शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
5
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
6
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
7
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
8
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
9
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
10
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
11
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
12
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
13
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
14
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
15
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
16
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
17
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
18
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
19
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
20
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले

बोंडअळीच्या नियंत्रणासाठी ‘क्रॉपसॅप’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2018 23:15 IST

जिल्ह्यातील कापूस पिकावर बोंळअळीचा प्रादुर्भाव होण्याची लक्षणे दिसू लागली. कोरपना राजुरा व जिवती तालुक्यात काही गावांमध्ये बोंडअळीने नुकसानीची पातळी ओलांडली आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंता व्यक्त होत असताना जिल्हास्तरीय समिती गठित करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.

ठळक मुद्देजिल्हा समिती गठित : दर दोन आठवड्याने घेणार आढावा

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जिल्ह्यातील कापूस पिकावर बोंळअळीचा प्रादुर्भाव होण्याची लक्षणे दिसू लागली. कोरपना राजुरा व जिवती तालुक्यात काही गावांमध्ये बोंडअळीने नुकसानीची पातळी ओलांडली आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंता व्यक्त होत असताना जिल्हास्तरीय समिती गठित करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. या समितीमार्फत क्रॉपसॅप योजनेला गती देवून कापूस पिकावरील बोंडअळीचे नियंत्रण केले जाणार आहे. ही समिती दर दोन आठवड्यात आढावा घेणार आहेत.मागील वर्षी बोंडअळीने हजारो हेक्टरवरील कापूस पीक नष्ट केले. त्यामुळे शेतकºयांना आर्थिक फटका बसला. शेकडो शेतकºयांना लागवडीचा खर्चही मिळाला नाही. बºयाच शेतकºयांनी कर्ज काढून शेती केली होती.परंतु, पीक हाती न आल्याने कर्ज कसे भरावे, हा प्रश्न त्याच्यापुढे निर्माण झाला होता. सोयाबीन पिकाचेही प्रचंड नुकसान झाले. जिल्ह्यामध्ये यंदाच्या खरीप हंगामात लागवडीचे क्षेत्र वाढले आहे. बहुतांश शेतकºयांनी बीटी बियाण्यांची लागवड केली. या वाणांच्या प्रसारानंतर सुरूवातीच्या काही वर्षात चांगले उत्पादन झाले होते.मात्र बीटी कपाशीवर गुलाबी बोंडअळीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला. यामुळे शेतकºयांचे मोठे नुकसान झाले होते. यंदाच्या हंगामातही हीच स्थिती निर्माण होण्याची शक्यता असल्याने जिल्हा प्रशासनाने समिती गठित करण्याचा निर्णय घेतला.ही समिती जिल्ह्यातील तालुकानिहाय दौरे करून कापसाची सद्यस्थिती जाणून घेणार आहे. त्यानंतर त्याचा अहवाल विभागीय कृषी सहसंचालक तसेच राज्याच्या कृषी आयुक्तांना सादर करणार आहेत.समितीमध्ये बारा जणांचा समावेशबोंडअळीच्या नियंत्रणासाठी जिल्हास्तरीय समितीमध्ये १२ अधिकाºयांचा समावेश आहे. जिल्हाधिकारी कुणाल खेमणार हे अध्यक्ष असून यामध्ये सदस्य सचिव म्हणून जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी डॉ. उदय पाटील जबाबदारी सांभाळतील. समितीमध्ये निमंत्रित सदस्य म्हणून जिल्हा उपनिबंधक, कृषी विज्ञान केंद्राचे समन्वयक, कृषी विद्यापीठाचे जिल्हा प्रतिनिधी, केंद्रीय कृषी संशोधन संस्थेचे तज्ज्ञ, जिल्हा कृषी विकास अधिकारी, महाराष्ट कृषी उद्योग महामंडळाचे प्रतिनिधी, जिनींग मिल्सचे प्रमुख, बियाणे उत्पादक विक्री संघटनेचा व किटकनाशक उत्पादक विक्री संघटनेचा प्रतिनिधी सहभागी आहेत.समितीची कार्यपद्धतीही समिती कापूस उत्पादक तालुक्याचा परिस्थितीनुसार दर १५ दिवसांत आढावा घेणार आहे. यामध्ये पीक परिस्थिती क्रॉपसॅप योजना, कीडरोग प्रादुर्भावाची सद्यस्थितीवर उपाययोजना आणि स्थानिक शेतकºयांच्या सहकार्याने जनजागृती उपक्रम राबविण्यात येणार आहे. बोंडअळीचा प्रादुर्भाव झालेल्या शेतकºयांची संपूर्र्ण माहिती संकलीत करून लगेच उपाययोजना करणार आहेत.