शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
2
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
3
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
4
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
5
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
6
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
7
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
8
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
9
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
10
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
11
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
12
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
13
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
14
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
15
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
16
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!
17
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट
18
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! १० कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
19
सर्वात कमी खर्चात बंपर परतावा देणाऱ्या टॉप ५ स्मॉल कॅप फंड योजना! ५ वर्षात पाचपट रिटर्न
20
'भारतासोबतचे संबंध आणखी मजबूत झाले', मुस्लिम देशाने भारताची स्तुती केल्याने पाकिस्तानला मिरची

न्यायालयालाच हवा न्याय

By admin | Updated: March 12, 2015 00:42 IST

किरकोळ न्यायालयीन प्रकरणाचा त्वरीत निपटारा व्हावा व लोकांना नेहमी राजुऱ्यापर्यंत जाण्याची गरज भासू नये, म्हणून गडचांदुरात ग्राम न्यायलयाची निर्मिती करण्यात आली.

गडचांदूर : किरकोळ न्यायालयीन प्रकरणाचा त्वरीत निपटारा व्हावा व लोकांना नेहमी राजुऱ्यापर्यंत जाण्याची गरज भासू नये, म्हणून गडचांदुरात ग्राम न्यायलयाची निर्मिती करण्यात आली. मात्र जागेअभावी सदर न्यायालय गोदामाध्ये भरत आहे. त्यामुळे कर्मचारी व नागरिकांना त्रास सहन करावा लागत असून ग्राम न्यायालयालाच न्याय देण्याची गरज निर्माण झाली आहे.कोरपना व जिवती तालुक्याचे केंद्रबिंदू असलेल्या गडचांदुरात सहा-सात वर्षापूर्वी ग्राम न्यायालय सुरु करण्यात आले. बाजाराच्या दिवशी दर मंगळवारला हे ग्राम न्यायालय सुरु असते. पूर्वी नगरपरिषदेच्या बिर्ला सभागृहात हे ग्राम न्यायालय भरायचे. मोठ्या थाटात या ग्राम न्यायालयाचे उद्घाटनही झाले होते. मात्र नगर परिषद अस्तित्वात आल्यानंतर नगरपरिषदेचे सामूहीक कार्यालय सदर सभागृहात सुरु करण्यात आल्याने ग्राम न्यायालयाकरिता जागा उपलब्ध राहिली नाही. त्यामुळे आता गेल्या सात-आठ महिन्यांपासून ग्राम न्यायालय नगर परिषदेच्या गोदामात सुरू आहे.येथे न्यायाधिशांना, वकिलांना व पक्षकारांना बसण्याची व्यवस्था नाही. शौचालय व पिण्याच्या पाण्याची सुद्धा व्यवस्था नसल्याने ग्राम न्यायालय किती दिवस टिकणार हा प्रश्न पडला आहे. न्यायालयात खुर्चीचा पत्ता नसल्याने कधी - कधी न्यायधिशासह वकील, पक्षकार, गैरअर्जदार व अर्जदार या साऱ्यांनाच बसायला मिळत नाही. अनेक वर्षाच्या प्रतीक्षेनंतर गडचांदुरात ग्राम न्यायालय सुरु आहे. त्यामुळे स्थानिक पातळीवर लोकांच्या वादाचा निपटारा होऊ शकला नाही. याकडे शासनाने लक्ष देऊन सुविधा उपलब्ध करुन देणे गरजेचे आहे. याकडे शासनाने वेळीच लक्ष देऊन ग्राम न्यायालयाला जागा मिळवून देण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. (शहर प्रतिनिधी)