न्यायालयाचे आदेश : वरोरा तालुक्यात घडली होती घटनावरोरा : साई वर्धा पॉवर व डीएनआर इम्फ्रा या कंपन्यांनी अवैधरीत्या खोदकाम करुन खड्डे तयार केले. त्यामधील पाण्यात एका शालेय विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाला. या घटनेला कंपन्या जबाबदार असल्याने न्यायालयाच्या आदेशानुसार व्यवस्थापनावर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. मुलाच्या मृत्यूस व्यवस्थापनाला जबाबदार धरून गुन्हे दाखल करावे म्हणून वरोरा न्यायालयात विनोद खोब्रागडे यांनी २०१५ मध्ये याचिका दाखल केली होती. या याचिकेवर न्यायालयाने निकाल देत कंपन्यावर सदोष मनुष्य वध ३०४ (अ) व गौन खनिज चोरी प्रकरणी ३७९ कलमान्वये गुन्हा दाखल करुन तपास करण्याचे आदेश वरोरा पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांना दिले.गतवर्षी वरोरा शहरातील श्रेयस खारोडे या विद्यार्थ्यांचा वर्धा नदीतील खोदलेल्या खड्ड्यातील पाण्यात बुडून मृत्यू झाला होता. वरोरा तालुक्यात अनेक खासगी कंपन्या अवैधरीत्या खोदकाम करीत असून प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. खोदकामामुळे खोल खड्डे पडून त्यात पाणी साचले याची कुठलीही दखल कंपन्या घेत नाही. यामुळेच श्रेयस खारोडे या विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे व्यवस्थापनावर सदोषवध व गौण खनीज चोरी प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी विनोद खोब्रागडे यांनी करत वरोरा येथील न्यायालयात याचिका दाखल केली होती. याप्रकरणी न्याय दंडाधिकारी प्रथम वर्ग ए.एस. देशपांडे यांनी १३ मे रोजी विनोद खोब्रागडे यांच्या अर्ज अंशत: मंजूर करीत फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ प्रमाणे कलम ३०४ अ व ३७९ भारतीय दंड विधान अंतर्गत मे. साई वर्धा पॉवर कंपनी व्यवस्थापक मोहबाळा व मे. डीएनआर इम्फ्रास्ट्रक्चर इंजिनिअर व कॅन्स्ट्रक्शन कंपनी मार्डाविरुद्ध दखलपात्र गुन्ह्याची नोंद करुन प्रकरणाचा तपास करण्याचे आदेश दिले आहे. (लोकमत चमू)
श्रेयसच्या मृत्यूस जबाबदार दोन कंपन्यांवर गुन्हे दाखल
By admin | Updated: May 18, 2016 00:46 IST