शहरं
Join us  
Trending Stories
1
टॅरिफबाबत भारत आणि अमेरिकेमध्ये चर्चेचे दरवाजे अजूनही खुले, दोन्हीकडून मिळाले संकेत  
2
"रशिया युक्रेन युद्ध मोदींचे" अमेरिकन राजदूताने भारताला धरलं जबाबदार, टॅरिफ कमी करण्यासाठी ठेवली अट
3
पुतिन नव्हे..., आता झेलेन्स्कींवरच भडकले ट्रम्प, म्हणाले, "युद्ध..., युक्रेनने ऐकले नाही, तर बंदी घालेन!"
4
बुलढाणा मतदारसंघातील मतांच्या फेरमोजणीची मागणी, पराभूत उमेदवार जयश्री शेळकेंचा हायकोर्टात अर्ज
5
जामीन अर्जावरील सुनावणी ४३ वेळा पुढे ढकलल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाची नाराजी, आरोपीला दिलासा
6
आजचे राशीभविष्य, २८ ऑगस्ट २०२५: मानहानी होण्याची शक्यता, विधायक कार्य हातून घडेल
7
जम्मू-काश्मीरमध्ये पावसाने हाहाकार, वैष्णोदेवी मार्गावरील भूस्खलन घटनेतील मृतांची संख्या ४१ वर, जम्मू-उधमपूरमध्ये ११५ वर्षांतील रेकॉर्ड झाले ब्रेक
8
ट्रम्प यांच्या सूचनेनंतर पाच तासांतच शस्त्रसंधी, मतदार अधिकार यात्रेत राहुल गांधी यांचा आरोप
9
वर्षानुवर्षे खटला चालणे, हे शिक्षेसारखेच. सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केली खंत
10
मराठा वादळ मुंबईच्या दिशेने, आंदोलनाला केवळ एक दिवसासाठी सशर्त परवानगी
11
शाळांमध्येच होणार विद्याथ्यांचे आधार बायोमेट्रिक अपडेट, १७ कोटी आधार क्रमांक अजूनही प्रलंबित; पालकांचा वेळ, श्रम व त्रास वाचणार
12
तब्बल २० लाख नोकऱ्या धोक्यात ? ट्रम्प टॅरिफचा भारताला जबर फटका
13
वीज कोसळल्याने चौघांचा मृत्यू; मृतांमध्ये आईसह तरुण मुलाचा समावेश, धापेवाडा व धामणगाव शिवारातील घटना
14
पश्चिम विदर्भात अतिवृष्टीचा सहा लाख हेक्टरला फटका, ऑगस्टमध्ये सर्वाधिक नुकसान; कृषी विभागाचा अहवाल
15
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
16
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
17
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
18
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
19
कर्जाच्या ओझ्याखाली दबला पाकिस्तान; IMFच्या बेलआऊट पॅकेजनंतरही अर्धा देश उपाशी!
20
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती

१९० शेतकऱ्यांना पीक विमा नाकारला

By admin | Updated: January 15, 2017 00:40 IST

गतवर्षी पीक विमा काढलेल्या २१ हजार ५०३ शेतकऱ्यांैपकी १९० शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ नाकारण्यात आला आहे.

