शहरं
Join us  
Trending Stories
1
वीजग्राहकांसाठी आनंदाची बातमी! २६ टक्के वीजदर कमी होणार; CM फडणवीस म्हणाले, “इतिहासात प्रथमच…”
2
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
3
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
4
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
5
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
6
लग्नाआधी सरकारी नोकरी! नववी नापास रिंकू सिंह होणार थेट 'शिक्षण अधिकारी'
7
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
8
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
9
तारीख ठरली! इंडिया चॅम्पियन्स पुन्हा एकदा पाकचा धुव्वा उडवण्यासाठी उतरणार मैदानात
10
अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर?
11
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
12
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
13
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
14
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
15
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
16
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
17
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
18
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
19
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
20
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...

वाणिज्य शाखेतील पदविधर बनला ‘ई रिक्षा’ चा निर्माता

By admin | Updated: September 25, 2015 01:32 IST

विज्ञान शाखेत वावरताना विद्यार्थी नवनविन तंत्रज्ञान विकसीत करताना दिसतात. मात्र चंद्रपूरच्या एका ध्येयवेड्या विश्वास मादमशेट्टीवार ...

इको फ्रेंडली रिक्षा : पेट्रोल ऐवजी बॅटरीचा आधारराजू गेडाम मूलविज्ञान शाखेत वावरताना विद्यार्थी नवनविन तंत्रज्ञान विकसीत करताना दिसतात. मात्र चंद्रपूरच्या एका ध्येयवेड्या विश्वास मादमशेट्टीवार यांनी चक्क बॅटरीवर चालणारा ‘ई रिक्षा’ बनविल्याने सर्वत्र कुतूहलाचे वातावरण निर्माण झाले आहे. सदर रिक्षा इको फ्रेंडली असून प्रदूषण विरहित आहे व बॅटरीचा खर्च स्वस्त असल्याने सर्वसामान्यांना परवडणारा असल्याचे दिसून येते.चंद्रपूर येथील इलेक्ट्रीक इंडस्ट्रीज परिसरात राहणारा विश्वास गजानन मादमशेट्टीवार यांचे मोठे भाऊ एका कंपनीत कार्यरत आहेत. वडील गजाननराव देखील विज्ञान शाखेतील असल्याने विज्ञानाचे तंत्र घरी विकसीत आहे. मात्र विश्वास यांनी वाणिज्य शाखेकडे वळले. वाणिज्य शाखेची पदवी घेत असताना वडील, भाऊ यांच्या चालणाऱ्या घडामोडीवर त्याचे सूक्ष्मपणे निरीक्षक असायचे. या निरीक्षणातून त्यांनी ‘ई रिक्षा’ बनविण्याचा निर्णय घेतला. प्रथमत: चेचीस बनविण्यात आली. यात वडील व भावाचे मार्गदर्शन घेतले. त्यानंतर लोखंडी रॉडचा ढाचा बनविला. यात त्यांनी दोन प्रकारचे ‘ई रिक्षा’ बनविले. यात मालवाहक व प्रवासी वाहक याचा समावेश आहे. मालवाहक व प्रवासी वाहक यांना लागणारी बॅटरी सारख्या किंमतीची असून चार बॅटऱ्यांची किंमत २५ हजार रुपये आहे. दर सहा महिन्यांनी या बॅटऱ्या बदलाव्या लागतात. ताशी २० किमी चालणारा हा ‘ई रिक्षा’ एकदा चार्ज झाल्यावर ८० ते १०० किमीपर्यंत चालु शकतो. प्रदूषण विरहित असलेल्या या ‘ई रिक्षा’ मुळे सर्वसामान्यांना फार मोठा दिलासा मिळणार आहे. इतर रिक्षा प्रमाणे आवाज न करता संथपणे चालणारा हा रिक्षा सर्वांना प्रेरणादायी ठरणार असून ते मूल येथील पडगेलवार यांच्याकडे रिक्षा घेऊन आल्यानंतर ही माहिती दिली.