शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

श्रेयसच्या मृत्यूस जबाबदार दोन कंपन्यांवर गुन्हे दाखल

By admin | Updated: May 18, 2016 00:46 IST

साई वर्धा पॉवर व डीएनआर इम्फ्रा या कंपन्यांनी अवैधरीत्या खोदकाम करुन खड्डे तयार केले.

न्यायालयाचे आदेश : वरोरा तालुक्यात घडली होती घटनावरोरा : साई वर्धा पॉवर व डीएनआर इम्फ्रा या कंपन्यांनी अवैधरीत्या खोदकाम करुन खड्डे तयार केले. त्यामधील पाण्यात एका शालेय विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाला. या घटनेला कंपन्या जबाबदार असल्याने न्यायालयाच्या आदेशानुसार व्यवस्थापनावर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. मुलाच्या मृत्यूस व्यवस्थापनाला जबाबदार धरून गुन्हे दाखल करावे म्हणून वरोरा न्यायालयात विनोद खोब्रागडे यांनी २०१५ मध्ये याचिका दाखल केली होती. या याचिकेवर न्यायालयाने निकाल देत कंपन्यावर सदोष मनुष्य वध ३०४ (अ) व गौन खनिज चोरी प्रकरणी ३७९ कलमान्वये गुन्हा दाखल करुन तपास करण्याचे आदेश वरोरा पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांना दिले.गतवर्षी वरोरा शहरातील श्रेयस खारोडे या विद्यार्थ्यांचा वर्धा नदीतील खोदलेल्या खड्ड्यातील पाण्यात बुडून मृत्यू झाला होता. वरोरा तालुक्यात अनेक खासगी कंपन्या अवैधरीत्या खोदकाम करीत असून प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. खोदकामामुळे खोल खड्डे पडून त्यात पाणी साचले याची कुठलीही दखल कंपन्या घेत नाही. यामुळेच श्रेयस खारोडे या विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे व्यवस्थापनावर सदोषवध व गौण खनीज चोरी प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी विनोद खोब्रागडे यांनी करत वरोरा येथील न्यायालयात याचिका दाखल केली होती. याप्रकरणी न्याय दंडाधिकारी प्रथम वर्ग ए.एस. देशपांडे यांनी १३ मे रोजी विनोद खोब्रागडे यांच्या अर्ज अंशत: मंजूर करीत फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ प्रमाणे कलम ३०४ अ व ३७९ भारतीय दंड विधान अंतर्गत मे. साई वर्धा पॉवर कंपनी व्यवस्थापक मोहबाळा व मे. डीएनआर इम्फ्रास्ट्रक्चर इंजिनिअर व कॅन्स्ट्रक्शन कंपनी मार्डाविरुद्ध दखलपात्र गुन्ह्याची नोंद करुन प्रकरणाचा तपास करण्याचे आदेश दिले आहे. (लोकमत चमू)