१० कोटींचे वाटप : यावर्षी शेतकऱ्यांकडून १५ कोटींची वसुली चंद्रपूर : गतवर्षी पीक विमा काढलेल्या २१ हजार ५०३ शेतकऱ्यांैपकी १९० शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ नाकारण्यात आला आहे. या शेतकऱ्यांकडून १० कोटी ७६ लाख रुपयांचा विमा हप्ता जमा करण्यात आला होता. यावर्षीचा खरीप हंगामातील पीक विम्याचा लाभ अद्याप मिळालेला नाही. त्याच वेळी रबी हंगामात शेतकऱ्यांचा प्रतिसाद नसल्याने विमा काढण्याकरिता मुदतवाढ देण्यात आली होती.खरीप व रबी हंगामामध्ये वेगवेगळा पीक विमा काढण्यात येतो. त्यामध्ये कर्जदार शेतकऱ्यांचा कर्जातून पीक विमा हप्ता वळता करण्यात येतो. बिगर कर्जदार शेतकऱ्यांना पीक विमा ऐच्छिक असतो. त्यामुळे त्यांना पीक विमा काढण्याचे आवाहन करण्यात येते. गेल्या वर्षी २०१५-१६मध्ये २१ हजार ५०३ शेतकऱ्यांनी पीक विमा काढला होता. त्यापैकी २१ हजार ३१३ शेतकऱ्यांना पीक विम्याच्या नुकसान भरपाईचे वाटप करण्यात आले. १९० शेतकऱ्यांना पीक विमा नुकसान भरपाईचा लाभ देण्यात आला नाही. बिमा काढताना शेतकऱ्यांकडून १० कोटी ७६ लाख आणि केंद्र व राज्य शासनाकडून विमा वाटा म्हणून रक्कम कंपनीकडे भरण्यात आली होती.जिल्ह्यात कापूस, सोयाबिन, धान आदी पिकांसाठी विमा काढण्यात आला. यावर्षी कापूस चांगला झाला. मात्र, व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची नागवणूक करण्यात येत आहे. यावर्षी कापूस उशिरा हातात आला. त्यामुळे दिवाळीपूर्वी कापसाचे पैसे मिळाले नाहीत. दिवाळी झाल्यानंतरही पणन महासंघाने कापूस खरेदीची घोषणा केलेली नाही. केंद्र शासनाचे सीसीआय कापूस खरेदी सुरू करीत असते. परंतु सीसीआयनेदेखील उशिरा कापूस खरेदी सुरू केली. पणन महासंघाने लवकर खरेदी सुरू केली तर व्यापारी स्पर्धात्मक अधिक किंमतीला कापूस घेत असतात. यावर्षी ती परिस्थिती निर्माण झाली नाही. त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडला. त्याचा फायदा व्यापाऱ्यांनी उचलला आहे. आधीच पावसाच्या अनिमिततेमुळे कापसाचे पीक उशिरा आले. परतीच्या पावसानंतर पिकांवर रोगराई पसरली होती. एकीकडे कापसाला भाव नाही, दुसरीकडे कापूस वेचणीकरिता मजुरांची टंचाई निर्माण झाली ैहोती. अशातच ८ नोव्हेंबर रोजी केंद्र सरकारने ५०० व १००० रुपयांच्या जुन्या नोटांवर बंदी घातली. त्यातच जिल्हा सहकारी बँकांना नोट बदलून देणे आणि जुन्या नोटा जमा करण्यास रिझर्व्ह बँकेने प्रतिबंध घातला. त्याचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. बँकेकडे फारशी रक्कम उपब्ध नसल्याने शेतकऱ्यांना रबी हंगामात जिल्हा बँकेतून कर्ज पुरवठा होऊ शकला नाही. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकच शेतकऱ्यांना सर्वाधिक कर्ज पुरवठा करीत असते. जिल्हा बँकेतून शेतकऱ्यांना कर्ज न मिळाल्याने कर्जदार शेतकऱ्यांची पीक विमा हप्ता रक्कम कपात होऊ शकलेली नाही. रबी हंगामात १ लाख १९ हजार ४३८ हेक्टर क्षेत्राचे पेरणीचे नियोजन करण्यात आले. प्रत्यक्षात तेवढीही पेरणी होऊ शकलेली नाही. (प्रतिनिधी)खरीप हंगामात ९१ हजार शेतकऱ्यांचा पीक विमा यावर्षी खरीप हंगामामध्ये ९० हजार २८८ कर्जदार शेतकऱ्यांनी पीक विमा काढला आहे. ७८ हजार ४४९ हेक्टर क्षेत्रातील पिकांसाठी हा विमा काढण्यात आला आहे. त्याकरिता शेतकऱ्यांकडून १५ कोटी ६३ लाख २७ हजार रुपये विमा हप्ता म्हणून कर्जातून कपात करण्यात आली आहे. या शेतकऱ्यांच्या विमा हप्त्यातील वाटा म्हणून शासनाने ६६५ कोटी ५७ लाख ६८ हजार रुपये विमा कंपनीकडे भरले आहेत. पीक विमा काढणाऱ्या बिगर कर्जदार शेतकऱ्यांची संख्या अत्यल्प आहे. केवळ ९३७ बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी ८१५ हेक्टर क्षेत्रातील पिकांचा विमा काढला आहे. त्याकरिता शेतकऱ्यांकडून ९ लाख २२ हजार ८२९ रुपये विमा हप्ता रक्कम घेण्यात आली आहे. त्यामध्ये शासनाने ४ कोटी १२ लाख रुपये विमा कंपनीकडे भरले आहेत. मुदतवाढीनंतरही रबीत प्रतिसाद कमीरबी हंगामातही प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत विमा संरक्षण देण्यात आले. रबी हंगामात गहू, ज्वारी, हरभरा या तीन प्रमुख पिकांचा समावेश योजनेत करण्यात आला. कर्जदार आणि बिगर कर्जदार शेतकऱ्यांना पीक विमा काढण्याची सुविधा होती. त्याकरिता ३१ डिसेंबरपर्यंत मुदत देण्यात आली. परंतु नोटबंदीच्या पार्श्वभूमीवर रबी हंगामात पीक विमा काढण्यात शेतकरी उदासिन होते. परिणामी कृषी विभागाने १० दिवस आणखी मुदत वाढविली. तरीही पीक विमा काढण्यात शेतकऱ्यांनी रस दाखविला नाही. नोटबंदीमध्ये पैशाअभावी शेतकऱ्यांनी प्रत्यक्ष पेरणी कमी केली. त्याचा फटका पीक विमा योजनेला बसला आहे.