शहरं
Join us  
Trending Stories
1
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
2
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
3
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
4
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
5
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण
6
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
7
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
8
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
9
बाजार सपाट पातळीवर बंद; रिलायन्सचा शेअर पुन्हा आला धावून, 'या' सेक्टरवर दबाव
10
ATM मधून वारंवार पैसे काढायची सवय असेल तर ती बदला, नाहीतर १ मे पासून होईल नुकसान
11
अण्वस्त्रांची धमकी देणाऱ्या पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांचे तोंड भारताने केले बंद; एक्स अकाउंटवर घातली बंदी
12
Viral Video: बिबट्या थेट पोलीस ठाण्यातच आला! पोलिसाने पाहिलं, पण नंतर काय घडलं?
13
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
14
...म्हणून मुलाचं नाव बॉबी ठेवलं! किशोरी शहाणेंनी सांगितलं कारण, म्हणाल्या- "मी मराठी, नवरा पंजाबी आणि सासू..."
15
Mumbai Accident: ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न अंगलट; दुचाकीवर पाठी बसलेल्या तरुणीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू
16
पाकिस्तानने कुठे लपवलाय अण्वस्त्रांचा साठा? 'या' अहवालाने केली पाकची पोलखोल...
17
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
18
डॉलरच्या तुलनेत रुपयाची जोरदार कामगिरी; आशियातील सर्वात मजबूत चलन, ही आहेत ५ कारणे
19
टक्केवारीच्या आरोपानंतर परभणीचे जिल्हा नियोजन अधिकारी कार्यमुक्त; अधिकाऱ्यांमध्ये खळबळ
20
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  

पिकाच्या सिंचनासाठी नहर ठरले कुचकामी

By admin | Updated: November 2, 2014 22:33 IST

शेतपिकांना सिंचनासाठी पाणी मिळावे, शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ व्हावी, हा मुख्य उद्देश डोळ्यासमोर ठेऊन सावली तालुक्यातील वाघोली बुट्टी उपसा सिंचन योजनेअंतर्गत नहर बांधण्यात आले.

चंद्रपूर : शेतपिकांना सिंचनासाठी पाणी मिळावे, शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ व्हावी, हा मुख्य उद्देश डोळ्यासमोर ठेऊन सावली तालुक्यातील वाघोली बुट्टी उपसा सिंचन योजनेअंतर्गत नहर बांधण्यात आले. मात्र सदर नहराचे पाणी पाहिजे त्या प्रमाणात शेतपिकांना मिळत नसल्याने या भागातील धानपीक करपून गेले आहे. नहराचे पाणी रयतवारी गावापर्यंत आल्यानंतर पुढील गावांपर्यंत ते पाणी पोहचतच नाही. शेतपिकांना मिळतच नाही. परिणामी, या परिसरातील धानपीक सुकत चालले आहे. सुरुवातीच्या काळात या नहराच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सिंचनासाठी मुबलक पाणी मिळत होते. मात्र आता नहराचे पाणी सोडण्याकडे संबंधित विभागाच्या कर्मचाऱ्यांनी दुर्लक्ष केले आहे. सिंचनासाठी पाणी न मिळाल्याने जाम (बु.) येथील खुशाल लोडे रमाकांत चरडुके, ज्ञानदेव हुलके, नकटु उंदिरवाडे, बोनुजी थोरात, दिवाकर थोरात, रसिका गायकवाड, महेंद्र चुनारकर, निनाजी चरडुके, नीळकंठ घडसे, राजेंद्र फाले, मधुकर भिवनकर, उमाजी फाले, शंकर पुंजारे, अनंतराव झाडे, संजय पाल, नामदेव चुधरी, मोरेश्वर मुत्तेमवार, धनू लाडे, गंगाधर बाबनवाडे यांच्या शेतातील धान पीक करपले असून यामुळे त्यांना लाखो रुपयांचा फटका बसला आहे. या परिसरात कोरडवाहू शेती मोठ्या प्रमाणावर असल्याने शेतकऱ्यांना निसर्गाच्या भरवशावर शेती करावी लागते. शासनाने करून दिलेल्या सिंचनाच्या सोईचाही लाभ शेतकऱ्यांना मिळत नसल्याने सध्या या नहराचे पाणी सोडल्या जात असले तरी त्याचे प्रमाण कमी आहे. परिणामी पाण्याचा प्रवाह केवळ मात्र या गावापासून काही अंतरावर असलेल्या जाम (बु.) गावासह परिसरालगतच्या शेतपिकांनाही नहराचे पाणी पोहोचत नसल्याने धानपीक करपत आहे. नहराचे पाणी ज्यादा प्रमाणात सोडण्यात यावे, अशी मागणी रायुकॉंचे जिल्हा उपाध्यक्ष खुशाल लोडे यांनी केली आहे. (प्रतिनिधी)