शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

उपयोगी शोधासाठी नवीन पिढी तयार करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2018 22:25 IST

शिक्षण घेणे म्हणजे पुस्तकी ज्ञान लादणे नव्हे. शिक्षण म्हणजे अंतरात्म्याच्या विकासाला चालना मिळणे होय. शिक्षणातून समाजाला काहीतरी देता आले पाहिजे. शिक्षणातून नवनवीन समाज उपयोगी शोध पुढे आले पाहिजे. यासाठी नव्या पिढीला तयार करा, असे आवाहन राज्याचे वित्त, नियोजन व वनेमंत्री तथा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले. बल्लारपूर येथे साईबाबा ज्ञानपीठ कॉन्व्हेंट येथे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाच्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते.

ठळक मुद्देसुधीर मुनगंटीवार : साईबाबा ज्ञानपीठ कॉन्व्हेंटमध्ये बल्लारपूर तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : शिक्षण घेणे म्हणजे पुस्तकी ज्ञान लादणे नव्हे. शिक्षण म्हणजे अंतरात्म्याच्या विकासाला चालना मिळणे होय. शिक्षणातून समाजाला काहीतरी देता आले पाहिजे. शिक्षणातून नवनवीन समाज उपयोगी शोध पुढे आले पाहिजे. यासाठी नव्या पिढीला तयार करा, असे आवाहन राज्याचे वित्त, नियोजन व वनेमंत्री तथा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले. बल्लारपूर येथे साईबाबा ज्ञानपीठ कॉन्व्हेंट येथे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाच्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते.यावेळी वनविकास महामंडळाचे अध्यक्ष चंदनसिंग चंदेल, जिल्हा परिषद अध्यक्ष देवराव भोंगळे, बल्लारपूरचे नगराध्यक्ष हरिश शर्मा, सभापती गोविंदा पोडे, मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापळकर, पोंभूणा पं. स. सभापती अलका आत्राम, जिल्हा परिषद सदस्य राहुल संतोषवार, मुख्याधिकारी बिपिन मुद्धा, गटविकास अधिकारी श्वेता यादव, प्राचार्य किरण सिंग चंदेल आदी उपस्थित होते.तालुक्यातील सर्व शाळांचे शिक्षक व विद्यार्थ्यांशी संवाद साधताना पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी जपान देशातील शिक्षण पद्धतीचा दाखला दिला. जपानमध्ये शिक्षणात प्रयोगशिलतेवर अधिक भर दिला जातो. ते म्हणाले, शिक्षण म्हणजे केवळ पुस्तक वाचणे नव्हे. शिक्षण हे जबरदस्तीने ज्ञान वाटणे किंवा घेणे नव्हे. शिक्षण म्हणजे अंतरात्म्यासोबतचा संवाद होय. अंतरात्मा विकसित करणे शिक्षणाचे प्रथम ध्येय असले पाहिजे.विद्यार्थ्यांना न्यूटन, एडीसन यांचा जन्म कधी झाला, न्यूटन कसा दिसत होता किंवा त्यांचा मृत्यू कधी झाला, हे एकदाचे नाही शिकवले तरी चालेल. मात्र न्यूटन तुमच्या शाळेमध्ये कसा तयार होईल, तुमच्या शाळेमध्ये विद्यार्थी कसा प्रयोग करायला शिकेल, याबाबतच्या उपाययोजना करणे गरजेचे असल्याचे ना. मुनगंटीवार यांनी स्पष्ट केले. बल्लारपूर तालुक्यातील विद्यार्थ्यांनी स्वत: तयार केलेले नवनवीन प्रयोग लक्ष वेधणारे असल्याचे सांगून त्यांनी मुलांच्या वैज्ञानिक व सांस्कृतिक कलागुणांचे कौतुक केले. विज्ञान प्रदर्शनी ही दरवर्षीची खाणापूर्ती होऊ नये. विद्यार्थ्यांमध्ये शोधकवृत्ती वाढेल यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी उपस्थित शिक्षकांना केले. कार्यक्रमाला पोंभुर्णा तालुक्यातील नागरिकही मोठ्या संख्येने होते.पोंभुर्णा येथील एमआयडीसीला ना. मुनगंटीवार यांनी नुकतीच मंजुरी दिल्याबद्दल पोंभुर्णा तालुक्याच्या वतीने नागरिकांनी स्वागत केले. यावेळी साईबाबा ज्ञानपीठ कॉन्हेंटच्या मुलांनी सांस्कृतिक कार्यक्रमाचे सादरीकरण केले. प्रास्ताविक शोभा मडावी, संचालन मुक्ता खुराना, विद्यार्थिनी साक्षी बनकर, खुशबू घोडमोरे यांनी केले.