शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

न्यायालयालाच हवा न्याय

By admin | Updated: March 12, 2015 00:42 IST

किरकोळ न्यायालयीन प्रकरणाचा त्वरीत निपटारा व्हावा व लोकांना नेहमी राजुऱ्यापर्यंत जाण्याची गरज भासू नये, म्हणून गडचांदुरात ग्राम न्यायलयाची निर्मिती करण्यात आली.

गडचांदूर : किरकोळ न्यायालयीन प्रकरणाचा त्वरीत निपटारा व्हावा व लोकांना नेहमी राजुऱ्यापर्यंत जाण्याची गरज भासू नये, म्हणून गडचांदुरात ग्राम न्यायलयाची निर्मिती करण्यात आली. मात्र जागेअभावी सदर न्यायालय गोदामाध्ये भरत आहे. त्यामुळे कर्मचारी व नागरिकांना त्रास सहन करावा लागत असून ग्राम न्यायालयालाच न्याय देण्याची गरज निर्माण झाली आहे.कोरपना व जिवती तालुक्याचे केंद्रबिंदू असलेल्या गडचांदुरात सहा-सात वर्षापूर्वी ग्राम न्यायालय सुरु करण्यात आले. बाजाराच्या दिवशी दर मंगळवारला हे ग्राम न्यायालय सुरु असते. पूर्वी नगरपरिषदेच्या बिर्ला सभागृहात हे ग्राम न्यायालय भरायचे. मोठ्या थाटात या ग्राम न्यायालयाचे उद्घाटनही झाले होते. मात्र नगर परिषद अस्तित्वात आल्यानंतर नगरपरिषदेचे सामूहीक कार्यालय सदर सभागृहात सुरु करण्यात आल्याने ग्राम न्यायालयाकरिता जागा उपलब्ध राहिली नाही. त्यामुळे आता गेल्या सात-आठ महिन्यांपासून ग्राम न्यायालय नगर परिषदेच्या गोदामात सुरू आहे.येथे न्यायाधिशांना, वकिलांना व पक्षकारांना बसण्याची व्यवस्था नाही. शौचालय व पिण्याच्या पाण्याची सुद्धा व्यवस्था नसल्याने ग्राम न्यायालय किती दिवस टिकणार हा प्रश्न पडला आहे. न्यायालयात खुर्चीचा पत्ता नसल्याने कधी - कधी न्यायधिशासह वकील, पक्षकार, गैरअर्जदार व अर्जदार या साऱ्यांनाच बसायला मिळत नाही. अनेक वर्षाच्या प्रतीक्षेनंतर गडचांदुरात ग्राम न्यायालय सुरु आहे. त्यामुळे स्थानिक पातळीवर लोकांच्या वादाचा निपटारा होऊ शकला नाही. याकडे शासनाने लक्ष देऊन सुविधा उपलब्ध करुन देणे गरजेचे आहे. याकडे शासनाने वेळीच लक्ष देऊन ग्राम न्यायालयाला जागा मिळवून देण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. (शहर प्रतिनिधी)