शहरं
Join us  
Trending Stories
1
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
2
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
3
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
4
इराणने अशी कोणती मिसाईल डागली? इस्रायलमध्ये ना अलर्ट आला ना सायरन वाजला; हायफावर कोसळली...
5
"वाटलं भारताने अण्वस्त्र हल्लाच केला, पाकिस्तानकडे फक्त...', नेमकं काय म्हणाले बिलावल भुट्टो
6
KL राहुलनं शतकी खेळीसह साधला विक्रमी डाव! लिटल मास्टर गावसकरांसह द्रविडलाही टाकले मागे
7
'मी राज्यसभेवर जाणार नाही...', स्वतः अरविंद केजरीवालांनी लावला चर्चांना पूर्णविराम
8
इराण-इस्त्रायल युद्ध पेटले! ४० मिनिटे इस्रायलवर क्षेपणास्त्रांचा मारा, थरकाप उडवणारे व्हिडिओ व्हायरल!
9
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
10
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार
11
“विकासासाठीचा प्रत्येक रुपया सर्वसामान्यांपर्यंत पोहोचला पाहिजे”: DCM एकनाथ शिंदे
12
तिसऱ्या महायुद्धाला तोंड फुटण्याची भीती...! इराण इस्रायल युद्धात आणखी एका देशाची उडी; कुणाला देणार साथ?
13
“भास्कर जाधव नौटंकी, जनताच संन्यास देणार, तो काही एवढा मोठा माणूस नाही”; कुणी केली टीका?
14
गोव्याला जायचा प्लान करताय? ‘मुंबई-गोवा वंदे भारत’ट्रेनच्या शेकडो फेऱ्या रद्द; कारण आले समोर
15
क्रूरतेच कळस! हुंड्यात कार न मिळाल्याने पती झाला हैवान; पत्नीला मारलं, मणक्याचं हाड तोडलं अन्... 
16
रणथंबोरची राणी, मगरींच्या शिकारीसाठी प्रसिद्ध; 'अ‍ॅरोहेड'ने घेतला अखेरचा श्वास...
17
Maharashtra Election : महापालिका, जिल्हा परिषदांच्या निवडणुका कधी होणार? समोर आली मोठी अपडेट
18
Iran Israel War : 'पुतिन आमची मदत करा...', इस्रायलने बॉम्ब टाकल्यावर खामेनींना रशियाची आठवण झाली, परराष्ट्रमंत्र्यांना दूत म्हणून पाठवले
19
जगाच्या नकाशावर नाहीसा होऊ लागलाय 'हा' सुंदर देश; शास्त्रज्ञांनाही फुटलाय घाम!
20
स्वामींच्या मठात गेल्यावर तुम्हालाही ‘या’ २ गोष्टींचा अनुभव आला आहे का? उत्तर हो असेल तर...

पिकाच्या सिंचनासाठी नहर ठरले कुचकामी

By admin | Updated: November 2, 2014 22:33 IST

शेतपिकांना सिंचनासाठी पाणी मिळावे, शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ व्हावी, हा मुख्य उद्देश डोळ्यासमोर ठेऊन सावली तालुक्यातील वाघोली बुट्टी उपसा सिंचन योजनेअंतर्गत नहर बांधण्यात आले.

चंद्रपूर : शेतपिकांना सिंचनासाठी पाणी मिळावे, शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ व्हावी, हा मुख्य उद्देश डोळ्यासमोर ठेऊन सावली तालुक्यातील वाघोली बुट्टी उपसा सिंचन योजनेअंतर्गत नहर बांधण्यात आले. मात्र सदर नहराचे पाणी पाहिजे त्या प्रमाणात शेतपिकांना मिळत नसल्याने या भागातील धानपीक करपून गेले आहे. नहराचे पाणी रयतवारी गावापर्यंत आल्यानंतर पुढील गावांपर्यंत ते पाणी पोहचतच नाही. शेतपिकांना मिळतच नाही. परिणामी, या परिसरातील धानपीक सुकत चालले आहे. सुरुवातीच्या काळात या नहराच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सिंचनासाठी मुबलक पाणी मिळत होते. मात्र आता नहराचे पाणी सोडण्याकडे संबंधित विभागाच्या कर्मचाऱ्यांनी दुर्लक्ष केले आहे. सिंचनासाठी पाणी न मिळाल्याने जाम (बु.) येथील खुशाल लोडे रमाकांत चरडुके, ज्ञानदेव हुलके, नकटु उंदिरवाडे, बोनुजी थोरात, दिवाकर थोरात, रसिका गायकवाड, महेंद्र चुनारकर, निनाजी चरडुके, नीळकंठ घडसे, राजेंद्र फाले, मधुकर भिवनकर, उमाजी फाले, शंकर पुंजारे, अनंतराव झाडे, संजय पाल, नामदेव चुधरी, मोरेश्वर मुत्तेमवार, धनू लाडे, गंगाधर बाबनवाडे यांच्या शेतातील धान पीक करपले असून यामुळे त्यांना लाखो रुपयांचा फटका बसला आहे. या परिसरात कोरडवाहू शेती मोठ्या प्रमाणावर असल्याने शेतकऱ्यांना निसर्गाच्या भरवशावर शेती करावी लागते. शासनाने करून दिलेल्या सिंचनाच्या सोईचाही लाभ शेतकऱ्यांना मिळत नसल्याने सध्या या नहराचे पाणी सोडल्या जात असले तरी त्याचे प्रमाण कमी आहे. परिणामी पाण्याचा प्रवाह केवळ मात्र या गावापासून काही अंतरावर असलेल्या जाम (बु.) गावासह परिसरालगतच्या शेतपिकांनाही नहराचे पाणी पोहोचत नसल्याने धानपीक करपत आहे. नहराचे पाणी ज्यादा प्रमाणात सोडण्यात यावे, अशी मागणी रायुकॉंचे जिल्हा उपाध्यक्ष खुशाल लोडे यांनी केली आहे. (प्रतिनिधी)