शहरं
Join us  
Trending Stories
1
“देशातील Gen Z, विद्यार्थी, युवक संविधान-लोकशाही वाचवतील, मी सदैव पाठीशी राहीन”: राहुल गांधी
2
७५ वर्षांचे झाले, PM मोदींनी निवृत्ती घ्यावी का? शरद पवार म्हणाले, “त्यांनी थांबावे हे...”
3
पालघर-डहाणूत ठाकरे गटाला खिंडार; सरपंच-उपसरपंच-पदाधिकारी शिवसेनेत, एकनाथ शिंदे म्हणाले...
4
'हैदराबाद गॅझेटिअरच्या नावाखाली सरकारने फसवणूक केली'; मराठा गोलमेज परिषदेत आरोप
5
अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे विमान न्यू यॉर्कमध्ये अपघातातून थोडक्यात बचावले...
6
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
7
मर्सिडीज-हुरुनचा अहवाल आला! भारतात करोडपतींच्या संख्येत ९० टक्क्यांनी वाढ..., महाराष्ट्र टॉपर, प्रचंडच...
8
मारुती अल्टोपेक्षा ही कार स्वस्त झाली; जीएसटीने कमालच केली, मारुतीचे जगच इकडचे तिकडे केले...
9
तज्ज्ञांचा इशारा...! ‘या’ बँकेचा स्टॉक 17 रुपयांपर्यंत कोसळणार, गुंतवणूकदारांचे टेन्शन वाढले; SBI सह अनेक दिग्गजांनी शेअर विकले
10
मतचोरीचा राहुल गांधींचा आरोप, एकनाथ शिंदेंचे खुले आव्हान; म्हणाले, “ठोस पुरावे द्या अन्...”
11
शेतकऱ्यांना या संकटातून बाहेर काढा ! सातबारा कोरा करण्यासाठी कर्जमुक्ती करा
12
Nanded: शांतता बैठकीतच मराठा-ओबीसी वादाला हिंसक वळण, रिसनगावात ४ जखमी
13
हैदराबाद गॅझेटवर हायकोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्यांना सुनावले, आता मराठा आरक्षणाचे काय?
14
डोनाल्ड ट्रम्प यांची माघार! लवकरच भारतावरील शुल्क हटवणार; कुणी केला दावा? पाहा...
15
“GST सुधारणा हा राहुल गांधींच्या दूरदृष्टीचा विजय, २२ तारखेला राज्यभर पेढे वाटणार”: काँग्रेस
16
Sairat: 'सैराट' सिनेमात रिंकू राजगुरुच्या आईवडिलांचीही दिसलेली झलक, कोणता आहे तो सीन?
17
यंदाच्या गणेशोत्सवात तब्बल ६ लाख कोकणवासीयांचा STने सुखरुप प्रवास; २३ कोटींचे उत्पन्न
18
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”
19
'खोटारडं' पाकिस्तान पुन्हा उघडं पडलं... मॅच रेफरीच्या केबिनमध्ये काय घडलं? सत्य समोर आलं...
20
Kangana Ranaut : "माझ्याच हॉटेलचा काल ५० रुपयांचा धंदा", पूरग्रस्तांसमोर कंगना राणौतने मांडली स्वत:चाची व्यथा

उन्हाच्या दाहकतेने पिके करपली

By admin | Updated: August 26, 2014 23:21 IST

पावसाळ्याच्या सुरुवातीपासूनच पावसाने दडी मारली. अधामधात कोसळलेल्या सरींवर पेरणी आटोपली. अंकुर जमिनीबाहेर आले. मात्र पावसाचा पत्ता नाही. आता तर उन्हाळ्यासारखे उन्ह तळपत असून

चंद्रपूर : पावसाळ्याच्या सुरुवातीपासूनच पावसाने दडी मारली. अधामधात कोसळलेल्या सरींवर पेरणी आटोपली. अंकुर जमिनीबाहेर आले. मात्र पावसाचा पत्ता नाही. आता तर उन्हाळ्यासारखे उन्ह तळपत असून शेतातील पीके करपू लागली आहे. सोमवारी जिल्ह्यातील काही गावांत पावसाने हजेरी लावली. मात्र ती शेतकऱ्यांसाठी समाधानकारक नाही.जिल्ह्यात असलेली परिस्थिती सर्व जिल्हाभर दिसत आहे. शेतकऱ्यांच्या संयमाचा बांध आता फुटला आहे. पाण्याअभावी कपरणारी पिके पाहून शेतकऱ्यांना अश्रु आवरणे कठीण झाले आहे. दुबार, तिबार पेरणीत शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले. पावसाची आस लावून बसलेल्या शेतकऱ्यांना दिलासाच मिळाला नाही. दररोज उन्हाळ्यासारखे उन्ह पडत आहे. नदी- नाले कोरडे असून सिंचनाची सोय असलेले शेतकरी भारनियमनाने हतबल झाले आहे. अशा स्थितीत उडीद, मुंगाची पेरणीही झाली नाही. साधातरण: पोळ्याच्या हंगामात उडीद- मुंगाचे पीक हाती येते. त्यावर पोळा साजरा केला जातो. परंतु यंदा त्याचीही सोय नाही. दुष्काळाचे स्पष्ट सावट ग्रामीण भागात दिसत आहे. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर पावसाची काळजी आहे. पाण्याअभावी करपणारे पीक पाहून शेतकऱ्याचा जीवाची घालमेल होत आहे.यासोबतच पाऊस न आल्याने वैराणाचा प्रश्न गंभीर झाला आहे. पोळ्याच्या महिन्यात सर्वत्र हिरवा चारा उपलब्ध असतो. परंतु यंदा तीही स्थिती नाही. जनावरांना काय खाऊ घालायचे असा प्रश्न उभा ठाकला आहे. अनेकांनी तर नाईलाजाने आपली जनावरे विक्रीस काढली आहे. शासनाने तालुक्याला टंचाईग्रस्त घोषित केले असले तरी त्याचा लाभ मात्र कितपत मिळतो हे महत्त्वाच आहे.यावर्षी जिल्ह्यातील शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती बिकट आहे. मागील वर्षी अतिपावसामुळे पिकांची नासाडी झाली तर यावर्षी पाऊसच आला नसल्याने हातात पीक येण्याची चिन्ह नाही. त्यामुळे शासनाने आर्थिक मदत देणे गरजेचे आहे. (नगर प्रतिनिधी)