शहरं
Join us  
Trending Stories
1
"मलाही वाटतं मी मुख्यमंत्री व्हावं, पण..."; अजित पवार यांना असं का म्हणावंसं वाटलं? नेमका विषय काय?
2
गिल ने जीता दिल! गुजरातचं धडाकेबाज 'कमबॅक', काव्या मारनचा SRH संघ स्पर्धेतून जवळपास OUT!
3
विराट कोहलीने अवनीत कौरच्या 'त्या' फोटोला केलं Like, ट्रोल झाल्यावर स्पष्टीकरण देत म्हणाला...
4
Video: भरमैदानात तुफान राडा.... शुबमन गिलचा संयम सुटला, पंचांच्या अंगावर ओरडला अन् मग...
5
"संसदेत विधेयक आणा, कोण रोखतय?"; असदुद्दीन ओवेसी यांचा मोदी सरकारवर निशाणा 
6
सातवीच्या निकालाचे ‘टेन्शन’! विद्यार्थिनीने ४ वर्षांच्या बहिणीसह सोडले घर, पोलिसांनी घेतला शोध
7
‘लोकमत’चा दणका: सामूहिक कॉपी करणं भोवलं; भंडाऱ्यातील कांद्रीचे परीक्षा केंद्र तीन वर्षांकरिता रद्द
8
दक्षिण अमेरिकेत ७.४ रिश्टर स्केलचा भूकंप! चिली, अर्जेंटिना हादरले; घरातून बाहेर पडले लोक; त्सुनामीचा इशारा
9
बेजबाबदार RTI कार्यकर्ते खोट्या तक्रारींद्वारे त्रास देण्याचा 'व्यवसाय' चालवतात- गोपाळ शेट्टी
10
Video: पाहुणचाराचा 'गोडवा'! श्रद्धा कपूरने घरच्या पुरणपोळीने केलं इन्स्टाग्रामच्या CEOचं स्वागत
11
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
12
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
13
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
14
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
15
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
16
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
17
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
18
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
19
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
20
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 

वाणिज्य शाखेतील पदविधर बनला ‘ई रिक्षा’ चा निर्माता

By admin | Updated: September 25, 2015 01:32 IST

विज्ञान शाखेत वावरताना विद्यार्थी नवनविन तंत्रज्ञान विकसीत करताना दिसतात. मात्र चंद्रपूरच्या एका ध्येयवेड्या विश्वास मादमशेट्टीवार ...

इको फ्रेंडली रिक्षा : पेट्रोल ऐवजी बॅटरीचा आधारराजू गेडाम मूलविज्ञान शाखेत वावरताना विद्यार्थी नवनविन तंत्रज्ञान विकसीत करताना दिसतात. मात्र चंद्रपूरच्या एका ध्येयवेड्या विश्वास मादमशेट्टीवार यांनी चक्क बॅटरीवर चालणारा ‘ई रिक्षा’ बनविल्याने सर्वत्र कुतूहलाचे वातावरण निर्माण झाले आहे. सदर रिक्षा इको फ्रेंडली असून प्रदूषण विरहित आहे व बॅटरीचा खर्च स्वस्त असल्याने सर्वसामान्यांना परवडणारा असल्याचे दिसून येते.चंद्रपूर येथील इलेक्ट्रीक इंडस्ट्रीज परिसरात राहणारा विश्वास गजानन मादमशेट्टीवार यांचे मोठे भाऊ एका कंपनीत कार्यरत आहेत. वडील गजाननराव देखील विज्ञान शाखेतील असल्याने विज्ञानाचे तंत्र घरी विकसीत आहे. मात्र विश्वास यांनी वाणिज्य शाखेकडे वळले. वाणिज्य शाखेची पदवी घेत असताना वडील, भाऊ यांच्या चालणाऱ्या घडामोडीवर त्याचे सूक्ष्मपणे निरीक्षक असायचे. या निरीक्षणातून त्यांनी ‘ई रिक्षा’ बनविण्याचा निर्णय घेतला. प्रथमत: चेचीस बनविण्यात आली. यात वडील व भावाचे मार्गदर्शन घेतले. त्यानंतर लोखंडी रॉडचा ढाचा बनविला. यात त्यांनी दोन प्रकारचे ‘ई रिक्षा’ बनविले. यात मालवाहक व प्रवासी वाहक याचा समावेश आहे. मालवाहक व प्रवासी वाहक यांना लागणारी बॅटरी सारख्या किंमतीची असून चार बॅटऱ्यांची किंमत २५ हजार रुपये आहे. दर सहा महिन्यांनी या बॅटऱ्या बदलाव्या लागतात. ताशी २० किमी चालणारा हा ‘ई रिक्षा’ एकदा चार्ज झाल्यावर ८० ते १०० किमीपर्यंत चालु शकतो. प्रदूषण विरहित असलेल्या या ‘ई रिक्षा’ मुळे सर्वसामान्यांना फार मोठा दिलासा मिळणार आहे. इतर रिक्षा प्रमाणे आवाज न करता संथपणे चालणारा हा रिक्षा सर्वांना प्रेरणादायी ठरणार असून ते मूल येथील पडगेलवार यांच्याकडे रिक्षा घेऊन आल्यानंतर ही माहिती दिली.