शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
6
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
7
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
8
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
9
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
10
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
11
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
12
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
13
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
14
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
15
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
16
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
17
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
18
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
19
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
20
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
Daily Top 2Weekly Top 5

९९ पीडितांच्या आयुष्यातील संंकट टळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2021 04:29 IST

सखी वन स्टॉप सेंटर : १३ परप्रांतीय पीडितांनाही समुपदेशन व कायदेशीर मदत चंद्रपूर : केंद्रीय महिला व बालविकास मंत्रालयाने ...

सखी वन स्टॉप सेंटर : १३ परप्रांतीय पीडितांनाही समुपदेशन व कायदेशीर मदत

चंद्रपूर : केंद्रीय महिला व बालविकास मंत्रालयाने जिल्ह्यात सुरू केलेल्या सखी वन स्टॉप सेंटरने (अभया केंद्र) १ नोव्हेंबर २०१८ ते १६ जानेवारी २०२१ या कालावधीत ९९ पीडितांना मदत केली. त्यामुळे या पीडितांमध्ये अन्यायाचा सामना करण्याची ताकद मिळाली. काहींचे संसार सुखी झाले, काहींना कुटुंबाचा आधार मिळाला तर काहींना वैद्यकीय व कायदेशीर मदत मिळाल्याने आत्मसन्माने उभे राहून उदरनिर्वाहाचे संकट दूर झाले. यामध्ये १३ परप्रांतीय पीडितांचाही समावेश आहे.

सखी वन स्टॉप सेंटरसाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली सनियंत्रण समिती स्थापन झाली. या समितीत पोलीस अधीक्षक, जिल्हा न्याय व विधि प्राधिकरणाचे सचिव, बार कौन्सिलचे अध्यक्ष, जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासह अशासकीय व्यक्तींचाही समावेश असतो. जिल्हा महिला व बालकल्याण अधिकारी समितीचे पदसिद्ध सचिव आहेत. ही समिती प्रकल्पातील कामाचा आढावा घेते. महिला मेळावा, बचत गट मेळावा, आशा व अंगणवाडी सेविकांच्या मेळाव्यात प्रकल्पाबात जनजागृती केली जाते, अशी माहिती जिल्हा महिला व बालकल्याण अधिकारी रमेश टेटे यांनी दिली. हे सेंटर मूल मार्गावर आहे. मात्र, सुसज्ज इमारत नाही.

केंद्राकडून काय काम केले जाते ?

शारीरिक, मानसिक, लैंगिक छळ, कौटुंबिक छळ, अ‍ॅसिड हल्ला किंवा सायबर क्राईममधील पीडिता किंवा कोणत्याही अत्याचाराला बळी पडलेल्या महिलांना पोलीस, वकील, समुपदेशकांची मदत घ्यावी लागते. मात्र, अत्याचाराचा सामना करावा लागल्यानंतर अशा व्यक्तींकडे जाऊन मदत घेण्याची मानसिकता पीडितेची नसते. त्यामुळे पीडिता वन स्टॉप सेंटरमधून एकाच छताखाली मोफत वैद्यकीय सुविधा, पोलीस मदत, समुपदेशन, कायदेशीर मदत व गरजेनुसार किमान पाच दिवसांसाठी तात्पुरत्या निवाऱ्याची सुविधा दिली जाते.

काैटुंबिक हिंसाराच्या तक्रारी सर्वाधिक

चंद्रपूर येथील सखी वन स्टॉप सेंटरमध्ये काैटुंबिक हिंसाचाराच्या तक्रारी सर्वाधिक आहेत. महिला तस्करीबाबत सात तक्रारींची नोंद झाली. हरविणे व अपहरणाच्याही तक्रारी आहेत. उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, आसाम, दिल्ली, आंध्र प्रदेश, छत्तीसगड व राजस्थानातील महिलांच्या तक्रारीही आहेत. १८ वर्षांआतील पीडित युवती व बालिकांना बाल न्याय (काळजी व संरक्षण) अधिनियम २०००, बालकांवरील लैंगिक अत्याचार अधिनियम २०१२ (पोस्को) अन्वये नियुक्त अधिकारी- संस्थांमार्फत सखी सेंटरमध्ये दाखल केले जाते.