शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

वन्यप्राण्यांमुळे पिकाचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2018 22:32 IST

पर्यावरण संवर्धनासाठी वन्यजीवाच्या संरक्षणात बफर झोन क्षेत्र तयार करण्यात आले. या क्षेत्रात शेतकऱ्यांच्या पिकांची प्रचंड हानी झालेली आहे. शेतकऱ्यांचे अपार कष्ट मातीमोल होत असून पिकांच्या नुकसानीमुळे पुन्हा शेतकरी वर्ग समस्यांच्या विळख्यात सापडलेला आहे.

ठळक मुद्देशेतकरी पुन्हा समस्यांच्या विळख्यात : शेतकऱ्यांची झोपच उडाली

लोकमत न्यूज नेटवर्कमारोडा : पर्यावरण संवर्धनासाठी वन्यजीवाच्या संरक्षणात बफर झोन क्षेत्र तयार करण्यात आले. या क्षेत्रात शेतकऱ्यांच्या पिकांची प्रचंड हानी झालेली आहे. शेतकऱ्यांचे अपार कष्ट मातीमोल होत असून पिकांच्या नुकसानीमुळे पुन्हा शेतकरी वर्ग समस्यांच्या विळख्यात सापडलेला आहे.केवळ आणि केवळ पावसाच्या भरवशावर उभा राहण्याचा प्रयत्न शेतकरी वर्ग करतो. मागील वर्षी धान पिकांचे पावसाअभावी मोठे नुकसान झाले. कर्ज काढले, तेही पुरते फेडले गेले नाही. यावर्षी पुन्हा कर्ज काढून पीक जोमाने उभे केले. मात्र वन्यप्राण्यांनी उभे पीक उद्ध्वस्त करणे सुरू केले आहे.मागील दोन महिन्यांपासून शेतकरी सुखाने झोपलेला नाही. अगदी मावळतीच्या पूर्वी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास २० ते २५ च्या समुहाने येणाऱ्या रानडुकरांनी उभ्या लोंबाच्या धानपिकांत प्रचंड हैदोस घालणे सुरू केले आहे. साधरणत: सायं ४ वाजताच्या सुमारास उब्बा घेऊन शेतकरी घराबाहेर पडतो. आणि रानडुकरांना हाकलून लावण्यासाठी वारंवार ओरड करीत असतो. रात्रभर डोळ्यांना झोप नाही, अशा स्थितीतही त्यांनी पिकांना सरंरक्षण देण्याचा प्रयत्न केला. पण शेवटी अनेक शेतकऱ्यांचे नुकसानच झाले. यापूर्वीचा नुकसान भरपाईचा प्रस्ताव वनविभागाकडे पडून आहे. त्याची चौकशी होईल. त्या चौकशीत वेगवेगळे सदस्य एकत्रित जमा होतील. त्यानंतर नुकसान भरपाई किती द्यायची ते ठरवतील. ही दरवर्षीची समस्या आहे. स्थानिक रोजगार नाही. दुधाळू जनावरांना ही वन्यप्राण्यांच्या भीतीपोटी चारा नाही. नेमके शेतकºयांनी काय करायचे, हा गंभीर प्रश्न त्यांच्या समोर सध्या उभा ठाकला आहे.