शहरं
Join us  
Trending Stories
1
"प्रत्येक भारतीय संतापलाय..."; पंतप्रधान मोदी यांचा CJI गवईंना फोन, हल्ल्याचा केला निषेध
2
अभिनेता विजय देवरकोंडा याच्या कारला अपघात, दुसऱ्या कारने मागून दिली धडक
3
NDA, MGB अन् JSP मध्ये थेट सामना, बाकीचे रेसमध्येही नाहीत! बिहार निवडणुकीच्या घोषणेनंतर, काय म्हणाले प्रशांत किशोर?
4
हनिट्रॅप, शारीरिक संबंध आणि पैशांची मागणी, निवृत्त अधिकाऱ्यांना जाळ्यात अडकवणारी सुंदरी अशी सापडली
5
न्यूझीलंड विरुद्ध तझमिनची विक्रमी सेंच्युरी; स्मृती पडली मागे! दक्षिण आफ्रिकेचा पहिला विजय
6
तुमचा मित्र कुठे आहे? सहज शोधू शकाल, इन्स्टाग्रामने आणलं खास फिचर, मिळेल अशी माहिती
7
सरन्यायाधीशांवर बूट फेकणाऱ्या वकिलाचं पुढे काय होणार? गवईंनी घेतला मोठा निर्णय 
8
बाकी सगळं मान्य, पण शस्त्र टाकणार नाही..; हमास कुणाचंच ऐकेना, इजिप्तमध्ये बैठकीत काय होणार?
9
‘मेट्रो  ९ मार्गिका १५ डिसेंबरपर्यंत आणि मेट्रो ४ मार्गिका ३१ डिसेंबर पर्यंत सुरू करा’, परिवहन मंत्र्यांचे आदेश 
10
भारताविरूद्ध 'अतिआगाऊपणा' पाकिस्तानच्या महिला फलंदाजाला पडला महागात, ICCने सुनावली शिक्षा
11
सरकारचा मोठा निर्णय! राज्यातील सार्वजनिक विद्यापीठात अध्यापकांच्या भरती प्रक्रियेस मान्यता
12
बिहार निवडणुकीपूर्वीच समोर आला धक्कादायक सर्व्हे! महाआघाडीला मोठा झटका, NDA ला किती जागा मिळणार? जाणून थक्क व्हाल!
13
वनडेत ५६४ धावा! प्रतिस्पर्धी संघाला ८७ धावांवर All Out करत या संघानं ४७७ धावांनी जिंकली मॅच
14
Bihar Election 2025 Date: बिहारमध्ये निवडणुकीचा बिगुल! विधानसभेच्या २४३ जागांसाठी दोन टप्प्यांत मतदान; बालदिनी निकाल
15
ब्रेस्ट सर्जरी केली, ९ महिने खेळापासून दूर राहिली...; आता पाहा कशी दिसते 'ही' टेनिसस्टार!
16
बिहारामधील मागच्या ४ निवडणुकांत दिसलाय असा कल, नितीश कुमार ज्या बाजूला तोच विजेता 
17
“भाजपाने तारखा दिल्या, ज्ञानेश कुमारांनी वाचून दाखवल्या”; बिहार निवडणुकीवरून विरोधकांची टीका
18
बिहारसह ‘या’ ७ ठिकाणी होणार पोटनिवडणुका, निवडणूक आयोगाकडून मतदान, निकालाची तारीख जाहीर
19
VIDEO: पिल्लासाठी काहीपण... 'बेबी जिराफ'ची आई सिंहिणीला भिडली, जवळ येताच लाथ मारली अन्...
20
महिला वनडे वर्ल्ड कपच्या इतिहासात दुसऱ्यांदा असं घडलं; न्यूझीलंडसह सुझीच्या नावे लाजिरवाणा विक्रम

पिकाच्या सिंचनासाठी नहर ठरले कुचकामी

By admin | Updated: November 2, 2014 22:33 IST

शेतपिकांना सिंचनासाठी पाणी मिळावे, शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ व्हावी, हा मुख्य उद्देश डोळ्यासमोर ठेऊन सावली तालुक्यातील वाघोली बुट्टी उपसा सिंचन योजनेअंतर्गत नहर बांधण्यात आले.

चंद्रपूर : शेतपिकांना सिंचनासाठी पाणी मिळावे, शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ व्हावी, हा मुख्य उद्देश डोळ्यासमोर ठेऊन सावली तालुक्यातील वाघोली बुट्टी उपसा सिंचन योजनेअंतर्गत नहर बांधण्यात आले. मात्र सदर नहराचे पाणी पाहिजे त्या प्रमाणात शेतपिकांना मिळत नसल्याने या भागातील धानपीक करपून गेले आहे. नहराचे पाणी रयतवारी गावापर्यंत आल्यानंतर पुढील गावांपर्यंत ते पाणी पोहचतच नाही. शेतपिकांना मिळतच नाही. परिणामी, या परिसरातील धानपीक सुकत चालले आहे. सुरुवातीच्या काळात या नहराच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सिंचनासाठी मुबलक पाणी मिळत होते. मात्र आता नहराचे पाणी सोडण्याकडे संबंधित विभागाच्या कर्मचाऱ्यांनी दुर्लक्ष केले आहे. सिंचनासाठी पाणी न मिळाल्याने जाम (बु.) येथील खुशाल लोडे रमाकांत चरडुके, ज्ञानदेव हुलके, नकटु उंदिरवाडे, बोनुजी थोरात, दिवाकर थोरात, रसिका गायकवाड, महेंद्र चुनारकर, निनाजी चरडुके, नीळकंठ घडसे, राजेंद्र फाले, मधुकर भिवनकर, उमाजी फाले, शंकर पुंजारे, अनंतराव झाडे, संजय पाल, नामदेव चुधरी, मोरेश्वर मुत्तेमवार, धनू लाडे, गंगाधर बाबनवाडे यांच्या शेतातील धान पीक करपले असून यामुळे त्यांना लाखो रुपयांचा फटका बसला आहे. या परिसरात कोरडवाहू शेती मोठ्या प्रमाणावर असल्याने शेतकऱ्यांना निसर्गाच्या भरवशावर शेती करावी लागते. शासनाने करून दिलेल्या सिंचनाच्या सोईचाही लाभ शेतकऱ्यांना मिळत नसल्याने सध्या या नहराचे पाणी सोडल्या जात असले तरी त्याचे प्रमाण कमी आहे. परिणामी पाण्याचा प्रवाह केवळ मात्र या गावापासून काही अंतरावर असलेल्या जाम (बु.) गावासह परिसरालगतच्या शेतपिकांनाही नहराचे पाणी पोहोचत नसल्याने धानपीक करपत आहे. नहराचे पाणी ज्यादा प्रमाणात सोडण्यात यावे, अशी मागणी रायुकॉंचे जिल्हा उपाध्यक्ष खुशाल लोडे यांनी केली आहे. (प्रतिनिधी)