता तर उन्हाळ्यासारखे उन्ह तळपत असून शेतातील पीके करपू लागली आहे. सोमवारी जिल्ह्यातील काही गावांत पावसाने हजेरी लावली. मात्र ती शेतकऱ्यांसाठी समाधानकारक नाही.जिल्ह्यात असलेली परिस्थिती सर्व जिल्हाभर दिसत आहे. शेतकऱ्यांच्या संयमाचा बांध आता फुटला आहे. पाण्याअभावी कपरणारी पिके पाहून शेतकऱ्यांना अश्रु आवरणे कठीण झाले आहे. दुबार, तिबार पेरणीत शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले. पावसाची आस लावून बसलेल्या शेतकऱ्यांना दिलासाच मिळाला नाही. दररोज उन्हाळ्यासारखे उन्ह पडत आहे. नदी- नाले कोरडे असून सिंचनाची सोय असलेले शेतकरी भारनियमनाने हतबल झाले आहे. अशा स्थितीत उडीद, मुंगाची पेरणीही झाली नाही. साधातरण: पोळ्याच्या हंगामात उडीद- मुंगाचे पीक हाती येते. त्यावर पोळा साजरा केला जातो. परंतु यंदा त्याचीही सोय नाही. दुष्काळाचे स्पष्ट सावट ग्रामीण भागात दिसत आहे. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर पावसाची काळजी आहे. पाण्याअभावी करपणारे पीक पाहून शेतकऱ्याचा जीवाची घालमेल होत आहे.यासोबतच पाऊस न आल्याने वैराणाचा प्रश्न गंभीर झाला आहे. पोळ्याच्या महिन्यात सर्वत्र हिरवा चारा उपलब्ध असतो. परंतु यंदा तीही स्थिती नाही. जनावरांना काय खाऊ घालायचे असा प्रश्न उभा ठाकला आहे. अनेकांनी तर नाईलाजाने आपली जनावरे विक्रीस काढली आहे. शासनाने तालुक्याला टंचाईग्रस्त घोषित केले असले तरी त्याचा लाभ मात्र कितपत मिळतो हे महत्त्वाच आहे.यावर्षी जिल्ह्यातील शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती बिकट आहे. मागील वर्षी अतिपावसामुळे पिकांची नासाडी झाली तर यावर्षी पाऊसच आला नसल्याने हातात पीक येण्याची चिन्ह नाही. त्यामुळे शासनाने आर्थिक मदत देणे गरजेचे आहे. (नगर प्रतिनिधी)