शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ तीन भावंडांवर उदरनिर्वाहाचे संकट

By admin | Updated: March 28, 2016 00:50 IST

चार वर्षापूर्वीच पित्याचे छत्र हरपले आणि चिमुकल्या तीन भावंडावरील आईचाही आधार हिरावल्याने सावली येथील मोहुर्ले परिवारावर दु:खाचा डोंगरच कोसळला आहे.

नियतीने डाव साधला : चार वर्षांपूर्वी पित्याचे तर आता मातेचे छत्र हिरावलेसावली : चार वर्षापूर्वीच पित्याचे छत्र हरपले आणि चिमुकल्या तीन भावंडावरील आईचाही आधार हिरावल्याने सावली येथील मोहुर्ले परिवारावर दु:खाचा डोंगरच कोसळला आहे. या घटनेने तीन मुले निराधार असून गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.गजानन मोहुर्ले यांचे कुटुंब मजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवायचे. अशातच चार वर्षापूर्वी गजाननने गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यानंतर त्यांच्या पत्नी बेबीबाईने मुलांची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेऊन चार वर्षापासून काबाडकष्ट करून संसाराचा गाडा हाकत होती. मात्र शुक्रवारी जंगलामध्ये सरपणासाठी गेली असता तिला फीट आली. सोबतच्या महिलांनी तिला तत्काळ गडचिरोलीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले. मात्र शनिवारी तिची प्राणज्योत विझली. त्यामुळे परिसरात हळहळ पसरली आहे. आई-वडिलांच्या निधनाने तीन भावंडे मात्र निराधार झाली आहेत. मोठा मुलगा अमित गजानन मोहुर्ले (१७) व मुलगी सायली (१५) हिने नुकतीच दहावीची परीक्षा दिली. लहान मुलगा विशाल (१२) हाही शिकत आहे. घरात कुठलीही शेती नाही की उपजीविकेचे दुसरे साधन नाही. मजुरी करून उदरनिर्वाह करणे हाच त्याचा रोजगार. मात्र तीनही भावंडे लहान असल्यामुळे त्यांच्या पालनपोषणाचा प्रश्न निर्माण झाला आहे.नियतीने आपला डाव साधून अमीत, सायली व लहानगा विशाल या निरागस भावंडाचे मातृ-पितृ छत्र हिरावले. याची त्या भावंडांना जाणीव असली तरी त्यांच्या भविष्याचा प्रश्न सध्या अनुत्तरीतच आहे. हा साऱ्या समाजमनाचा चिंतनाचा विषय आहे. शासनाकडून मिळणारी मदत तुटपुंजी आहे. त्यामुळे मायबाप लोकप्रतिनिधींनी आणि दानशुरांनी या आपत्तीग्रस्त तीन भावंडांकरिता मदतीचा हात पुढे करावा, अशी मागणी होत आहे. (तालुका प्रतिनिधी)