शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
3
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
4
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
5
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
6
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
7
दातांवर उपचार करताना महिलेचे कानही झाले बरे, २० वर्षांपासून येत नव्हतं ऐकू, असा घडला चमत्कार
8
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
9
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
10
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
11
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
13
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
14
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
15
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
16
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
17
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
18
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
19
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
20
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...

चिंचेची झाडे तोडणाऱ्या दोघांवर गुन्हे दाखल

By admin | Updated: August 3, 2015 00:39 IST

केवळ विष्ठेच्या दुर्गंधीचा त्रास होतो म्हणून पाखरांची घरटी उद्ध्वस्त करणाऱ्या बल्लारपूर तालुक्यातील नवी दहेली येथील ..

बगळ्यांचे मृत्यूप्रकरण : नवी दहेली येथील घटनाचंद्रपूर : केवळ विष्ठेच्या दुर्गंधीचा त्रास होतो म्हणून पाखरांची घरटी उद्ध्वस्त करणाऱ्या बल्लारपूर तालुक्यातील नवी दहेली येथील धीरज निरंजने व योगेश पोतराजे या दोघांविरुद्ध महाराष्ट्र वृक्षतोड (नियमन) अधिनियम १९६४ व वन्यजीव संरक्षण कायदा १९७२ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.नवी दहेली गावात मोठ्या प्रमाणावर चिंचेची झाडे असून या झाडांवर बगळ्यांचा अधिवास आहे. सध्या विणीचा काळ आहे. या बगळ्यांच्या विष्ठेमुळे गावकऱ्यांना दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागत असल्याचे कारण पुढे करून या झाडांची कत्तल करण्याचा अघोरी ठराव ग्रामपंचायतीने घेतला. गंभीर बाब ही की वन विभागाच्या परवानगीने चिंचेची झाडे तोडता येत नाही. असे असतानाही ग्रामपंचायतीने वन विभागाची परवानगी न घेता बगळ्यांचा अधिवास असलेली चिंचेची नऊ झाडे तोडून टाकली. काही झाडांच्या फांद्याही तोडल्या. यामुळे या झाडांवर अधिवास करून असलेले शेकडो बगळे विस्थापित झालेत. त्यात १२५ बगळ्यांचा मृत्युही झाला. दरम्यान, नवी दहेली येथील पक्षीप्रेमी विजय मेश्राम यांनी याबाबत तातडीने ईको-प्रोकडे तक्रार केली. तक्रारीनंतर ईको-प्रोचे अध्यक्ष बंडू धोतरे यांनी वन विभागाला घडल्या प्रकाराबाबत माहिती दिली. माहिती मिळताच, शनिवारी वन विभागाचे शिघ्र कृती दल व ईको-प्रोचे स्वयंसेवक नवी दहेली गावात जाऊन धडकले आणि त्यांनी झाडांची कत्तल थांबविली. यामुळे १२५ बगळे मृत्युमुखी पडले तर ३१८ जीवंत पिल्लांना वन कर्मचारी व ईको-प्रोच्या सदस्यांनी कारवा नर्सरीत उपचारासाठी आणले.येथे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.बहार बाविस्कर नागपूर, डॉ.रवी खोब्रागडे हे उपचार करीत आहे. त्यांच्याच देखरेखीखाली पिल्लांना ठेवण्यात आले आहे. याकामी ईको-प्रोचे सहकार्य मिळत आहे. (प्रतिनिधी)