शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राचे सुपुत्र बी. आर. गवई देशाचे नवे सरन्यायाधीश; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंनी दिली शपथ
2
विजय शाह यांना कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबाबत वादग्रस्त विधान भोवले; काँग्रेस नेत्यांची निदर्शने; नेमप्लेटवर शाई फेकली
3
कर्नल सोफिया कुरेशींबाबत आक्षेपार्ह विधान करणाऱ्या भाजपा मंत्र्याला दणका; वरिष्ठांचे आदेश आले, अन्...
4
पाकिस्ताननं जितक्या रकमेसाठी IMF मध्ये नाक कापून घेतलं, भारताला त्यापेक्षा अधिक तर 'गिफ्ट'च मिळणारे; प्रकरण काय?
5
एकामागोमाग एक दिग्गज कंपन्या निर्णय घेतायत; मायक्रोसॉफ्ट ६००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार
6
Rohit Sharma : कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर रोहित शर्मा मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला, कारण काय ?
7
ब्रेकअपनंतर प्रेयसीचे ’तसले’ व्हिडीओ पॉर्न साईटवर? कोल्हापूरच्या प्रियकरावर पुण्यात गुन्हा
8
परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आता बुलेटप्रुफ कारमधून ये-जा करणार; पाकिस्तानमुळे वाढली सुरक्षा
9
मोठी बातमी! अकोल्यातील पाच सराफा दुकानांवर आयकरची धाड; सकाळपासून शोधमोहिम सुरू
10
पाकिस्तानला शस्त्रास्त्रे देणाऱ्या तुर्कीवर पुण्यातून ट्रेड स्ट्राईक; उदयपूरचे संगमरवर व्यापारीही माल आणणार नाहीत
11
कोण आहे कशिश चौधरी?; वयाच्या २५ व्या वर्षी या हिंदू मुलीनं पाकिस्तानात रचला इतिहास
12
भारत-पाकिस्तान तणावामुळे आलिया भटने घेतला हा मोठा निर्णय, वाचून कराल तिचं कौतुक
13
हेअर ट्रान्सप्लांटमुळे एक नव्हे २ इंजिनिअरचा मृत्यू; डॉ. अनुष्का तिवारीचा नवा कांड उघड
14
Stock Market Today: या वृत्तानं बदलला बाजाराचा मूड; १३० अंकांच्या तेजीसह उघडला सेन्सेक्स, IT-Metal स्टॉक्समध्ये तेजी
15
भारताच्या हल्ल्यात पाकिस्तानी एअरबेस उद्ध्वस्त; लढाऊ विमाने जळून राख, सॅटेलाईट फोटो पाहा
16
भारतीय वंशाच्या अनिता आनंद कॅनडाच्या परराष्ट्र मंत्री; ट्रुडोंनी बिघडविलेले संबंध सुधारण्याची अपेक्षा
17
PPF बनवेल कोट्यधीश, कमाल आहे १५+५+५ ची जादू; बनेल १ कोटींचा बॅलन्स, पण कसा?
18
लक्ष्मणरेषा ओलांडाल तर तुमचा विनाश अटळ, समूळ उच्चाटन करू; PM मोदींचा पुन्हा खणखणीत इशारा
19
S-400: सिलिगुडी कॉरिडॉरला 'सुदर्शन चक्र' चे संरक्षण असणार; कोणत्याही धोक्याला तोंड देण्यासाठी सैन्य सज्ज
20
पाकविरोधात केंद्र सरकारच्या कारवाईवर जनता खुश आहे की नाही?; ऑपरेशन सिंदूरनंतर समोर आला सर्व्हे

न्यायालयालाच हवा न्याय

By admin | Updated: March 12, 2015 00:42 IST

किरकोळ न्यायालयीन प्रकरणाचा त्वरीत निपटारा व्हावा व लोकांना नेहमी राजुऱ्यापर्यंत जाण्याची गरज भासू नये, म्हणून गडचांदुरात ग्राम न्यायलयाची निर्मिती करण्यात आली.

गडचांदूर : किरकोळ न्यायालयीन प्रकरणाचा त्वरीत निपटारा व्हावा व लोकांना नेहमी राजुऱ्यापर्यंत जाण्याची गरज भासू नये, म्हणून गडचांदुरात ग्राम न्यायलयाची निर्मिती करण्यात आली. मात्र जागेअभावी सदर न्यायालय गोदामाध्ये भरत आहे. त्यामुळे कर्मचारी व नागरिकांना त्रास सहन करावा लागत असून ग्राम न्यायालयालाच न्याय देण्याची गरज निर्माण झाली आहे.कोरपना व जिवती तालुक्याचे केंद्रबिंदू असलेल्या गडचांदुरात सहा-सात वर्षापूर्वी ग्राम न्यायालय सुरु करण्यात आले. बाजाराच्या दिवशी दर मंगळवारला हे ग्राम न्यायालय सुरु असते. पूर्वी नगरपरिषदेच्या बिर्ला सभागृहात हे ग्राम न्यायालय भरायचे. मोठ्या थाटात या ग्राम न्यायालयाचे उद्घाटनही झाले होते. मात्र नगर परिषद अस्तित्वात आल्यानंतर नगरपरिषदेचे सामूहीक कार्यालय सदर सभागृहात सुरु करण्यात आल्याने ग्राम न्यायालयाकरिता जागा उपलब्ध राहिली नाही. त्यामुळे आता गेल्या सात-आठ महिन्यांपासून ग्राम न्यायालय नगर परिषदेच्या गोदामात सुरू आहे.येथे न्यायाधिशांना, वकिलांना व पक्षकारांना बसण्याची व्यवस्था नाही. शौचालय व पिण्याच्या पाण्याची सुद्धा व्यवस्था नसल्याने ग्राम न्यायालय किती दिवस टिकणार हा प्रश्न पडला आहे. न्यायालयात खुर्चीचा पत्ता नसल्याने कधी - कधी न्यायधिशासह वकील, पक्षकार, गैरअर्जदार व अर्जदार या साऱ्यांनाच बसायला मिळत नाही. अनेक वर्षाच्या प्रतीक्षेनंतर गडचांदुरात ग्राम न्यायालय सुरु आहे. त्यामुळे स्थानिक पातळीवर लोकांच्या वादाचा निपटारा होऊ शकला नाही. याकडे शासनाने लक्ष देऊन सुविधा उपलब्ध करुन देणे गरजेचे आहे. याकडे शासनाने वेळीच लक्ष देऊन ग्राम न्यायालयाला जागा मिळवून देण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. (शहर प्रतिनिधी)