शहरं
Join us  
Trending Stories
1
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
2
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
3
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
4
“राज ठाकरेंच्या मविआतील सहभागावर अद्याप चर्चा नाही”; रमेश चेन्नीथला यांनी केले स्पष्ट
5
पोलीस अधिकाऱ्यानं चोरला ट्रेनमध्ये झोपलेल्या प्रवाशाचा मोबाईल, जवळ उभे असलेले फक्त बघतच राहिले; VIDEO व्हायरल
6
योगी सरकारमधील महिला मंत्र्यांच्या ताफ्याला मोठा अपघात, झाल्या गंभीर जखमी  
7
विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद रिक्त, विरोधकांची सरकारवर टीका; विधिमंडळात पायऱ्यांवर आंदोलन
8
बाबर आझम, मोहम्मद रिझवानचं T20 करियर संपलं? नव्या पाकिस्तानी कोचने संघातून काढलं बाहेर
9
अंधश्रद्धेचा कळस! ११ वर्षे मूल नाही, मांत्रिकाची महिलेला मारहाण; पाजलं घाणेरडं पाणी, झाला मृत्यू
10
नाशिकच्या सिडकोत भर रस्त्यात वृद्धाचा खुन; दहा दिवसांत दुसरी घटना 
11
Sonu Sood : बैल पाठवतो म्हटला होता, मदत केली का? नेटकऱ्याच्या प्रश्नावर सोनू सूदनं बँक स्टेटमेंट केलं शेअर
12
अहमदाबाद विमान अपघात, एअर इंडियाचा संसदीय समितीसमोर जबाब, ड्रिमलायनरबाबत दिली अशी माहिती
13
'पंचायत'च्या प्रधानजींचे होते विवाहबाह्य संबंध, 'या' अभिनेत्याच्या पत्नीसोबत चाललं अफेअर
14
'मुख्यमंत्री फडणवीस सुद्धा वैतागले'; प्रताप सरनाईकांनी सांगितलं 'मराठी मोर्चा'चा मुद्दा का चिघळला?
15
“हिंदी सक्तीच्या मुद्द्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका दुटप्पी”: हर्षवर्धन सपकाळ
16
भाजप आमदाराच्या मुलाच्या गाडीची दुचाकीला धडक; रुग्णालयात नेईपर्यंत तरुणाने सोडले प्राण
17
"जनसुरक्षा कायदा हा हुकूमशाहीचा परमोच्च बिंदू, फडणविसांचे हुकूमशाही मनसुबे हाणून पाडा", जनसुरक्षा कायद्याला काँग्रेसचा विरोध
18
MS धोनीच्या मार्गात आला अडथळा! Captain Cool Trademark अर्जावर आक्षेप, कारण...
19
म्हणे, यांना इंग्रजी येत नाही, त्यांच्या देशात परत पाठवा; ब्रिटिश महिलेची भारतीय कर्मचाऱ्यांवर आगपाखड
20
ट्रम्प टॅरिफचा बाजारावर परिणाम नाही? कोटक महिंद्रात सर्वाधिक वाढ, तर घसरणाऱ्यांमध्ये टाटाचा शेअर

खरिपात तूर, कापसाचे क्षेत्र वाढणार

By admin | Updated: May 21, 2016 01:05 IST

तूर, कापूस व सोयाबीन हे पीक रोखीचे समजले जातात. त्यामुळे शेतकरी मागील कित्येक वर्षापासून ही तीन पिके मोठ्या प्रमाणात घेत आहेत.

सोयाबीन क्षेत्र घटणार : वरोरा तालुका कृषी विभागाचा आराखडावरोरा : तूर, कापूस व सोयाबीन हे पीक रोखीचे समजले जातात. त्यामुळे शेतकरी मागील कित्येक वर्षापासून ही तीन पिके मोठ्या प्रमाणात घेत आहेत. परंतु यावर्षी खरीप हंगामात वरोरा तालुक्यात सोयाबीन पिकाचे क्षेत्र घटणार असून तूर व कापसाच्या पेऱ्यात मोठी वाढ होणार असल्याचा अंदाज कृषी विभागाने वर्तविला आहे. मागील काही वर्षांपासून शेतकरी सोयाबीनचे पीक मोठ्या प्रमाणात घेत आहेत. सोयाबीन पीक कमी खर्चाचे व अल्पावधीत उत्पादन देणारे पीक असल्याने शेतकरी या पिकाला प्राधान्य देत होते. सोयाबिन निघाल्यानंतर इतरही पीक या शेतात घेत होते. परंतु मागील काही वर्षात सोयाबीन पिकाने शेतकऱ्यांना धोका देणे सुरु केल्याने या हंगामात शेतकरी सोयाबीन पीक घेण्यास फारसे उत्सुक नसल्याचे दिसून येत आहे. वरोरा तालुक्यात खरीप हंगामात ६४ हजार ५०० हेक्टर मध्ये शेतकरी पिकाची लागवड करीत असतात. यात भात ३० हजार हेक्टर, सोयाबिन १२ हजार ५०० हेक्टर, कापूस ३९ हजार ५०० हेक्टर, तूर ९ हजार ५०० हेक्टर इतर पिके ७५० हेक्टर मध्ये घेतली जाते. या हंगामात कापूसाचे क्षेत्र २५०० हेक्टरने वाढला आहे तर सोयाबीनचा पेरा २५०० हेक्टरनी कमी तर तूर पिकाचा पेरा एक हजार हेक्टरने वाढ होणार आहे. यावर्षी भाताला ७५० क्विंटल, सोयाबीनला ९ हजार ३७५ क्विंटल, कापूस बियाणे २ लाख ६६ हजार पाकिटे, तूर २५० क्विंटल बियाणे लागणार आहे. खरीप हंगामात युरिया ५ हजार ५०० मेट्रिक टन, डीएपी २४०० मेट्रिक टन, एमओपी ६०० मेट्रीक टन, फॉस्फेट २००० मेट्रिक टन, १५.१५.१५ ४५० मेट्रिक टन खते लागणार आहेत. (तालुका प्रतिनिधी)खते घेताना सावधान !मागील काही वर्षापासून गावागावांमध्ये जाऊन काही कंपन्या खताची विक्री करीत आहेत. सेंद्रिय खताच्या नावाखाली खताची विक्री केली जात आहे. त्यामध्ये गुणवत्तेचे प्रमाण कमी असल्याने शेतकऱ्यांची अनेकदा फसगत झाली. विक्री करणाऱ्या कंपन्या अ‍ॅक्टमध्ये बसत नसल्याने तक्रार होऊनही कार्यवाही करता येत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी सावधानता बाळगावी.