शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
3
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
6
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
7
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
8
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
9
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
10
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
11
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
12
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
13
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
14
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
15
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
16
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
17
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
18
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
19
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
20
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
Daily Top 2Weekly Top 5

१२० जणांविरुद्ध गुन्हे दाखल; सात जणांना अटक

By admin | Updated: October 18, 2014 01:13 IST

रॅली पुढे नेण्याच्या मुद्यावरून गुरूवारी रात्री येथील सावरकर चौकात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला.

चंद्रपूर : रॅली पुढे नेण्याच्या मुद्यावरून गुरूवारी रात्री येथील सावरकर चौकात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला. रॅलीतील कार्यकर्ते आणि वाहतूक पोलीस निरीक्षक पुंडलिक सपकाळे यांच्यात वाद होऊन पोलीस आणि कार्यकर्ते आमने-सामने आले. परिस्थिती चिघळू नये म्हणून पोलिसांनी जमावावर सौम्य लाठीमार केला. रात्री उशिरा याप्रकरणी रामनगर पोलिसांनी सात जणांना अटक केली. याप्रकरणात तब्बल १२० लोकांना आरोपी करण्यात आले आहे. सीसीटिव्ही फुटेजच्या आधाराने पोलिसांनी ही कारवाई केली. ब्रह्मदीप खुशाल रामपुरे रा.भिवापूर वॉर्ड, अविनाश नत्थू बांबोडे, रा.बाबानगर, शुभम भीमराव खैरे, भिवापूर वॉर्ड, विजय दशरथ गोमासे राजनगर आरवट, अमित भीमराव खैरे, भिवापूर, रवी नानाजी, चंहादे, भिवापूर, प्रविण महादेव चुनारकर रा. भिवापूर यांना अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी आरोपींविरुद्ध भादंवि ३५३, १४३, ३४१, ४४७, ४४८, ३३२, ४२९, १४९, १४७ अन्वये गुन्हे दाखल केले आहेत. गुरूवारी रात्री उशिरा वाहतूक निरीक्षक पुंडलिक सपकाळे यांनी याप्रकरणी रामनगर पोलीस ठाण्यात तक्रार केली. धम्मचक्र अनुप्रवर्तन दिनानिमीत्त गुरूवारी रात्री रॅली काढण्यात आली होती. स्थानिक प्रियदर्शिनी चौकात दोन रॅली एकत्र आल्या. त्यातील पुढे असलेली रॅली प्रियदर्शिनी चौकाच्या पुढे नागपूर मार्गावरील महाकाली ट्रॅव्हल्सपुढे थांबली. त्यामुळे या परिसरातील वाहतूक तुंबली होती. याच मार्गावर धम्मचक्र अनुप्रवर्तन सोहळ्यासाठी जाणाऱ्या नागरिकांची मोठी गर्दी होती. त्यात रॅली मध्येच थांबविल्याने वाहतूक ठप्प पडली. यादरम्यान, वाहतूक निरीक्षक पुंडलिक सपकाळे व रॅलीतील कार्यकर्त्यांमध्ये वाद सुरू झाला. हा वाद इतका विकोपाला गेला की, रॅलीतील जमाव थेट रामनगर पोलीस ठाण्यासमोरील सावरकर चौकात पोहचला. तेथे या कार्यकर्त्यांनी रास्ता रोको आंदोलन सुरू केले. त्यामुळे त्या परिसरातही तब्बल अर्धा तास वाहतूक ठप्प पडली. सपकाळे यांच्याविरुद्ध कारवाई करण्यात यावी, अशी मागणी या कार्यकर्त्यांनी लावून धरली. परिस्थिती चिघळत असल्याची बाब लक्षात येताच, पोलिसांची अतिरिक्त कुमक घटनास्थळी दाखल झाली. सोबत दंगा नियंत्रण पथकही तेथे पोहचले. या जमावातील काहींनी एका वाहनाच्या काचा फोडल्या. तसेच एका इंडिका चालकालाही मारहाण केली. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याने पोलिसांना जमावावर सौम्य लाठीमार करावा लागला. त्यामुळे या ठिकाणी बराच गोंधळ उडाला. काही वेळानंतर परिस्थिती नियंत्रणात आली. यावेळी पोलिसांनी सात जणांना अटक केली. मात्र पोलिसांनी संभाव्य परिस्थितीचा अंदाज घेऊन शहराच्या बंदोबस्तात वाढ केली. उशिरापर्यंत तणावाचे वातावरण कायम होते. काढण्यात आलेली रॅली व डीजे वाजविण्यासंदर्भात आयोजकांनी नियमानुसार कोणतीही परवानगी घेतली नव्हती, अशी माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी राजू भुजबळ यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. घटनेनंतर सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केल्यानंतर १२० जणांविरुद्ध गुन्हे दाखल केले. (प्रतिनिधी)