शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
3
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
4
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
5
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
6
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
7
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
8
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
9
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
10
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
11
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
12
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
13
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
14
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
15
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
16
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
17
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
18
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
19
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
Daily Top 2Weekly Top 5

बल्लारपूर तालुक्यात १५ कोटींचे पीक कर्ज वाटप

By admin | Updated: June 20, 2016 00:34 IST

शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी बी-बियाणे, खते व शेती उपयोगी साहित्याची जुळवाजुळव करण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागते.

दिलासा : दोन हजारावर शेतकऱ्यांना दिला लाभबल्लारपूर : शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी बी-बियाणे, खते व शेती उपयोगी साहित्याची जुळवाजुळव करण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागते. आर्थिक विवंचना दूर करण्यासाठी खासगी सावकाराचा उंबरठा गाठावा लागतो. यातून शेतकऱ्यांना मुक्त करण्याच्या अनुषंगाने तहसील प्रशासनाने पुढाकार घेत बल्लारपूर तालुक्यातील दोन हजार १९० शेतकऱ्यांना विविध बँकेमार्फत कर्ज प्रकरणे मंजूर केली. तब्बल १५ कोटी ४३ लाख १० हजार ७३२ रुपयांचे पिक कर्जाचे वाटप केल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.येथील उपविभागीय कार्यालय तथा तहसील कार्यालयाच्या वतीने शनिवारी स्थानिक सभागृहात शेतकऱ्यांना पिक कर्ज वाटप मेळावा घेण्यात आला. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपविभागीय अधिकारी कल्पना निळ होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून तहसीलदार विकास अहीर, संवर्ग विकास अधिकारी भुजंगराव गजभे, सहायक दुय्यम निबंधक सुनील नवघरे, नायब तहसीलदार एन.एम. काळे, पी.डी. वंजारी, सत्यभामा भाले यांची उपस्थिती होती.यावेळी कल्पना निळ म्हणाल्या, मागील दोन वर्षापासून पर्जन्यमान सरासरीच्या तुलनेत कमी झाले. यामुळे शेती उत्पादनावर परिणाम झाला आहे. शेतकऱ्यांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागला. शासनाने शेतकऱ्यांच्या हितासाठी उपाय योजना करून विविध योजना कार्यान्वित केल्या आहेत. खरीप हंगामात शेतकऱ्यांना आर्थिक समस्येला सामोरे जावे लागू नये म्हणून राष्ट्रीयकृत बँकेमार्फत पिक कर्ज उपलब्ध करून दिले आहे. यात सेवा सहकारी संस्थेचाही हातभार लागला आहे. मध्यवर्ती सहकारी बँकेचा यात मोठा वाटा असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. तहसीलदार विकास अहीर, बी.बी. गजभे यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. संचालन अजय मेकलवार यांनी तर आभार नायब तहसीलदार काळे यांनी मानले. यावेळी मंडळ अधिकारी बोरीकर, तलाठी महादेव कन्नाके, चव्हाण यांच्यासह बँकेचे व्यवस्थापक व शेतकऱ्यांची उपस्थिती होती. (शहर प्रतिनिधी)२२६ शेतकऱ्यांना ६२ लाखांची कर्जमंजुरीनागभीड : शेतकऱ्यांना सहजरीत्या कर्ज उपलब्ध व्हावे, या हेतूने आयोजित करण्यात आलेल्या पीक कर्ज शेतकरी मेळाव्यात २२६ शेतकऱ्यांना ६२ लाख २५ हजार रुपयांचे पीक कर्ज मंजूर करण्यात आले. जिल्हाधिकारी चंद्रपूर यांच्या आदेशानुसार येथील तहसील कार्यालयात या पीक कर्ज मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. तहसीलदार समीर माने, नायब तहसीलदार पी.आर. गावंडे, ए.बी. धकीते, सहा. निबंधक वुईके यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी तहसीलदार समीर माने यांनी उपस्थितांना संबोधित केले व या मेळाव्याच्या आयोजनामागील भूमिका विषद केली. कोणीही शेतकरी पीक कर्जापासून वंचित राहू नये हे शासनाचे धोरण असल्याचे त्यांनी आपल्या मार्गदर्शनात सांगितले. यावेळी नागभीड तालुक्यातील एकूण २२६ शेतकऱ्यांना पीक कर्ज मंजुरीचे प्रमाणपत्र देण्यात आले. या पीक कर्ज शेतकरी मेळाव्यात शेतकरी, बँकांचे व्यवस्थापक प्रामुख्याने उपस्थित होते.