शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
3
SL vs BAN : 'काठावर पास' झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
4
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
5
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
6
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
7
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
8
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
9
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
10
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
11
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
12
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
13
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
14
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
15
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
16
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
17
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
18
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
19
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
20
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...

वर्धा नदीला आलेल्या पुरामुळे पिकांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2018 23:00 IST

शुक्रवारी रात्री अचानक वर्धा नदीला आलेल्या पुरामुळे नदीला लागून असलेल्या शेतात पाणी शिरले. यात सोयाबीन कापसाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

ठळक मुद्देशेतातील जनावरांचा चाराही खराब : सोयाबीन व कापूस पीक पाण्याखाली

लोकमत न्यूज नेटवर्कपिपरी (देशमुख) : शुक्रवारी रात्री अचानक वर्धा नदीला आलेल्या पुरामुळे नदीला लागून असलेल्या शेतात पाणी शिरले. यात सोयाबीन कापसाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.याशिवाय शेतात असलेला जनावरांचा चाराही उद्ध्वस्त झाला. दरम्यान, शनिवारीदेखील नदीचे पाणी वाढत असल्यामुळे कोच्ची-घोनाड मार्गावरील पुलावर पाणी येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अद्याप एकही मार्ग बंद झालेला नाही. मात्र पाणी असेच वाढत गेल्यास काही मार्ग बंद होण्याची शक्यता आहे. अचानक आलेल्या पुरामुळे पिपरी देशमुख येथील पाणी पुरवठ्याची पाईपलाईन नदीच्या पात्रात बुडाली आहे. मोटारपंपही वाहून गेल्यामुळे ग्रामपंचयतीद्वारे गावात होणारा पाणी पुरवठा बंद झाला आहे. यात ग्रामपंचायतीचेही ७५ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. शासनाने पूरबुडित क्षेत्राचे सर्व्हेक्षण करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी सर्व शेतकºयांकडून केली जात आहे.पुराचे पाणी गोठ्यात शिरल्याने शेळ्यांचा मृत्यूवरोरा : नाल्याला पूर आला. या पुराचे पाणी नजिकच्या गोठ्यात शिरल्याने गोठ्यातील शेळ्या व कोंबड्यांचा मृत्यू झाला. यात संबंधित शेतकऱ्याला लाखो रूपयांचा फटका बसला आहे. सदर घटना वरोरा शहरानजिकच्या सुर्ला गावात शुक्रवारी घडली. वरोरा शहरानजिकच्या बोर्डा ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या सुर्ला गावाजवळ योगेश व रवींद्र देसाई या भावंडांचे शेत आहे. दोघेही शेतीला जोडधंदा म्हणून मागील काही वर्षांपासून शेतात गोठे बांधून शेळी पालन व कुक्कुट पालनाचा व्यवसाय करीत आहेत. शेताजवळच एक नाला वाहतो. गुरुवारी व शुक्रवारी पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यात गोठ्या नजिकच्या नाल्याला पूर आला. पुराचे पाणी गोठ्यात शिरले. ही बाब देसाई कुटुंबीयांना माहित होताच त्यांनी गोठ्याकडे धाव घेतली. परंतु पुराचे पाणी अधिक असल्याने त्यांना गोठ्यापर्यंत जाता आले नाही. पुराच्या पाण्यात गोठा बुडाल्याने गोठ्यातील शेळ्या व कोंबड्यांचा जागीच मृत्यू झाला. यात देसाई कुटुबीयांना लाखो रूपयांचा फटका बसला आहे. शासनाने पंचनामा करून आर्थिक मदत करावी, अशी मागणी केली जात आहे.