शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

पीक विम्याचे पैसे शेतकऱ्यांना देण्यात यावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:33 IST

सिंदेवाही : यावर्षीचा खरीप हंगाम शेतकऱ्यांना तोट्याचा ठरला आहे. अकाली पावसाने व मावा तुडतुडा यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. ...

सिंदेवाही : यावर्षीचा खरीप हंगाम शेतकऱ्यांना तोट्याचा ठरला आहे. अकाली पावसाने व मावा तुडतुडा यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. त्यामुळे विमा काढलेल्या शेतकऱ्यांना विम्याचे पैसे ३० दिवसांच्या आत देण्यात यावे, अशी मागणी शेतकरी शेतमजूर महासंघाने पंतप्रधान, मुख्यमंत्री, पालकमंत्री व जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन केली आहे.

शेतकरी शेतमजूर महासंघाची सभा रघुनाथ शेंडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी शेतकऱ्यांनी खरीप धान पिकासाठी सहकारी संस्था, सहकारी व राष्ट्रीयकृत बँकेतून कर्ज घेतले. यावेळी प्रधानमंत्री पीक विमा योजनानुसार शेतकऱ्यांच्या कर्जामधून हेक्टरी ८५० रूपये विमा हप्ता कपात करण्यात आला. सदर हप्ता विमा कंपनीत जमा करण्यात आला. शेतकऱ्यांच्या पिकास नैसर्गिक आपत्तीत नुकसानीसाठी विमा संरक्षण देण्यात आले. प्रति हेक्टर ४२ हजार ५०० रूपये नुकसान भरपाई प्रधानमंत्री पीक योजनेत नमूद असून ३० दिवसांच्या आत पीक विमा शेतकऱ्यांना देणे कंपनीचे कर्तव्य आहे.

यावर्षी शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टाने शेतात पीक उभे केले. परंतु पीक हातात येताना अवकाळी पावसामुळे व मावा तुडतुडा या किडीचा प्रादुर्भाव झाल्याने पीक नष्ट झाले. पीक वाचविण्याचे शेतकऱ्यांचे प्रयत्न निष्फळ ठरले. कित्येक शेतकऱ्यांनी धान पिकाची कापणी केली नाही. कुणाला हेक्‍टरी आठ तर कुणाला हेक्टरी दहा क्विंटल धानाचे उत्पादन झाले. यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. प्रधानमंत्री पीक विमा योजनेनुसार पिकाच्या नुकसानीसाठी सुरक्षा कवच ३० दिवसात मिळणार या आशेने शेतकरी वाट पाहून थकले. सदर विमा कवच शेतकऱ्यांना देण्यात यावे, अशी मागणी शेतकरी शेतमजूर महासंघाने केली आहे. सभेला तालुक्यातील ३५० शेतकरी उपस्थित होते. यात चंद्रशेखर चन्ने, जगन्नाथ महाजन,राजू ताडाम, दिनकर बोरकर, लोकमित्र गेडाम, ऋषी लोखंडे, लता गेडाम, यादव बोरकर,मयूर सुचक, अरुण कोलते, मुखरू बनसोड, जानकीराम वाघमारे,सुलभा कामडी आदींचा समावेश होता.