शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
2
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
3
मोठी बातमी! कबड्डी खेळाडू राणा बलाचौरिया यांच्या हत्येतील आरोपी चकमकीत ठार; दोन पोलिस जखमी
4
टोल नाके दुसरीकडे हलवा...; प्रदूषण कमी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या प्रशासनाला सूचना
5
दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; पिकअपला आग लागल्याने ३ जणांचा होरपळून मृत्यू
6
ऑनलाइन हेल्थ इन्शुरन्स घेताय? 'या' ५ चुका पडतील महागात; तुमचा क्लेम नाकारला जाऊ शकतो!
7
'सरन्यायाधीशांवर चप्पलफेक' यासारखे प्रकार परत घडू नयेत म्हणून सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
8
पाण्याच्या एक-एक थेंबासाठी तरसणार पाकिस्तान; भारतानंतर, आता अफगाणिस्तानचाही मोठा निर्णय
9
साताऱ्यातील ११५ कोटींच्या ड्रग्ज प्रकरणात शिंदे कनेक्शन? सुषमा अंधारेंचा उपमुख्यमंत्र्यांच्या भावावर गंभीर आरोप
10
"साताऱ्यातील ड्रग्ज प्रकरणात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे लागेबांधे असल्याने प्रकरण दडपण्याचा प्रयत्न’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा गंभीर आरोप 
11
मोदी सरकार नववर्षाला गोड भेट देणार! १ जानेवारीपासून सीएनजी आणि पीएनजी स्वस्त होणार
12
कुठल्याही क्षणी अटकेची शक्यता असताना माणिकराव कोकाटे पडले आजारी; लीलावती रुग्णालयात दाखल
13
वाल्मीक कराडला जामीन नाकारला; संतोष देशमुख हत्या प्रकरणात खंडपीठाचा मोठा निकाल
14
Motorola: ६.८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP सेल्फी कॅमेरा आणि बरेच काही; मोटोरोलाचा नवा फोन लॉन्च!
15
भयंकर! लग्नात वाजत होता DJ; १५ वर्षांच्या मुलीला सहन झाला नाही आवाज, हार्ट अटॅकने मृत्यू
16
मार्गशीर्ष शेवटचा गुरुवार २०२५: उंबरठ्यावर करा 'हा' छोटा उपाय; अष्टलक्ष्मीचा मिळेल आशीर्वाद!
17
“किडनी विकावी लागणे शेतकऱ्यांच्या अडचणींची परीसीमा, अतिशय दुर्दैवी”; सुप्रिया सुळेंची टीका
18
'आता निष्पक्ष निवडणुका राहिलेल्या नाहीत', राजदचे खासदार मनोज कुमार झा स्पष्टच बोलले
19
बाजारात सलग तिसऱ्या दिवशी घसरण! टाटा समुहाच्या 'या' कंपनीला सर्वाधिक फटका, IT सेक्टरचा आधार
20
ICC T20 Rankings : तिलक वर्माची उंच उडी! बटलरसह पाकिस्तानच्या साहिबजादा फरहानला फटका
Daily Top 2Weekly Top 5

चिंचेची झाडे तोडणाऱ्या दोघांवर गुन्हे दाखल

By admin | Updated: August 3, 2015 00:39 IST

केवळ विष्ठेच्या दुर्गंधीचा त्रास होतो म्हणून पाखरांची घरटी उद्ध्वस्त करणाऱ्या बल्लारपूर तालुक्यातील नवी दहेली येथील ..

बगळ्यांचे मृत्यूप्रकरण : नवी दहेली येथील घटनाचंद्रपूर : केवळ विष्ठेच्या दुर्गंधीचा त्रास होतो म्हणून पाखरांची घरटी उद्ध्वस्त करणाऱ्या बल्लारपूर तालुक्यातील नवी दहेली येथील धीरज निरंजने व योगेश पोतराजे या दोघांविरुद्ध महाराष्ट्र वृक्षतोड (नियमन) अधिनियम १९६४ व वन्यजीव संरक्षण कायदा १९७२ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.नवी दहेली गावात मोठ्या प्रमाणावर चिंचेची झाडे असून या झाडांवर बगळ्यांचा अधिवास आहे. सध्या विणीचा काळ आहे. या बगळ्यांच्या विष्ठेमुळे गावकऱ्यांना दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागत असल्याचे कारण पुढे करून या झाडांची कत्तल करण्याचा अघोरी ठराव ग्रामपंचायतीने घेतला. गंभीर बाब ही की वन विभागाच्या परवानगीने चिंचेची झाडे तोडता येत नाही. असे असतानाही ग्रामपंचायतीने वन विभागाची परवानगी न घेता बगळ्यांचा अधिवास असलेली चिंचेची नऊ झाडे तोडून टाकली. काही झाडांच्या फांद्याही तोडल्या. यामुळे या झाडांवर अधिवास करून असलेले शेकडो बगळे विस्थापित झालेत. त्यात १२५ बगळ्यांचा मृत्युही झाला. दरम्यान, नवी दहेली येथील पक्षीप्रेमी विजय मेश्राम यांनी याबाबत तातडीने ईको-प्रोकडे तक्रार केली. तक्रारीनंतर ईको-प्रोचे अध्यक्ष बंडू धोतरे यांनी वन विभागाला घडल्या प्रकाराबाबत माहिती दिली. माहिती मिळताच, शनिवारी वन विभागाचे शिघ्र कृती दल व ईको-प्रोचे स्वयंसेवक नवी दहेली गावात जाऊन धडकले आणि त्यांनी झाडांची कत्तल थांबविली. यामुळे १२५ बगळे मृत्युमुखी पडले तर ३१८ जीवंत पिल्लांना वन कर्मचारी व ईको-प्रोच्या सदस्यांनी कारवा नर्सरीत उपचारासाठी आणले.येथे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.बहार बाविस्कर नागपूर, डॉ.रवी खोब्रागडे हे उपचार करीत आहे. त्यांच्याच देखरेखीखाली पिल्लांना ठेवण्यात आले आहे. याकामी ईको-प्रोचे सहकार्य मिळत आहे. (प्रतिनिधी)