शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
2
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाची गोळ्या झाडून हत्या, विद्यापीठातील कार्यक्रमादरम्यान झाला गोळीबार  
3
आजचे राशीभविष्य- ११ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस लाभदायी, नियोजित कामे पूर्ण होतील!
4
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
5
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
6
अग्रलेख: राधाकृष्णन आता देशाचे! नव्या उपराष्ट्रपतींनी हे लक्षात ठेवायला हवेच
7
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
8
‘कोहिनूर’ची ‘बहीण’ ११७ वर्षांनी दिसणार! या बहिणीचं नाव आहे ‘दरिया-ए-नूर’ 
9
Maratha Reservation: राज्यात आजपर्यंत दिलेल्या कुणबी प्रमाणपत्रांची श्वेतपत्रिका काढावी; ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीची भूमिका
10
विशेष लेख: एका परिवर्तनशील, सहृदय नेतृत्वाचा अमृतमहोत्सव
11
नेपाळमध्ये देशभरात संचारबंदी लागू; महाराष्ट्रातील १०० पर्यटकांसह शेकडो प्रवासी अडकले 
12
भारत-अमेरिका यांच्यात चर्चेची दारे खुली होणार; पंतप्रधान मोदी म्हणाले, "ट्रम्प यांच्याशी..."
13
नेपाळनंतर फ्रान्समध्येही जनतेचा उद्रेक; २५० निदर्शकांना अटक 
14
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
15
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
16
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
17
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
18
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
19
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
20
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता

चिंचेची झाडे तोडणाऱ्या दोघांवर गुन्हे दाखल

By admin | Updated: August 3, 2015 00:39 IST

केवळ विष्ठेच्या दुर्गंधीचा त्रास होतो म्हणून पाखरांची घरटी उद्ध्वस्त करणाऱ्या बल्लारपूर तालुक्यातील नवी दहेली येथील ..

बगळ्यांचे मृत्यूप्रकरण : नवी दहेली येथील घटनाचंद्रपूर : केवळ विष्ठेच्या दुर्गंधीचा त्रास होतो म्हणून पाखरांची घरटी उद्ध्वस्त करणाऱ्या बल्लारपूर तालुक्यातील नवी दहेली येथील धीरज निरंजने व योगेश पोतराजे या दोघांविरुद्ध महाराष्ट्र वृक्षतोड (नियमन) अधिनियम १९६४ व वन्यजीव संरक्षण कायदा १९७२ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.नवी दहेली गावात मोठ्या प्रमाणावर चिंचेची झाडे असून या झाडांवर बगळ्यांचा अधिवास आहे. सध्या विणीचा काळ आहे. या बगळ्यांच्या विष्ठेमुळे गावकऱ्यांना दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागत असल्याचे कारण पुढे करून या झाडांची कत्तल करण्याचा अघोरी ठराव ग्रामपंचायतीने घेतला. गंभीर बाब ही की वन विभागाच्या परवानगीने चिंचेची झाडे तोडता येत नाही. असे असतानाही ग्रामपंचायतीने वन विभागाची परवानगी न घेता बगळ्यांचा अधिवास असलेली चिंचेची नऊ झाडे तोडून टाकली. काही झाडांच्या फांद्याही तोडल्या. यामुळे या झाडांवर अधिवास करून असलेले शेकडो बगळे विस्थापित झालेत. त्यात १२५ बगळ्यांचा मृत्युही झाला. दरम्यान, नवी दहेली येथील पक्षीप्रेमी विजय मेश्राम यांनी याबाबत तातडीने ईको-प्रोकडे तक्रार केली. तक्रारीनंतर ईको-प्रोचे अध्यक्ष बंडू धोतरे यांनी वन विभागाला घडल्या प्रकाराबाबत माहिती दिली. माहिती मिळताच, शनिवारी वन विभागाचे शिघ्र कृती दल व ईको-प्रोचे स्वयंसेवक नवी दहेली गावात जाऊन धडकले आणि त्यांनी झाडांची कत्तल थांबविली. यामुळे १२५ बगळे मृत्युमुखी पडले तर ३१८ जीवंत पिल्लांना वन कर्मचारी व ईको-प्रोच्या सदस्यांनी कारवा नर्सरीत उपचारासाठी आणले.येथे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.बहार बाविस्कर नागपूर, डॉ.रवी खोब्रागडे हे उपचार करीत आहे. त्यांच्याच देखरेखीखाली पिल्लांना ठेवण्यात आले आहे. याकामी ईको-प्रोचे सहकार्य मिळत आहे. (प्रतिनिधी)