शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

भद्रावतीत माणुसकीच्या भिंतीसाठी अलोट गर्दी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2017 00:45 IST

जाती-पाती व धर्माची वर्गवारी करणाऱ्या सगळ्याच भिंती जमिनदोस्त करणारी भिंत म्हणजे माणूसकीची भिंत.

लोकमत न्यूज नेटवर्कभद्रावती : जाती-पाती व धर्माची वर्गवारी करणाऱ्या सगळ्याच भिंती जमिनदोस्त करणारी भिंत म्हणजे माणूसकीची भिंत. राजस्थानच्या बिलवारा शहरातून सुरु झालेला ‘माणूसकीची भिंत’ हा उपक्रम भद्रावतीत पोहचला. अन् या उपक्रमाला उदंड प्रतिसाद मिळाला. देणाऱ्या आणि घेणाऱ्यांची या भिंतीजवळ अलोट गर्दी उसळली. रोटरी क्लब, इनर्व्हील क्लब, भद्रावती व विवेकानंद महाविद्यालय भद्रावती यांच्या वतीने ही माणूसकीची भिंत साकारण्यात आली.नको असेल ते द्या- हवे असेल ते घेवून जा, असे आवाहन करणारी ही भिंत आज सर्वत्र सामाजिक दायित्वाची सर्वांना जाणीव करून देत आहे. एकीकडे माणसांच्या ऋणानुबंधात, एकमेकांच्या नातेसंबंधात अनावश्यक गोष्टीच्या भिंती निर्माण होत आहे. तर दुसरीकडे ही भिंत माणसांना एकमेकांशी जोडत आहे. विवेकानंद महाविद्यालय भद्रावती येथे आयोजित या उपक्रमात दात्यांच्या मदतीने जुने व नवीन कपडे तसेच जीवनोपयोगी साहित्य प्राप्त करुन ते समाजातील गरीब, गरजू व वंचितांना मोफत उपलब्ध करुन देण्यात आले. जवळपास तीन ते चार हजार गरजू व वंचितांना सदर साहित्य वितरित करण्यात आले. नव्हे तर ते त्यांनी हक्कानीच घेतले. माणूसकीच्या भिंतीने त्यांना हा हक्क प्रदान केला होता. यावेळी त्यांच्या चेहऱ्यावर दिसणारे समाधान हेच या उपक्रमाचे फलित ठरले.२५ बॉय १५ फूट एवढी भिंत विवेकानंद महाविद्यालयात साकारण्यात आली आहे. मागील तीन महिन्यांपासून रोटरी क्लब, इनरव्हील क्लब, भद्रावती व विवेकानंद महाविद्यालयातर्फे जुने कपडे गोळा करण्याचे काम सुरु आहे. चार ते पाच हजार जुने कपडे या कालावधीत गोळा करण्यात आले. त्यात साड्या, शर्ट, पँट, लहान मुला-मुलींचे कपडे, ब्लँकेट, स्वेटर, छत्र्या, बांगड्या व अन्य संसारोपयोगी वस्तूूंचा समावेश होता. यासोबतच आयोजकांतर्फे ७५ हजार रुपयांचे नवीन साहित्य घेवून ते वाटप करण्यात आले. हा उपक्रम समोरही राबविल्या जाणार असून भिंतीला कपडे अटकवून ठेवण्यात येणार आहे. ज्यांना हवे असेल ते कपडे ते घेऊन जाऊ शकतात. सोबतच दात्यांनी जुने कपडे आणून द्यावे, असे आवाहनही आयोजकांतर्फे करण्यात आले आहे. माणूसकीच्या भिंतीचा विस्तार संपूर्ण महाराष्ट्रभर व्हावा. चंद्रपूर जिल्ह्यात लगेच माणूसकीच्या भिंती निर्माण करु,असे या भिंतीच्या पहिल्या उदघाटनप्रसंगी वित्त, नियोजन तथा वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केलेले आवाहन याप्रसंगी महत्वाचे ठरते. या उपक्रमाचे जिल्ह्यात सर्वत्र अनुकरण व्हावे. निश्चितच ती गरज आहे.