शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! छगन भुजबळांची महायुती सरकारमध्ये घरवापसी! सकाळी दहा वाजता मंत्रि‍पदाचा शपथविधी
2
ज्योती मल्होत्राच्या मोबाईलममध्ये ISI च्या शाकिरचा नंबर कोणत्या नावाने? पाकिस्तानमध्ये भेटलेले ते दोन अधिकारी कोण?
3
MI vs DC : वानखेडेचं मैदान मारा अन् Playoffs चं तिकीट मिळवा! मुंबई इंडियन्स फक्त एक पाऊल दूर, पण...
4
SRH नं पंतच्या LSG चा खेळ केला खल्लास! आता MI अन् DC मध्ये प्लेऑफ्सची चुरस
5
शस्त्रसंधीची चर्चा भारत-पाकिस्तानमध्येच, डोनाल्ड ट्रम्प यांचा काहीही संबंध नाही; विक्रम मिस्रींनी संसदीय समितीला सगळं सांगितलं
6
IPL 2025 : भर मैदानात अभिषेक अन् दिग्वेश यांच्यात वाजलं; नेमकं काय घडलं? (VIDEO)
7
'काश्मीरला जा आणि लष्कराच्या छावणीचे फोटो घेऊन ये"; ISI एजंटने भारतातील गुप्तहेराला कोणते काम दिले होते?
8
साताऱ्यात चीड आणणारी घटना! चुलत भावाकडून १३ वर्षीय बहिणीवर अनेकदा बलात्कार
9
राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेतृत्वात लवकरच बदल दिसेल; रोहित पवारांचं विधान
10
कॅपिटल गेन टॅक्स काय असतो, कोणत्या प्रकारे आणि किती द्यावा लागतो? सगळं गणित समजून घ्या
11
लातूर : पाठीमागून येणाऱ्या दुचाकीची भयंकर धडक; आई, मुलासह जावयाचा मृत्यू
12
'मीदेखील या गोष्टीला बळी पडलोय', सरन्यायाधीश प्रोटोकॉल प्रकरणावर उपराष्ट्रपतींची प्रतिक्रिया
13
निक्की आधी बॅटिंगला येऊन पंतचा पुन्हा फ्लॉप शो! Sanjiv Goenka यांनी असा काढला राग
14
'ऑपरेशन सिंदूर' आधी पाकिस्तानला दिली होती माहिती?; परराष्ट्र सचिवांनी संसदीय समितीत केला खुलासा
15
IPL 2025 : विदर्भकराचं स्वप्न झालं साकार! पण विकेटमागे इशान किशननं घोळ घातला, नाहीतर...
16
Rain update: साताऱ्यात धडाम् धूम! वळवाची दमदार हजेरी, शहरातील वीजपुरवठा खंडित
17
ट्रॅक्टर-ऑटोचा भीषण अपघात, तीन जागीच ठार; लातूर-बार्शी महामार्गावरील घटना
18
Shocking: व्हिडीओ कॉलसमोर प्रेमीयुगुलानं केलं विषप्राशन; प्रेयसीचा मृत्यू, प्रियकर आयसीयूमध्ये!
19
Jalana: कामाहून परतणाऱ्या तीन कष्टकरी मित्रांवर वीज कोसळली; दोघांचा मृत्यू
20
भुईमूग बाजारात नेला अन् पावसामुळे वाहून गेला; महाराष्ट्रातील शेतकऱ्याला थेट केंद्रीय कृषिमंत्र्याचा कॉल; म्हणाले...

पीक विम्याचे पैसे शेतकऱ्यांना देण्यात यावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:33 IST

सिंदेवाही : यावर्षीचा खरीप हंगाम शेतकऱ्यांना तोट्याचा ठरला आहे. अकाली पावसाने व मावा तुडतुडा यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. ...

सिंदेवाही : यावर्षीचा खरीप हंगाम शेतकऱ्यांना तोट्याचा ठरला आहे. अकाली पावसाने व मावा तुडतुडा यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. त्यामुळे विमा काढलेल्या शेतकऱ्यांना विम्याचे पैसे ३० दिवसांच्या आत देण्यात यावे, अशी मागणी शेतकरी शेतमजूर महासंघाने पंतप्रधान, मुख्यमंत्री, पालकमंत्री व जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन केली आहे.

शेतकरी शेतमजूर महासंघाची सभा रघुनाथ शेंडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी शेतकऱ्यांनी खरीप धान पिकासाठी सहकारी संस्था, सहकारी व राष्ट्रीयकृत बँकेतून कर्ज घेतले. यावेळी प्रधानमंत्री पीक विमा योजनानुसार शेतकऱ्यांच्या कर्जामधून हेक्टरी ८५० रूपये विमा हप्ता कपात करण्यात आला. सदर हप्ता विमा कंपनीत जमा करण्यात आला. शेतकऱ्यांच्या पिकास नैसर्गिक आपत्तीत नुकसानीसाठी विमा संरक्षण देण्यात आले. प्रति हेक्टर ४२ हजार ५०० रूपये नुकसान भरपाई प्रधानमंत्री पीक योजनेत नमूद असून ३० दिवसांच्या आत पीक विमा शेतकऱ्यांना देणे कंपनीचे कर्तव्य आहे.

यावर्षी शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टाने शेतात पीक उभे केले. परंतु पीक हातात येताना अवकाळी पावसामुळे व मावा तुडतुडा या किडीचा प्रादुर्भाव झाल्याने पीक नष्ट झाले. पीक वाचविण्याचे शेतकऱ्यांचे प्रयत्न निष्फळ ठरले. कित्येक शेतकऱ्यांनी धान पिकाची कापणी केली नाही. कुणाला हेक्‍टरी आठ तर कुणाला हेक्टरी दहा क्विंटल धानाचे उत्पादन झाले. यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. प्रधानमंत्री पीक विमा योजनेनुसार पिकाच्या नुकसानीसाठी सुरक्षा कवच ३० दिवसात मिळणार या आशेने शेतकरी वाट पाहून थकले. सदर विमा कवच शेतकऱ्यांना देण्यात यावे, अशी मागणी शेतकरी शेतमजूर महासंघाने केली आहे. सभेला तालुक्यातील ३५० शेतकरी उपस्थित होते. यात चंद्रशेखर चन्ने, जगन्नाथ महाजन,राजू ताडाम, दिनकर बोरकर, लोकमित्र गेडाम, ऋषी लोखंडे, लता गेडाम, यादव बोरकर,मयूर सुचक, अरुण कोलते, मुखरू बनसोड, जानकीराम वाघमारे,सुलभा कामडी आदींचा समावेश होता.