शहरं
Join us  
Trending Stories
1
'1971 आणि 2025 ची परिस्थिती वेगळी', युद्धविराम अन् इंदिरा गांधींबाबत शशी थरुर स्पष्टच बोलले
2
भारतानं पाकिस्तानात घुसून मारलं, लष्कराचा दरारा रावळपिंडीपर्यंत पोहोचला; ऑपरेशन सिंदूरवर राजनाथ सिंह स्पष्टच बोलले 
3
Yogi Adityanath : "पाकिस्तानला विचारा 'ब्रह्मोस' क्षेपणास्त्राची ताकद काय आहे?"; योगी आदित्यनाथ कडाडले
4
"मी मोठी झाल्यावर सैन्यात भरती होईन आणि बदला घेईन"; शहीद जवानाच्या लेकीचा निर्धार
5
भारत-पाकिस्तान संघर्षाचा BCCI ला मोठा फटका; आठवड्यात ४२० कोटी रुपये पाण्यात जाणार?
6
Ceasefire Violation: भारतासोबत शस्त्रसंधीची चर्चा करणारे पाकिस्तानी लष्कराचे डीजीएमओ कोण आहेत?
7
Bhagwant Mann : "देशाच्या हितासाठी पंजाब रक्त..."; भगवंत मान यांची राजस्थानला अतिरिक्त पाणी देण्याची मोठी घोषणा
8
युद्धविराम पंतप्रधान मोदींनी घेतली उच्चस्तरीय बैठक, तिन्ही लष्करप्रमुखांसह अजित डोवाल, राजनाथ सिंहांची उपस्थिती
9
लक्ष्य साध्य झाले पण 'ऑपरेशन सिंदूर' अजूनही सुरुच; हवाई दलाने दिली मोठी अपडेट...
10
मेळघाटातील ‘त्या’ आरएफओंची राज्य महिला आयोगाकडे धाव, ‘त्या’ अधिकाऱ्याला अभय
11
फक्त एक मिस्ड कॉल किंवा SMS द्वारे PF बॅलन्स तपासा; कुठेही लॉगइन करण्याची गरज नाही
12
'युद्धविरामचे पालन करू, पण काश्मीर अन् सिंधू करार...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे मोठे विधान
13
फक्त ४० रुपयांमध्ये पोटभर जेवण! 'या' बॉलिवूड कलाकाराने उघडलंय हॉटेल, चाहत्यांकडून कौतुक
14
मुलगा देशसेवेसाठी दिलाय;काही झालं तर मन घट्ट केलंय! कर्नल नितीन काळदाते यांच्या आईची कृतार्थ भावना
15
पैशांसाठी कुणावरही अवलंबून राहू नये असं वाटतं? मग आजपासून 'या' १० टीप्स फोलो करा
16
IPL Re-Start : फायनल ठरलेल्या दिवशीच खेळवण्याचा प्लॅन; पण ते कसं शक्य होईल?
17
पाकिस्तानकडून युद्धविरामचे उल्लंघन; भारतीय क्रिकेटपटूंनी पाकची केली कुत्र्याची तुलना, म्हणाले...
18
"बुद्धिमत्तापूर्ण आणि संतुलित"; पी चिदंबरम यांनी पंतप्रधान मोदींच्या युद्ध धोरणाचं केलं भरभरुन कौतुक
19
पुन्हा समोर आला पाकिस्तानचा दुटप्पी चेहरा; युद्धविरामानंतर रात्री काय-काय घडलं? जाणून घ्या
20
भीषण! भरधाव कारने घराबाहेर बसलेल्या महिलेसह ४ मुलांना चिरडलं; थरकाप उडवणारा Video

सांडपाणी व्यवस्थापनासाठी गावात शोषखड्डे निर्माण करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2021 04:30 IST

चंद्रपूर जिल्ह्यास ४० हजार शोषखड्डे निर्मितीचे उद्दिष्ट असताना, नरेगा योजना व लोकसहभागातून उद्दिष्टापेक्षा जास्त शोषखड्डे प्रत्येक गावात निर्माण करा. ...

चंद्रपूर जिल्ह्यास ४० हजार शोषखड्डे निर्मितीचे उद्दिष्ट असताना, नरेगा योजना व लोकसहभागातून उद्दिष्टापेक्षा जास्त शोषखड्डे प्रत्येक गावात निर्माण करा. यासाठी प्रत्येक गावाचा १०० दिवसाचा कृती आराखडा निर्माण करा, त्यानुसार नियोजनबध्द कामे करा. या कामात जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी यांचा सहभाग मोलाचा असुन प्रत्येकाने या मोहिमेत सहभागी व्हावे, असे आवाहन केले. यावेळी जिल्ह्यातील सर्व सरपंच यांच्याशी ऑनलाईन झुम मिटिंगद्वारा जिल्हा परिषद अध्यक्षा संध्या गुरुनुले यांनी संवाद साधला.

सरपंच स्वच्छ्ता संवाद उपक्रमाला जिल्ह्यातील सरपंच यांचा चांगला प्रतिसाद मिळाला. जिल्ह्यातील बहुसंख्य सरपंचांनी या ऑनलाईन उपक्रमात सहभाग घेतला होता. तालुका पातळीवरुन पंचायत समितीचे सभापती व गटविकास अधिकारी व अन्य मान्यवरांनी जिल्ह्यातील उपक्रमात सहभागी सर्वांना महत्वाचे मार्गदर्शन केले. जिल्हा पातळीवरुन जिल्हा परिषद अध्यक्षा सौ. संध्याताई गुरुनुले यांनी उपस्थित सर्व सरपंच यांना मार्गदर्शन केले. सदर उपक्रम जिल्ह्यात यशस्वी करण्यासाठी स्वच्छ भारत मिशनचे माहिती शिक्षण संवाद तज्ज्ञ कृष्णकांत खानझोडे, प्रवीण खंडारे व सुनील चिकटे यांनी अथक परिश्रम घेतले.